Quantcast
Channel: Marathi Essay : Gandhiji, rabindranath, indira gandhi, lokmany tilak, Babasaheb, Bhagat singh, baba ambedkar, sarvapalli radhakrishnan, chacha neharu, – Marathi Unlimited
Viewing all 88 articles
Browse latest View live

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे!

$
0
0

जन्म १ ऑगष्ट १९२०. मृत्यू -१९६९ .

Annabhau Sathe – Social Reformer essay7अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ऑगष्ट १९२० या दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात वाटेगाव या खेड्यात मातंग समाजात झाला. आणि अण्णाभाऊ साठे नावाचा क्रांती सूर्य उगवला.त्यांच्या वडिलांचे नाव भाउराव सिद्धोजी साठे व आईचे नाव वालुबाई होते. त्यांना लहान भाऊ शंकर व बहीण जाईबाई.

बारष्याचे दिवशी त्यांचे नाव तुकाराम ठेवण्यात आले. संत तुकारामा प्रमाणे हाही तुकाराम मोठा साहित्यिक झाला. साहित्यी क्षेत्रातील चमत्कारी ठरला. अर्थात अन्नाभाउच्या बाल्यावस्थेत कोणी म्हटले असते, कि हा मुलगा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करील, तर असे भाकित ठरविनार्याला वेडेच ठरविले गेले असते. त्याचे कारण म्हणजे,एक तर पददलित जातीकुळी व विलक्षण दैन्यावस्था, रोज बारा वाजताची वेळ कशी भागेल याचीच भ्रांती असायची अन्नाभाऊंची आई विचारी होती. पूर्वी जिजाबाई ने शिवबाला रामायण-महाभारतातील कथा सांगितल्या, तद्वतच वाळूबाईंनी छोट्या तुकारामाला वीर लहुजी वस्ताद, फकीरा, वीर सत्तू , पिराजी यांच्या गोष्टींचे संस्कार केले.

“माझी  मैना गावाकड ऱ्हांयली , माझ्या जीवाची होतीया काह्यली ‘ या सारख्या ठसकेबाज लावण्या आणि ‘फकीरा’ ‘वारणेचा वाघ’ ‘ माकडी ची माळ ‘ मास्तर ‘ यांसारख्या कादंबऱ्या  त्यांनी लिहिल्या. मातंग समाजात जन्मलेले अण्णाभाऊ अल्प शिक्षित असले तरी त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या समाज मनाचा ठाव घेणार्या आहेत. त्यांच्या अंतर मनाचा तो प्रकट हुंकार आहे. समाज परिवर्तनाचा विचार मांडणारा हा साहित्यिक स्वातंत्र चळवळी च्या जनसागरात गुंतलेला लढाऊ माणूस अण्णांनी आपल्या लेखणीतून उभा केला. ग्रामीण, पददलित, आणि लाचारीचे जिने जगणारी माणसे त्यांनी आपल्या खास शैलीत उभी केली.

फकीरा प्रमाणे मातंग असणारा नायक , एक अजस्त्र ताकदीचा व धैर्याचा महामेरू, भारतीय स्वातंतत्र्य लढ्याच्या रनांगणात  दिनद्लितांच्या व उपेक्षितांच्या वतीने लढणारा नायक म्हणून त्यांनी ‘ फकीरात ‘ केला फकीरा हि कादंबरी त्याकाळात फार प्रसिद्ध झालेल्या सर्वोत्कृष्ट ठरल्या.पस्तीस कादंबर्या, तीन नाटके, अकरा लोकनाट्ये,तेरा कथा संग्रह आणि सात चित्रपट कथा लिहिणार्या अण्णाभाऊनि फक्कड लावण्याही लिहिल्या. शाहीर गवानकरांच्या ‘ लालबावटा ‘ कलापथकां द्वारा अनेक तमाशेही केले.जगण्यासाठी लढणार्या माणसांचे चित्रण करणार्या अन्नाभाउंनी “मुंबई नगरी बडीबांका,जशी रावणाची लंका वाजतोय डंका चौहुमुलुखी” अश्या शब्दात मुंबईचे चित्र रेखाटले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ” मार्क्सवाद भाकरीचा प्रश्न सोडवील पण माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न शिल्लक राहतोच आणि मला भाकरीपेक्षा इज्जत आणि स्वाभिमान प्यारा आहे. “या विचाराने अण्णाभाऊ भाराऊन गेले. हा स्वाभिमान त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांतून आपले अस्तित्व दाखवू लागला. अन्नाभाउंनी उभ्या आयुष्यात मुख्यत: दोन गोष्टींचा तिटकारा केला. एक म्हणजे श्रीमंत लोकांकडून होणारे गरीबांचे शोषण आणि अस्पृश्य बांधवामची होणारी धार्मिक, सामाजिक पिळवणूक. अनाभाउंनि या गोष्टीवर आपल्या लेखणीने सतत कोरडे ओढले, प्रहार केले. जनसामांन्यांच्या या लोकशाहिराचे दिनांक १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले.

Annabhau Sathe the social reformer and activist, get Marathi essay and biography on him. original picture gallery of Annabhau Sathe.

Annabhau Sathe – Social Reformer essay original picture gallery Annabhau Sathe – Social Reformer essay Annabhau Sathe – Social Reformer essay2 Annabhau Sathe – Social Reformer essay7 Annabhau Sathe – Social Reformer original picture

आजचे विद्यार्थी —उद्याचे नेतृत्व!

$
0
0

आजचे विद्यार्थी —  उद्याचे नेतृत्व

     किंवा
राजकारण  —  आजचे युवक !

students and politics
मुद्दे — * आजची भरकटलेली युवाशक्ती, –  * आजचे भ्रष्ट व नकारात्मक राजकारण, –  * समर्थ विचारवंत व उत्तम राज्यकर्त्यांचे आदर्श युवकांनी अंगीकारायला हवे,  — * राजकारणविषयक तात्विक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता, –  * राजकारणाचा सखोल व सम्यक अभ्यास .

आज राजकारणात युवा शक्तीला फार मोठे स्थान प्राप्त झाले आहे. अनेक युवा संघटना राजकारणात सक्रीय भाग घेत आहे. अखिल भारतीय स्तरावरील सर्वच राजकीय पक्षांच्या अखिल भारतीय युवक संघटना आहेत. या संघटनांचा आणि युवाशक्तीचा  सदुपयोग करून घेण्यापेक्षा त्यांच्या द्वारे चळवळ, आंदोलने, संप उभे केले जातात. दंगली घडवून आणल्या जातात. आजच्या विद्यार्थ्यातील त्वेषाचा आवेश्याचा आणि सळसळत्या  तारुण्याचा सरपणासारखा उपयोग केला जातो.त्यांना योग्य मार्गदर्शन लाभत नाही. त्यामुळे स्वत: च्या अंगातील उर्मीचा वात करून देण्यासाठी आजचा तरून वाटेल ते करायला तयार होतो. अश्या युवकांना राजकारणाचे धडे दिल्यास ते उद्याचे उत्तम राजकारणी व राज्यकर्ते होतील. आणि देश्याला उत्तम प्रभावी नेतृत्व लाभेल.

** आजचे राजकारण हे नकारात्मक आहेत. “राजकारण” या शब्दाचा खरा अर्थ सुद्धा ज्याना माहित नाही असे लोक राजकारणात शिरतात. आणि लगेच नेते आणि राजकर्तेही होतात.त्यांना राजकारणाचा गंधहि नाही आणि सामाजिक बांधीलगीची जराही जाणीव नाही. अश्या नटतस्कर, भ्रष्टाचारी, गुन्हेगार, अनैतिक मार्ग चोखाळणार्या लोकांचाच भरणा राजकीय क्ष्रेत्रात अधिकाअधिक  होत आहे.जनतेच्या समस्या, त्यावरील त्यांनी विचारही केलेला नसतो. राजसत्ता लोकांच्या कल्याणार्थ राबवण्याची कल्पना त्यांच्या स्वप्नातही नसते. मग अशी माणसे राजकारणात पडतात तरी कां ? तर स्वत:च्या पोळीवर तूप ओढून घेण्यासाठी, स्वत:च्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी, किंवा प्रतिष्ठीतपणाच्या बुरख्या आडून राजरोष अनैतिक गोष्टी करण्यासाठी. अश्याना राजकारणात अजिबात स्थान मिळू नये. अश्यांच्या हाती देश्याचे नेतृत्व जाऊ देता कामा नये.

**  उत्तम नेता किंवा राजकारणी होण्यासाठी युवकांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. निवडणुकीत चारित्र्यसंपन्न व्यक्तीलाच मत देण्याचे कर्तव्य पार पाडावे. त्यांनी आर्य चाणक्य, लोकमान्य टिळक, अरविंद घोष, सेनापती बापट, महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री , अटलबिहारी बाजपेयी यां सारखी निरपेक्ष सेवावृत्ती, नीतीमूल्यांची जपणूक, आदर्श वागणूक, सत्ता आणि संपत्तीसंबंधीची उदासीनता, संयमी वृत्ती, अभ्यासू वृत्ती, अंगी बाणवली पाहिजे देश्याच्या समस्यांवर अभ्यास करून त्यावर उपाय यजना केल्या पाहिजेत, काहीवर्षे निरलस समाज सेवा केली पाहिजे.हेच युवक उद्याचे आदर्श राज्यकर्ते होऊ शकतात. आणि जनमानसात आवडीचे नेते बनू शकतात. त्यासाठी उत्तम राजकर्त्याचे गुणही त्यांनी आत्मसात केले पाहिजे. श्रीराम, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर यांच्या सारखे “बहु जन हिताय-बहु जन सुखाय” राज्य असले पाहिजे. राज्यकर्ता हा भोगशून्य योगी असावा. आपले राज्य रामराज्या सारखे आदर्श करण्याचा त्याचा प्रयत्न असावा. प्रजेच्या हितासाठी केव्हाही हस्त सत्तेचा व सुखर्सवस्वाचा त्याग करण्याची त्याची तयारी असावी. कारण सत्ता संपत्ती नव्हे, तर समाज सुख हे त्याचे अंतिम ईप्सित असावे.

** असे आदर्श राजकारणी युवक उद्याचे नेते तयार करण्यासाठी ईतर अभ्यासक्रमांप्रमाणे राजकारण प्रशिक्षण केंद्र उभारावे.त्यांत तात्विक व प्रात्यक्षिक  असे दोन भाग असावेत. तात्विक विषयात राज्यशास्त्र,  नीतीशास्त्र, आदर्श समजल्या गेलेल्या  राजांच्या व राज्यांच्या इतिहासाचा व चरित्रांचा अभ्यास असावा. भारतावरील समस्या व त्यावरील उपाय यांचा अभ्यास करण्यासाठी प्रात्यक्षिक भाग असावा. त्यामध्ये देशभर प्रवास करून सखोल अभ्यास करण्यासाठी त्या विशिष्ट परिसरात तेथील स्थानिक लोकांसोबत राहून त्यांच्या अडचनींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.त्यामुळे त्यांच्या अडचणींची तीव्रता लक्षात येईल. व त्यावर योग्य ते उपाय सुचवता येईल. उपायांचा पाठपुरावा करून तेथील अडचणींचे निवारण झाले कि समस्येचा अभ्यास पूर्ण झाला असे समजावे. अश्या दोन तीन समस्यांचा तरी अभ्यास प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात राहून प्रकल्प पद्धतीने केला कि अडचणी, त्यावरील उपाय,त्यासाठी येणारा संभाव्य खर्च रक्कम उभी करण्यासाठी त्या विशिष्ठ परिसरात तेथील स्थानिक लोकान बरोबर राहून त्यांच्या अडचणीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.व ती रक्कम उभी करण्यासाठी आखाव्या लागणार्या योजना व त्यांची प्रत्यक्ष कार्यवाही ईतका समग्र विचार होवून युवकाचा देश्याकडे बघण्याचा एक दृष्टीकोण तयार होईल देश परिस्थितीचे यतार्थ ज्ञान त्यांना होईल. या मार्गातील खाचखड्गे आणि कष्ट लक्षात घेवून ते सर्व झेलण्याची त्याची मानसिक तयारी होईल. नेतृत्व करण्यास लागणार्या गुणांचा परिपोष होवून तो राजकारणात उतरण्या योग्य होईल. अश्या युवकांच्या हाती देश्याचे नेतृत्व गेल्या नंतर  देश्याचे राजकारण आदर्श होवून भारतात स्वराज्याचे सुराज्य म्ह्णजेच रामराज्य निर्माण होईल.

** या प्रशिक्षणातून राजकारणाचे खरे व्यापक स्वरूप त्यांच्या ध्यानी येईल. राजकारण हा गुलाब पुष्पांनी आच्छांदलेला राजमार्ग नसून तो कंटकमी मार्ग असल्याचे त्यांच्या प्रत्ययास येईल. अश्या या मार्गावरून जाण्याचे साहस करणार्या युवकातून यशस्वी राजकारण आणि आदर्श राज्यकर्ते  निर्माण होतील यात शंकाच नाही. तेव्हा या खडतळ राज मार्गा वर येताना विचारपूर्वक पाउल टाकूनच राजकारण स्वीकारले पाहिजे हि समझदारी पाहिजे.

विज्ञांनाचे वरदान! …विज्ञान विषयक दृष्टी!

$
0
0

Vidhnyan shap ki wardan.science progress, science is faithful and unfaithful

महत्वाचे मुद्दे :  विज्ञान हे अखिल मानव जातीच्या विकासासाठी लाभलेले वरदान — विज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात झालेली अपूर्वक्रांती – तंत्रज्ञानामुळे शेतीला झालेला फायदा.- दूरदर्शन, आकाशवाणी, गणकयंत्रे, कृत्रिम उपग्रह यामुळे मानवीजीवन ज्ञानपूर्ण,वेगवान व सुलभ झाले आहे.  यंत्राने झालेले अपघात टळण्यासाठी विज्ञानाचीच मदत – विज्ञान आधुनिक युगातला देव.

विज्ञान हे अखिल मानवजातीस मिळालेले वरदानच आहे.पण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण कसा ठेवतो.यावर त्याची योग्ययोग्यता आपल्याला दिसत असते. विज्ञान हा शापच आहे असे म्हणणारयांना विज्ञानामुळे जगात घडलेली उत्क्रांती दिसण्यापेक्षा विज्ञांनाचा दुरुपयोग करून माणसाने केलेला विध्वंसच तेवढा दिसतो.

*विज्ञान हे विस्तवा प्रमाणे आहे. त्यात तुम्ही हात घालून भाजून घेता की त्याचा अन्न शिजवायला उपयोग करता हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून असते. विज्ञानाचे उपयोग पुष्कळ आहेत. मात्र आपण त्याचा योग्य तर्हेने वापर करून घेतला पाहिजे.

*विज्ञान हे अखिल मानवजातीच्या विकासासाठी लाभलेले एक प्रभावी साधन आहे. विज्ञानाची झेप आज कोठपर्यंत गेली आहे? चंद्र, मंगळाचे वेध घेतले ते विज्ञानामुळेच ! विज्ञानाच्या साहाय्यामुळेच सिद्धातांच्या आणि कल्पनांच्या मनोऱ्यानी तो गगनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक क्षेत्रात विज्ञानाने सिंहाचा वाटा उचलेला आहे.

*आपण आज पाहतो कि माणसाला ‘टेस्टट्यूब बेबी’ चा शोध लागलेला आहे. ‘क्ष’ किरणांच्या शोधामुळे  अनेक आजारांचे निदान करणे सुलभ झाले आहे. स्क्यनिंग सारख्या काही उप्च्यार पद्धतीमुळे ‘ब्रेन ट्युमर’ (Brain Tumer) सारखा असाध्य रोग आता उपचारक्षम झालेला आहे. एड्स(HIV ADS), ल्युकेमिया(Leukemia), कर्करोग(Cancer) यांसारख्या अजून असाध्य अश्या रोगांवर याही पेक्षा प्रभावी उपचार शोधण्यासाठी शास्त्रज्ञ धडपड करीतच आहेत. तसेच अपंगान्साठी कृत्रिम अवयवां चा शोध लाऊन त्यांच्या समस्या दूर झालेल्या आहेत. ते स्वयंपूर्ण झालेले आहेत. त्याच प्रमाणे रोपण आणि प्लास्टिकसर्जरीद्वारा ईतर दुय्यम न्यूनत्व काढता येणे सहजसुलभ झाले आहेत.

*भारत हा कृषीप्रधान देश आहे. ‘जय जवान जय किसान’ हा भारताचा मूलमंत्र आहे. शेतकर्यांच्या मदतीलाहि आता विज्ञान गेले आहे. ट्यक्टरनलिकासंरचनामुळे पाण्याची व शेतीची कामे सुलभ झाली आहे. परदेशात तर शेतीची सर्वच कामे यंत्रा द्वारेच होतात. आपल्या भारतातहि बरीच कामे यंत्राद्वारे करण्याच्या प्रगतीपथावर आहे. यामुळे  वेळेची बचत, मनुष्यबळ कमी लागते हे दोन्ही फायदे झालेत. आज विज्ञानाच्या सहाय्याने उत्तम खते, बी-बियाणे यांद्वारा शेतकरी आपले पिक आणि उत्पन्न वाढवू शकला आहे. मृदासंधारणासारख्या व सर्वेक्षणासारख्या काही उपाय योजनांनी शेतकर्याला अधिक आनंदी बनविले आहे.

*हल्ली दूरदर्शन आणि आकाशवाणी या ज्ञानदानाची व ज्ञांनार्जनाची साधने आहेत. या द्वारे खेड्यातील बहुतांशी लोकांना सामुहिक शिक्षण दिले जाऊ शकते. आज आकाशवाणीचे कार्यक्रम घराघरातून एकले जातात.हि किमया विज्ञांणाचीच नव्हे का !  त्यामुळे आपले मनोरंजन व ज्ञांनार्जन घर बसल्या होते. केवळ कांही सेकंदात मोठमोठ्या अंकांची बेरीज आपण गणकयंत्राद्वारे मिळवू शकतो. परग्रहांचा शोध लावणार्या कृत्रिम उपग्रहांवर संगनकाच्या सहाय्याने नियन्त्र ठेवता येते. हजार माणसांचे आणि यंत्राचे काम आज एक गणकयंत्र यंत्रमानवाच्या सहाय्याने सहज तेणे करू शकतो. हि किमया विज्ञांनाचीच की ! आज आपण अल्पावधीतच ईच्छित स्थळी जाऊ शकतो.त्यासाठी अनेक वाहने उपलब्ध आहेत.

*यंत्रे आली, वाहने आली त्यामागे अपघात हेही आलेच पण ते टाळण्यासाठी विज्ञांनाणेच सुविधा पुरविल्या आहेत. जागोजागी सिग्नल लावले असल्याने सांकेतिक खुणांच्या स्वरूपाने आता रहदारी नियंत्रणा खाली  आली आहे. आज माणूस यंत्रमानव प्रमाणे अहोरात्र काम करतो. त्याला आराम देण्यासाठी वीज पंख्याच्या रूपाने दासी बनून वारा घालते.दूरदर्शन कलावंताच्या रूपाने मनोरंजन करते. आज विज्ञांनाच्या सहाय्याने कृत्रिम धागे व त्या पासून मिळणारे कपडे व अधिक टिकाऊ आणि उच्चप्रतीचे असतात. आज मानव पूर्णत: विज्ञांनावर अवलंबून आहे. विज्ञान आजच्या युगातील देव आणि जादुगरही आहे.

एका गर्दग्रस्ताची आत्मकथा

$
0
0

story of the drug addict

” एs हमाल ” मी दुकाना समोर बसलेल्या मळकट कपड्यातल्या, दाढी, केस वाढलेल्या एका असती पंजर इसमाला हाक मारली. त्याच्या डोक्यावर सामान देऊन आम्ही घराची वाट चालू लागल. मधून मधून तो थकून थांबत होता. घामाने निथळत होता. काय रे नुकताच हमाली करू लागला काय ? सवय दिसत नाही ” ” होय साहेब तुमचे सामान मी घेतलय पहिल्यांदाच . मी हमाल नाही ”

* मी चांगल्या घरातील तरून आहे. पण माझ्या वेश्यामुळे मला कोणी नोकरी देत नाही रोज मी त्या दुकाना समोर माझ्या दुरवस्थेचा व भवितव्याचा विचार करीत बसलेला असतो.”  ” मग तुझी हि अवस्था का ? ” साहेब मी गर्दग्रस्त होतो ( Drugs addict). नुकतच माझ व्यसन सुटले. पण पूर्वीची उमेद, उत्साह, जम मला अजून लाभलेला नाही. त्या गर्द ने मला इतक पोखरल आहे. कि माझ्या श्रीराच फक्त चिपाड राहील. एके काळी मी शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होती. नाही ना हे खरे वाटत? पण ते अगदी खरे आहे. मी बुद्धिमान होतो बारावीला मी ९८% गुण मिळवून इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. वस्तीगृहात राहण्याची सक्ती होती तिथे राहायला गेल्यावर सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांशी संबंध आला. तिथे मला गर्द ची नश्या कळली. पहिल्यांदा उत्सुकता, सक्ती नंतर व्यसनासक्त होऊन शेवटी मी सतत गर्द ओढू लागलो. महागड व्यसन, व्यसनपूर्तीसाठी पूर्णपणे वेडा झालो. वह्या, पुस्तके विकली. फी चे पैसे व्यसनात घालविले. नंतर प्राच्यार्यान्नि वडिलांना कळविले. वडील आले पण तेव्हा फार उशीर झाला होता. मी तर या व्यसनाच्या इतका अधीन झालो होतो कि आई-वडिलाच दु:ख त्याचे प्रेम, घराची होणारी वाताहात काही काही मला दिसत नव्हत. अखेर प्राच्यार्यांनी मला कॉलेज मधून काढले.  माझे वडील मला घरी घेऊन आले.

* वडिलांनी मला डॉ. कडे नेल. डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करून घेतल. व वडील घरी गेले.वार्ड बॉयला माझ्या कडे लक्ष ठेवण्यास सांगितले. डॉक्टरही निघुन गेले. माझ्या शरीरातील गर्द्ची मात्रा संपत आली होती (Lower the drugs quantity). मी अश्वस्त होऊ लागलो. थरथरू लागलो. घाम फुटला , वेडापिसा झालो. आणि वार्डबॉय ची नजर चुकवून पळालो-गर्द च्या शोधात. अड्ड्यावर पोचलो. गर्द घेतली आणि मगच माझा जीव शांत झाला. गरी पोचल्यावर परत माझी रवानगी रुग्नाल्यात झाली. पुन्हा तेच डॉ. तेच रुग्णालय, पण वडिलांनी डॉ. आशा सोडली नव्हती. यावेळेस मला मात्र मोकळ सोडले नाही. एका खोलीत दोन-तीन दिवस कोंडून ठेवले. गर्द अभावी माझी अवस्था पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे झाली. मी खोलीतल्या खोलीत धावत होतो. पुन्हा शक्ती संपली कि पडत होतो. मोठमोठ्याने ओरडत होतो. रडत होतो. शिव्या देत होतो पण माझी सुटका होत नव्हती. हळूहळू माझी शक्ती शिन झाली. अन्नावरची वासना कधीचीच उडाली होती. कधी म्ल्म्लायचं, कधी उलट्या व्हायच्या कधी जुलाब व्हायचे. हे सर्व गर्दचा अंश शरीरात नसल्याने व्हायचे गर्दच व्यसन लागले कि ते शरीरात सतत असणे आवश्यक होते.ते नसले तर माणूस माणूस राहात नाही. हळूहळू मी शांत होत होतो.डोक ठिकाणावर आले होत.डोक दुखायचं मी विचार करू शकत होतो.माझी मलाच लाज वाटायची पुन्हा पूर्वायुष्य आठवल कि गर्द्ची आठवण व्हायची. पण मी प्रयत्न पूर्वक त्यावर काबू करू शकत होतो. कारण मला आता बर व्हायचं होत, पुन्हा माणसात यायचं होत.

*  ‘ रुग्णालयात असताना विचार करू लागलो कि वाटायचं कि आपल्या सारखे किती तरी हुश्यार, होतकरू विद्यार्थी या व्यसनान पछाडले गेले असतील.किती तरी तरुणांच्या आयुष्याचे मातेरे झाले असेल, किती तरी घरे उजाड झाली असतील.कालकुटाहूनहि जहाल हे विष आलं कुठून? त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर भारताच्या भावी पिढी मध्ये गर्दग्रस्तंची संख्या बेसुमार  वाढतच जाईल. भारताची पवित्र भूमी स्मशानभुमी होईल. हे सर्व रोखले पाहिजे. अल्कोहोनिम ऑनानिमस (Alcoholic anemia) सारख्या संस्थानच्या साहायाने तरुणांना जागृत केले पाहिजे. छापे घालून गर्दचे दलाल व साठे जप्त केले पाहिजे. गर्द्ची विक्री करणार्यांवर कायदेशीर इलाज केला पाहिजे. या विचारान मी एवढा भारलो कि माझी स्वत:ची, गर्दच्या व्यसनातून माझ्या मननोबलाची मी सुटका करून घेतली. “माझे भवितव्य भीषण आहे याची मला जाणीव आहे. पण माणूस हा स्वत:च्या जीवनाचा शिल्पकार आहे. असा माझा विश्वास आहे. आणि म्हणूनच माझे उज्ज्वल भवितव्य मी घडवू शकेन. मी माणसात आलो याचाच मला आनंद आहे. या  कामानेच माझ्या उज्ज्वल भवितव्याचा शुभारंभ झाला आहे. माझ्या या पुनरुज्जीवनातून माझ्या सारख्या अनेक गर्दग्रस्त तरुणांना स्फूर्ती मिळून तेही या भयानक व्यसनातून मुक्त होवून सुखी ( Free from drugs addictions ), निरामय जीवन जगू शकतील. त्या दृष्टीने आजचा दिवस माझ्या जीवनातील मोठा भाग्याचा, असच मी मानतो.”

*  तेवढ्यात  माझे घर आले.त्या तरुणाने सामान घरात ठेवले. दिलेले पैसे घेतले आणि माझे मन:पूर्वक आभात मानून तो परतला.

Story Of Drugs addict person.

आजचे स्त्री –जीवन !

$
0
0

Stri Jivan, life of womenमहत्वाचे मुद्दे : पुरातन काळातील गार्गी, मैत्रेयी, कैकेयी यानसारख्या विद्या कलानिपुन स्त्रिया — आधुनिक जगातील समानतेची जाणीव — विविध स्त्री-मुक्ती संघटनाचे कार्य — सार्वजनिक क्षेत्रातील स्त्रियांचे कर्तुत्व व अष्टपैलूत्व — घरची व बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी — आजचे स्त्री – जीवन सुखी व समृद्ध होण्याची गरज.

* ‘ न स्त्री स्वातंत्र्यम् अहर्ति ‘ असे मनूने सांगितले आहे.पुराणकालीन सनातन, कर्मठ संस्कृतीमुळे स्त्रीचे स्वातंत्र्य लयाला गेले. आणि तिचे परावलंबित्व सुरु झाले. पुरातन काळात डोकावले तर तेव्हाची स्त्री ही वेदशास्त्र संपन्न आढळते. तिला शास्त्रांस्त्राचे शिक्षण दिले जात असे. गार्गी, मैत्रेयी यांसारख्या वेदशास्त्रनिपुण कैकेयीसारख्या युद्धशास्त्रात कुशल असणार्या स्त्रिया सर्व प्रकारच्या विद्याकलांत पारंगत होत्या.

*  आज भारतात मुलींना मोफत शिक्षण (Free education) दिले जाते. तिच्या साठी नौकरीत राखीव जागा ठेवल्या आहेत. संपत्तीचा वारशा हक्क तिलाही देण्यात आलेला आहे. समान वेतनाचा व समान नागरिकत्वाचा दर्जा देऊन सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यात आली आहे. ज्या कुटुंबात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव विकसित झालेली आहे. अश्या घरातील मुलींनाही स्वत:चे छंद, आरोग्य, ध्येय इत्यादी जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व तिचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

* स्त्रीच्या स्वत:च्या कार्य शक्तीला, बुद्धीला, आणि कर्तुत्वाला पूर्ण वाव मिळावा आणि समाजात स्त्रीला समान सामाजिक दर्जा मिळावा म्हणून स्त्री-मुक्ती चळवळ निर्माण झाली. विविध स्त्री-मुक्ती संघटनांच्या माध्यमाद्वारे समाजात आणि विशेषत: स्त्रियांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे. यासाठी स्त्रियांना त्यांच्या हिताच्या कायद्यांचे ज्ञान व मदत दिली जात आहे. घटस्पोटीत, परित्यक्ता, विधवा आणि निराधार स्त्रियांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून आर्थिक मदत केली जात आहे. रोजगार मिळवून दिला जात आहे. ही मदत समाजातील सर्व थरांतील सर्व धर्माच्या स्त्रियांसाठी खुली आहे.

* आजची स्त्री हि डॉ, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, वा आमदार अश्या महत्वाच्या पदांवर काम करीत असली तरी ह्या कर्तबगारीपेक्षा ती घरकाम किती करते या वरून समाज तिचे मोठेपण व कर्तुत्व आजही ठरवितो. विवाहापूर्वी जोपासलेल्या कला, छंद, शिक्षण याकडे विवाहानंतर दुर्लक्ष केले जाते. संसारातील जबाबदार्यांमुळे वेळे अभावी विवाहापुर्वीची आष्टपैलू स्त्री विवाहानंतर केवळ चोवीस तासाची बांधील अशी चाकरमानी ठरते. संपूर्ण जबाबदारीचे एकटीवर पडणारे ओझे आणि सामाजिक दृष्टीकोन यांमुळे जबाबदारीची व मोठ्या अधिकाराची पदे बहुसंख्य स्त्रियांना कुवत व पात्रता असून सुद्धा नाकारावी लागतात. कारण त्या पदासाठी लागणारा वेळ त्या देवू शकत नाही. म्हणून विवाहा नंतर सुद्धा स्त्रीला स्वत:चे व्यक्तिमत्व विकसित करण्याजोगी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. आज काही प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रात स्त्रियांच्या नैसर्गिक शक्तींना व गुणांना वाव मिळत आहे. पण अश्या स्त्रियांची संख्या खूप कमी आहे.

* आधुनिक समाजरचणनेमध्ये स्त्रीला घराबाहेर पडून पुरुष्याच्या बरोबरीने अर्थार्जन करणे अपरिहार्य झाले आहे. घरची व बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागत असल्याने तिची तारे वरची कसरत चालू असते. याचा विचार शासकीय पातळीवर होवून स्त्रियांना बालसंगोपनास आवश्यक असणार्या प्रसूतीरजा, स्तनपानरजा, व अन्य सवलती देण्याचे कायदे झाले आहेत. कामाच्या ठिकाणी मुलांना सांभाळन्यासाठी पाळणाघरे,जेवणाच्या सोयी साठी झुणका-भाकर केंद्रे, भोजनगृहे, स्त्रियां साठी वसतीगृहे ईत्यादी सुविधा त्यांच्या साठी करण्यात आलेल्या आहे.

* आजकाल गृहोपयोगी साधने निर्माण झाली म्हणून स्त्रीला घरात जास्त काम नसते हे म्हणणे म्हणजे तिच्यावर अन्याय करणारे आहे. उलट या फावल्या वेळात गृहोपयोगी वस्तुंची खरेदी करणे,मुलांचे अभ्यास घेणे, त्यांना शाळेत पोचविणे व आणणे  घरचे हिशोब राखणे, यां सारखी अशी वेळखाऊ कामे तिच्याकडे आपोआपच आलेली आहे.त्यामुळे तिची ओढाथांब थांबलेली नाही.

* घरच्या कर्त्या पुरुष्यासह अन्य घटकांनी स्त्रीच्या बरोबरीने घरकामाची जबाबदारी उचलून तिला मदत करायला हवी. त्या दृष्टीने तिच्या व्यवसायात वा नोकरीत आवश्यक ते सहकार्य व प्रोत्साहन तिला द्यायला हवे.सर्व बाबतीत स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची मोकळीक तिला दिल्यास खर्या अर्थाने समाजात स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल व त्यामुळे आजचे स्त्री-जीवन खर्या अर्थाने सुखी व समृद्ध होईल.

एक रद्दीत पडलेल्या जीर्ण पुस्तकाची आत्मकथा

$
0
0

मी पुस्तक बोलतेय…..

open old book and its story
बर्याच दिवसापासून कुणाजवळ आपल्या मनातील बोलाव असे वाटत होते. बरे झाले मी तुमच्या सारख्या सहृदय मनुष्याच्या हाती आले. म्हणूनच तुमच्या जवळ मन मोकळे करायची इच्छा आहे. माझ्या जन्माची कथा वेगळीच आहे. सर्वात पहिले एका लेखकाच्या हातून खूप परिश्रमाने मला लिहिल्या गेले. त्यानंतर मला एका प्रेस मध्ये पाठवण्यात आले. तेथील यंत्रांच्या आवाजाने तर मला बहिरेच करून सोडले. न जाणे असंख्य अक्षराने जोडण्या करीता मला मशिनरी खाली कितीतरी वेळा कुचलण्यात आले. त्या वेळेची आठवण होताच मला आजही घाबरायला होते. त्यानंतर माझ्या देहात सुया टोचण्यात आल्या व मलम लावून माझावर मालिश करण्यात आली व नवनवीन कागद लावून सुंदर बनविण्यात आले. मग तर माझे रूप पाहण्यासारखेच झाले. नंतर मला दुकानाच्या शोकेस मध्ये ठेवण्यात आले.
*  काही दिवसांनीच मला ते दुकान सोडून एका व्यक्ती सोबत. त्यांच्या घरी जावे लागले तेच माझे मालक. ते मला फार जपून ठेवायचे. माझा एक एक पान ते वाचायचे व वाचल्या नंतर पानावर काही तरी  निश्यान करायचे. त्यांनी संपूर्ण मला वाचल्या नंतर काही दिवस मी तिथेच राहिले. मग मला त्यांच्या मित्राने मला नेले. मला दुसरे घर मिळाले.त्या व्यक्तीने मला आवडतीच बनविले ते मला नियमित वाचत माझी संपूर्ण काळजी घेत. मला चांगल्या ठिकाणी ठेवत. मला धुळीचा स्पर्श सुद्धा होवू देत नसत. त्यांनी पण माझ्या पानावर जिथे जिथे त्यांना आवडीचे वाटत असे तिथे निशाण करीत. तिथे माझी फार कदर झाली मला पण त्यांच्याकडे छान वाटायचे.
*   एक दिवस ते प्रवासाला निघाले तेव्हा त्यांनी मलाही न विसरता सोबत घेतले. पण परतीच्या वेळी मात्र मला वाचता वाचता त्यांना झोप आली. मला काळी ठेवले. पण उतरताना ते मला तिथेच विसरले व उतरून गेले. मी काय करणार बिचारी मला काहीच सुचेना. त्या व्यक्ती माझी आठवण कशी विसरलेत हेच कळत नव्हते. मला वाईट वाटले.
*  मी तेथेच होते. माझ दुर्भाग्यच म्हणावे लागेल, माझ्या बाजूला दुसरी व्यक्ती येवून बसली.मी त्यांच्या हाती लागले. त्यांनी माझे दोन तीन पाने वाचलीत व मला तेथेच तिरस्कार केल्या प्रमाणे आद्डले.मला बघून त्याला काहीच मजा आली नसावी. मला त्यांचा राग आला खरा!  मनात वाटले कि हा व्यक्ती बुद्धू असावा…
*  पण त्यांच्या बाजूने त्यांची पत्नी बसलेली होती. ती समजदार व हुश्यार होती. तिने मला लगेच उचलले व माझ्या एक दोन ओळी वाचल्या, व लगेच एकदम खुश होवून माझ्यावर थाप मारली. व चुंबन केल. मलाही हर्ष झाला.
* एक दिवस मी न कळत तिथून एका रद्दी वाल्याच्या हाती लागले. तो बिचारा अशिक्षित, अडाणी तो माझी किंमत काय जाणणार त्याने माझे सुंदर मुखपृष्ठ फाडले. मला त्याच राग आला किती निर्दयी हा… मी माझ्या दुर्भाग्याला कोसत होते. मला माझी चिंता होती. मी कुठल्या व्यक्तीच्या हाती लागले. कि ज्याला माझी किंमत कळू शकत नाही ! मला वाईट वाटत होते. मी एका ढिगार्याच्या बाजूला पडलेली होते. खूप दिवस त्या घाणेरड्या जागी राहिले.मला रडायला येत होते. जुन्या आठवणी जाग्या होत होत्या.
*  पण आज मी खुश आहे. कि मी तुमच्या सारख्या सहृदय व्यक्तीच्या हाती लागले. जगात राहून मी बरेच काही जाणले. कुणी दयाळू तर कुणी कठोर,पण कितीही कठोर व्यक्ती असले तरी त्यांचे प्रेम मला मिळाले. त्यांच्या मनातील सुंदरता फुलांप्रमाणे मधुरता मी बघितली आहे. त्यांच्या कडून मला शीतल छाया मिळाली आहे. मी एका लेखकाच्या हातून माझा जन्म झाला असला तरी माझ्या पासून ज्ञान प्राप्त करून घेणार्या कत्येक व्यक्ती मी पाहिल्यात ! हाच अनुभव मला आज आनंद देत आहे…
* तुमच्या हाती येवून मला माझ्या भाग्याची किंमत कळली आहे. माझ्या पासून यथाशक्ती मानवाला लाभलेले ज्ञान, व आनंद बघून त्यांची सेवा झाल्याचा आनंद मला मिळाला. मला लेखकाने किती सुंदर, किमती रूप प्राप्त करून दिल्याची जाणीव होत आहे आणि या नंतरही मी अशीच सेवा करीत राहीन अशी ईच्छा आहे. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे जीवन मी जगले होते..
*  पण काय करू माझे अंग आता खिळखिळे होत आहे.माझ्या पाना-पाना वर आता श्याई चे डाग पडलेले आहेत. मला ज्या धाग्यांनी बांधले गेले होते ते आता तुटत आहे. तरी माझ्या कडून तुम्हाला आनंद मिळत असेल. तर तुम्ही मला जपा तर मी तुम्हाला अजूनही ज्ञान व आनंद देण्यास तयार आहे. मी माझ्या अंतापर्यंत प्रयत्न करेन.  यातच माझी धन्यता समझेन.

नारी…

$
0
0

nari shakti

लज्जा : नारीचे भूषण -

  असन्तुष्टा व्दिजा नष्टा: सन्तुष्टा एव पार्थिवा: |
  सलज्जा गणिका नष्टा लज्जाहीना : कुलस्त्रिय: ||

संतोषहीन ब्राम्हण, संतोषी राजा, लाजवंती वेश्या आणि लज्जाहीन कुलवधू यांचा नाश निश्चित आहे.  नारी कडे सर्वात मौल्यवान संपत्ती आहे तिचे सतीत्व, या सतीत्वाचे रक्षणच म्हणजे नारीचे खरे रक्षण होय. म्हणूनच ती बाह्य व्यवहार-सोडूनच घरची राणी बनून राह्ते. स्त्रियांसाठी स्त्रीयोचीत लज्जा सोडून पुरुष्याना नि:संकोच भेटणे, त्यांच्या बरोबर नाटक-सिनेमाला जाणे, खाणे-पिणे आणि नृत्य ई क़रने सर्वात अधिक हानिकारक आहे. आजकाल जे लोक स्त्रियांच्या उद्धारासाठी, स्त्रीजातीवर सहानुभूती व द्या करण्याच्या भावनेने तिला घरातून खेचून बाजारात पुरुश्याच्या बरोबरीने उभी करण्यात आपले कर्तव्य मानतात, ते लोक एकतर त्यांचा भाव शुद्ध असूनही भ्रमात आहेत किंवा जाणूनबुजून आपल्या वासनेला दया-सहानुभूतीचे पांघरून घालून स्त्री-जातीच्या सत्यानाशामध्ये संलग्न आहेत.

स्त्रीमध्ये लज्जा नैसर्गिक आहेच हा दैवीभाव तिच्यात स्वाभाविकच असतो त्यामुळे सतीत्व आणि पतीव्रत्याचे पोषण- संरक्षण  होते. म्हणूनच लज्जा स्त्रीचे भूषण म्हटलेले आहे. लज्जेचा परित्याग करून पुरुष्याप्रमाणे सर्वत्र फिरण्यात स्त्रीचा गौरव नाहि. हे एक वैज्ञानीक रहस्य आहे कि ज्या स्त्रीवर पुष्कळशा  पुरुष्याची विकारी-दृष्टी पडते तिच्या चारित्र्याची निश्चितच हानी होते. मनुष्याच्या मानसिक भावनांचा विद्युत प्रभाव त्यांच्या शरीरातून निरंतर वाहत असतो. हा प्रवाह शब्द, स्पर्श आणि दृष्टी द्वारे दुसर्यांच्या मनावर आणि शरीरावर परिणाम करतो.

लाज सोडून पुरुष्यामध्ये नि:संकोच हिंडण्या -फिरण्याने पवित्र पतीव्रत्याची हानी होते.कारण या स्थितीत स्त्रीला हजारो पुरुष्याच्या विकृत,कामुक,दुषित दृष्टीला बळी पडावे लागते.

“स्त्रीची कीर्ती स्पटिकाच्या दर्पणा प्रमाणे आहे, जो अत्यंत उज्ज्वल आणि चमकदार असून सुद्धा एका श्वासाने देखील मलीन होऊ लागतो”. :  सर वांटेस, यांचे विचार ।

*” सर्वात अधिक सुगंध असलेली स्त्री तीच आहे कि जिचा गंध कोणालाच मिळत नाही”. : प्लैन्टस, यांचे विचार .
*”स्त्री हे एक असे फुल आहे जे छायेतच ( घरातच ) आपला सुगंध पसरविते”. :    लेमेनिस, यांचे विचार .
*”श्रेष्ठ सुवासिक फुल लाजाळू आणि चित्ताकर्षक असते” . :   वर्ड्स वर्थ, यांचे विचार .

*  जी वस्तू जेवढी मौल्यवान आणि प्रिय असते ती तेवढीच अधिक सावधानतेने व सन्मानाने, सुरक्षित ठेवली जाते. स्त्री पुरुषाच्या विषय-विलासाची सामुग्री नसून संपूर्ण ग्रहस्थ-धर्मा मध्ये सहचारिणी आहे. अनेक पुरुश्याची दृष्टी स्त्रीवर पडू नये आणि विपरीत, म्हणजे स्त्रीची दृष्टी अनेक पुरुष्यावर पडू नये  या साठीच तिला बाजारात,न हिंडता घरात राहण्याचे विधान आहे.

याचा अर्थ असा नाही की ,  तिने परंपरेच्या चक्रात गुरफटून राहावे क़पडे-दागिने, मुले-बाळे यांतच मग्न राहावे, डोळे बंद करून जगावे ओझे वाहून नेणारी बाहुली बनावे, नाही.  स्त्रीने या अंध: काराकडे नेणार्या मलीन रस्त्यांपासून दूर राहिले पाहिजे आपल्या अंतरातील खजिना साधनेच्या प्रकाशाने शोधावयाचा आहे. मनुष्य जीवन मिळाले आहे तर आपल्या व्यवहारिक कर्तव्याचे पालन करीत-करीत परम कर्तव्य असलेल्या आत्मज्ञांनाची सिद्धी करावयाची आहे. त्यासाठी पातिव्रत्य आवश्यक आहे. त्यांच आधारावर चारीत्र्याची पूर्ण ईमारत उभी आहे. जी स्त्री उच्छ्रुखलेपासून दूर राहून आपल्या गौरवाने गौरवान्वित होते, आपल्या वास्तविक महिमेने महिमामयी होते, तिच्यामुळे हि पृथ्वी देखील पावन होते म्हणून तिने आपले पावित्र्य स्वत: जपले पाहिजे.

* आजकाल सुधारणे च्या नावावर स्त्रियांना बरोबर घेवून हिंडण्या फिरण्याची व हॉटेलात जाऊन एकाच टेबलावर खाण्या-पिण्याची प्रथा वाढत आहे. अशा स्त्री-पुरुषांनी प्रामाणिकपणे आपल्या मनोद्शेचे अवलोकन केले पाहिजे आणि योग्य प्रकारे विचार करून सर्वांनी अशी व्यवस्था केली पाहिजे की ज्यामुळे नारीस भूषण असलेल्या लज्जेचे रक्षण होईल आणि तिचा पतिव्रता धर्म अक्षय टिकून राहील. म्हणूनच स्त्रीयांनसाठी पुरुषलयांमध्ये, बाजारा मध्ये न हिंडता घरातच राहण्याचे विधान आहे.

आजची शिक्षण पद्धती

$
0
0

The Modern Education “System”

महत्वाचे मुद्दे : शिक्षण म्हणजे काय ?(What is education), – पूर्वीची शिक्षण पद्धती (Old education system), – आजचे शिक्षण पुस्तकी स्वरूपाचे (Bookish education system), – वेगवेगळ्या कला विभागाचे शिक्षण आवश्यक, – शिक्षण पद्धतीत आमुलाग्र परिवर्तनाची गरज, – सुशिक्षित बनणार्या शिक्षण पद्धतीपेक्षा सुजाण व सुसंस्कृत बनणारे शिक्षण आवश्यक.

*  मानसिक गुणाचे संवर्धन आणि दोषांचे उच्चाटन जे करते ते शिक्षण. जगात वावरण्यासाठी, स्वत:चा सर्वांगिण विकास करून घेण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान म्हणजेच शिक्षण. पूर्वीच्याकाळी प्रत्येक वर्णासाठी भिन्न स्वरूपाचे शिक्षण होते. ब्राम्हणवर्ग  वेदविद्येचे, क्षत्रिय शस्त्रविद्येचे, आणि वैश्य व शुद्र हे आपापल्या वाडवडीलां कडून चालत आलेल्या कलेचे शिक्षण घेत असत. पण आज ही चातुर्वर्ण्य पद्धती नाहीशी झाली. त्यामुळे शिक्षण पद्धती बदललेली आहे.

*  आजचे शिक्षण हे पूर्ण पुस्तकी स्वरूपाचे आहे. पुस्तकी माहिती ठराविक वेळेत पुन्हा उतरवून काढणे याला आजकाल ’परीक्षा’  म्हटले जाते. पुस्तका बाहेरील कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची मुभा विद्यार्थ्याला आणि शिक्षकालाही नसते. त्यामुळे विद्यार्थ्याची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता नष्ट होते.  स्वत:च्या बुद्धीचा वापर करण्याची संधी न मिळाल्याने विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता कळू शकत नाही. पदव्यांना अवास्तव महत्व प्राप्त होवून त्या मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु होते. याच कारणामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच, अन्य शैक्षणिक क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळवणे हि गोष्ट आज जिकिरीची होऊन बसली आहे. ज्याचे पाठांतर उत्तम तो अत्यंत हुशार असा गैरसमज रूढ झाला आहे.

*  दिवसे दिवस महाविद्द्यालयातुन बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या वाढत आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा दर्जा वेगाने घसरत आहे. त्यामुळे देशाचे फार मोठे नुकसान होत आहे. आज वाढत्या औद्योगिकिकरणाच्या परिस्थितीत व्यवसायाभिमुख आणि प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षणाची निकडीची गरज आहे.परंतु ती  गरज आज पूर्ण होत नाही. पुस्तकी शिक्षणावर जास्त भर दिलेला आढळतो. व्यक्ती विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यास नृत्य, गायन, शिल्पकला इत्यादी कलाविभागांचाही शिक्षणात अंतर्भाव करायला ह्वा. दुर्दैवाने या विषयांकडे अजूनही उपेक्षेने पाहिले जाते.

*  शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वकष विकास साधण्यासाठी शिक्षणपद्धतीत आमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे. भाकरी मिळवून देणारे सुसंस्कार घडविणारे, स्वदेश, स्वभाषा, स्वदेशबांधवांच्याविषयी नितांत अभिमान निर्माण करणारे शिक्षण ह्वे आहे. व्यक्तीविकासाबरोबरच या व्यक्तीच्याद्वारे समाज विकास होईल. व राष्ट्र सर्व दृष्टीने संपन्न होईल असे शिक्षण मिळणे  जरुरीचे आहे. भारत सरकारने यादृष्टीने टाकलेली पावले स्वागतार्ह आहेत असे म्हटले पाहिजे.

*  आजच्या शिकण पद्धतीतून मनुष्य सुशिक्षित होतो पण तो सुजाण, सुसंस्कृत होतोच असे नाही. वास्तविक शिक्षण हा पवित्र संस्कार आहे. शिक्षण घेतलेली व्यक्ती सुसंस्कृत असायला ह्वी. दुर्दैवाने तसे फारसे दिसत नाही. उलट अधिकतर  माणसे आत्मकेंद्रित, स्वार्थ व संकुचित वृत्तीची झालेली आढळतात. हुंड्याची राक्षसी प्रथा सुशिक्षितांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. अशिक्षित शेतकऱ्याच्या घरी त्याची पत्नी ही गुहलक्ष्मी मानली जाते. बहुसंख्य सुशिक्षितांमध्ये घरी येणारी नववधू ही केवळ एक उपभोग्य वस्तू, माहेराहून खूप मोठा हुंडा घेवून येणारी व्यक्ती असेच समजले जाते. कोणताही मोठा त्याग करण्याची वेळ आली तर अडाणी, अशिक्षित माणूस मागचा- पुढचा विचार न करता कर्तव्य भावनेने त्याग करतो. उलट अश्या प्रत्येक गोष्टीचे स्वार्थासाठी भांडवल करण्याची वृत्ती सुशिक्षितात आढळते. गुन्हेगारीचे प्रकार व प्रमाण सुशिक्षितांतच अधिक आढळतात. आजच्या शिक्षणपद्धतीची ही शोकांतिका आहे.


नमन लंबोधरा

$
0
0

marathi abhangमराठी सारस्वतात मराठीतील आद्य आत्म चरित्रकार म्हणून प्रसिद्ध झालेले श्री संत नामदेव माहाराजांच्या प्रसिद्ध गाथे मधील काही अभंग;…
।। नमन लंबोधरा ।।
प्रथम नमन करू गणनाथा । उमाशंकराचीया सुता ।
चरणावरी ठेउनी माथा  । साष्टांगी आता दंडवत ।।
दुसरी वंदू सारजा । जे चतुराननाची आत्मजा ।
वाकसिद्धी पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत ।।
आता वंदू देव ब्राम्हण । ज्यांचेनी पुण्य पावन ।
प्रसंन्न होऊनी श्रोते जन । त्या माझे नमन दंडवत ।।
आतां  वंदू  साधूसज्जन । रात्रदिवस हरीचे ध्यान ।
विठ्ठलनाम उच्चांरिती जन त्या माझे नमन दंडवत ।।
आता नमू रंग भूमिका  । कीर्तनीं  उभी लोका ।
ताळ मृदुंग श्रोते देखा । त्या माझे दंडवत ।।
ऐसे नमन करुनी सकळा । हरी  बोले बोबड्या बोला ।
अज्ञान म्हणुनी आपल्या बाळा । सकळा  नामा म्हणे ।।६।।
……………………………………………………………………………………
(Lambodhara Tuj shudand)

लंबोधरा तुज शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चीन्हांचा ।।
चतुर्भुजे आयुधें शोभताती हाती । भक्ताला रक्षिती निरंतर ।।
भव्यरूप तुझे उंदीर वाहना । नमन चरणा करीतसे ।।
तुझे नाम घेतां दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या नामें ।।
चौदा विद्या तुझे कृपेने येतील । मुके बोलतील वेदघोष ।।
रुणझुण पायी वाजताती वाळे । एकोणी भुलले मन माझे ।।
भक्तवत्सला एकें पार्वतीनंदना । नमन चरनां करीतसें ।।
नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती । वर्णीतसे कीर्ती कृष्णाजीची ।।८।।
……………………………………………………………………………………
।। नमन सरस्वती माते ।। (Naman Saraswati Mate)
सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती  ।  येतों काकुलती तुजलागीं ।।
लाडके लडिवाळ मागतसे तुज । वंदिन हे रज चरणींचे ।।
त्वरें येउनिया मस्तकी ठेवी हात । जाईल हि भ्रांत तेव्हां माझी ।।
आपुल्या बाळासी धरी आतां हातीं । न करी फजिती जनामध्यें ।।
विश्वात्मा जो हरि त्याची वर्णीन कीर्ती । आवडीचा ओती रस यातें ।।
ऐकोनियां स्तव प्रसंन्न । नाम्या तुझा अभिमान मजलागीं ।।६।।
……………………………………………………………………………………
(Deva adideva Sarvatrachya Jiva)

देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐके वासुदेवा द्यानिधी ।।
ब्रम्हा आणि ईन्द्र वंद्य सदाशिव  । ऐकेवासुदेवा दिनबंधु ।।
चौदा लोकपाळ करिती तुझी सेवा ।ऐके  वासुदेवा कृपासिंधु ।।
योगियांचे ध्यानी नातुडसी देवा । ऎके वासुदेवा जगद्गुरू ।।
निर्गुण निराकार नाही तुज माया । एकें कृष्णराया कानडिया ।।
करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोया । एकें कृष्णराया गोजरीया ।।
नामा म्हणे जरी दाखवीशील पाया । तरी वदावया स्फूर्ती चाले ।।७।।
……………………………………………………………………………………
(Kshirsagrat asshi Bisala)

क्षिरसागरात  असशी बैसला । धावोनी मजला भेटी देई ।
शेषावरी जरी असशी निजला । धावोनी  मजला भेटी देई ।
कैलाशी शिव पुजीतसे तुजला  । धावोनी मजला भेटी देई ।
योगियांचे ध्यानी असशी  बैसला । धावोनी मजला भेटी देई ।
गहिवरोनि नामा बाहात विठ्ठला । धावोनी मजला भेटी देई ।।५।।
……………………………………………………………………………………
(Adakhluni pdashi Nako Joda)

अडखलूनी पडशी घालू नको जोडा । धांवत दुडदुडा येई आतां ।।
बैसावया साठी घेऊ नको घोडा । धांवत दुडदुडा येई आतां ।।
भोजना बैसलासी येथें घेई विडा ।। धांवत  दुडदुडा येई आतां ।।
बाहुबळे काढीला देवांचा जो खोडा । धांवत  दुडदुडा येई आतां ।।
कृपाळु बहुत लक्ष्मीचा चुडा । त्याला बाह्तसे वेडा नामदेव ।।५।।

……………………………………………………………………………………

(Akashi wani hoy sange saklasi)

आकाशी वाणी होय सांगे सकलांसी । तळमळ मानसी करू नका ।।
देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राम्हण गाई  भक्त ।।
उतरील भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वांसी करील तो ।।
रोहिणी उदरी शेष बळिभद्र । यादव समग्र व्हावे तुम्ही ।।
ऐकोनियां ऐसें आनंद मानसिं । येती स्वस्थळासी नामा म्हणे ।।५।।
……………………………………………………………………………………
(Sheshapati bole lakshmicha to war)

शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊ आतां ।।
पृथ्वीवरी दैत्य ते मातले फार । गार्हाणे सुरवर सांगू आले ।।
शेष म्हणे मज श्रम जाले फार । या लागी अवतार मी न घेचि ।।
राम अवतारी जालो लक्षुमन ।  सेविलें अरण्य तुम्हा सवें ।।
चौदा वर्षांवरी केले उपोषण । जाणता आपण प्रत्यक्ष हें ।।
नामा म्हणे ऐसे वडे धरणीधर । हांसोनी श्रीधर काय बोलें ।।६।।
……………………………………………………………………………………

(Purvi tu anuj jalasi kanista)

पूर्वी तू अनुज जालासि कनिष्ट । सोसियेले  कस्त मजसवें ।।
आतां तू वडील होई गा सर्वज्ञां । पाळीन मी आज्ञां तुझी बारे ।।
देवकी उदरी राहावें जांवोनी । मायेसी मागोनि पाठवितो ।।
योगमाया तुज काढील तेथोन । घालील नेवोन गोकुळासी ।।
लक्ष्मीसी सांगे तेव्हां हृषीकेशी । कौंडण्यपुराशीं जावे तुम्हीं ।।
नामा म्हणे ऎसा करुनि विचार । घ्यावया अवतार सिद्ध असें ।।६।।

महाराणा प्रताप

$
0
0

महाराणा प्रताप

महाराणा प्रताप

जन्म : इ.स. १५७२

मृत्यू : १९ जानेवारी १५९७

नाव  : महाराणा प्रताप

पूर्वीच्या राजपुत्राच्या घराण्यात मेवाडच्या राजपुतांचे घराणे विशेष प्रसिद्ध आहे. अशा शूरवीर घराण्यात राणा प्रतापांचा जन्म झाला. त्यांचे वडील उदयसिंह मोठे स्वाभिमानी होते. राजपुतांच्या गुलामगिरीमुळे अनेक राजे अकबरास शरण जात असत. त्याचबरोबर त्यांच्या संबंधात वाढ होण्यासाठी त्यांचा मुलींसोबत बादशहा लग्न करीत असे. परंतु उदयसिंह राजांनी बादशहा समोर शरणागती पत्करली नाही. अकबराने चित्तोडवर स्वारी करताच राजांनी बादशाहाला निकराचा लढा दिला व शरणागती न पत्करता उदेपूर हि नवी राजधानी बनविली. पुढे त्यांचा मुलगा महाराणा प्रताप यांनी सैन्यात चेत्यन्य निर्माण केले. अकबर बादशाहने मैत्रीसाठी मानासिंगला महाराणा प्रताप यांच्या कडे पाठवले. महाराणा प्रताप नि त्याचा सम्मान केला परंतु मानसिंग सोबत जेवण करण्यास बसले नाही.

आपण बाटलेल्यांच्या पंगतीला बसत नाही असे त्याला स्वाभिमानाने सांगितले. पुढे मानसिंग ने या अपमानाचा सूड उगवण्यासाठी अकबरास तयार केले. युद्धात बाजी मारली, महाराणा प्रतापाच्या  सैन्याला विजय मिळेना, शेवटी ते आरवलीच्या सहाय्याने अनेक वर्षे राहिले. पुढे बिकट परीस्तीतीत महाराणा प्रतापांनी भेटलेल्या मित्रांच्या सहाय्याने पुन्हा राज्य स्थापन केले. चित्तोड पुन्हा काबीज करण्याचा त्यांचा पर्यंत होता पण काळाने ते जमू दिले नाही.पुढे त्यांनी मुलांना स्वाभिमानाचा उपदेश देऊन चित्तोड घेण्याचे विनवले व प्राण सोडले.

Maharana Pratap or Pratap Singh was a Hindu Rajput ruler of Mewar, a region in north-western India in the present day state of Rajasthan.

The post महाराणा प्रताप appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

इतिहास पुरुष छत्रपती शिवाजी महाराज

$
0
0

इतिहास पुरुष  छत्रपती शिवाजी महाराज

 

इतिहास पुरुष

छत्रपती शिवाजी महाराज

जन्म : इ. स. १६३० -शिवनेरी

नाव : शिवाजी शहाजीराजे भोसले

एक छत्रपती म्हणून शिवाजी राजांचे नाव इतिहासाशी कायमचे जोडले गेलेले आहे. वडिलांच्या सामान्य जहागिरीच्या एका तुकड्याचे विस्तीर्ण हिंदवी स्वराज्यात रुपांतर करून दाखवणे आणि तेही अवघ्या पस्तीस वर्षाच्या कालावधीत, हे कर्तुत्व फारच कठीण आहे. “राजा हा प्रजेचा पालनकर्ता असतो, उपभोगी नसतो, प्रजेने उभ्या केलेल्या साम्राज्याचा तो केवळ विश्वस्त म्हणून धनी असतो.” हेच तत्व त्यांनी शेवटपर्यंत आचरणात आणले. स्वताचे राज्य हि कल्पना त्यांना कधीच पटली नाही. हे राज्य देवदेवतांचे, प्रजेचे,गोरगरिबांचे, साधू-संतांचे या समजुतीने त्यांनी कारभार चालवला.

छत्रपतींच्या कर्तुत्वाचा आढावा थोडक्यात घ्यायचा झाला तर एक जनता राजा,कुशल प्रशाशक, वैराग्य, गोरगरिबांचा कैवारी, पराक्रमी व संकटाला धैर्याने सामोरे जाणारा, धर्मरक्षक, परस्त्रीयाना माते समान मानणारा जनता जनार्धन असा राजा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज ………

Chhatrapati shivaji maharaj – The chastiser of the Mughals. Shivaji Bhosle, also known as Chhatrapati Shivaji Raje Bhosle . Essay in Marathi and Hindi.

The post इतिहास पुरुष छत्रपती शिवाजी महाराज appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

पितामह दादाभाई नौरोजी

$
0
0

पितामह दादाभाई नौरोजी

 

भारतीय स्वातंत्र्याचा उद्गाता
पितामह दादाभाई नौरोजी

जन्म : २५ जुन १८२५
मृत्यू  : १८ एप्रिल १८१७
नाव   : दादाभाई नौरोजी

सुराज्याला  स्वराज्याची जोड येणार नाही, “आम्हाला स्वराज्य पाहिजेच” असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे पितामह दादाभाई नौरोजी. पितामह फारच हुशार होते. वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांच्या निर्वाणानंतर आईसोबत राहू लागले. पुण्यात कॉलेजचे शिक्षण घेतले व तेथेच ते काम करू लागले. वाचन, मनन, याचबरोबर त्यांना खेळन्यातही रस होता.
मुलां सोबत मुलीनाही शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी शाळा काढल्या. त्यांनी एक वर्तमानपत्र हि काढले त्याचे नाव “रास्तगोफ्तर” होते. ते गुजराती भाषेतून निघत असत. आपल्या समाजाची सुधारणा होण्यास शिक्षण हा एकच उपाय आहे असे त्यांना वाटत होते.म्हणून त्यांनी शाळा काढल्या व वर्तमानपत्रातूनही लेख लिहिले.
व्यापाराकरिता दादाभाई इंग्लंडला गेले होते. भारतातील लोक अनाडी आणि रानटी आहे असे तिथले लोक समजत असत.त्यावर त्यांनी तिथे व्याख्याने व लेख लिहून तिथे मतप्रसार केला. देशात सुधारणा घडवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयन्त केले. स्वराज्य, स्वदेशी,बहिष्कार,आणि राष्ट्रीय शिक्षण हे चार उपाय दादाभाई नि आचरणात आणायला सांगितले. म्हणून त्यांना पितामह संबोधल्या जाते.

Dadabhai Naoroji, known as the Grand Old Man of India, was a Parsi intellectual, educator, cotton trader, and an early Indian political and social leader.

The post पितामह दादाभाई नौरोजी appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

बाळ गंगाधर टिळक

$
0
0

बाळ गंगाधर टिळक

भारतीय स्वातंत्र्याचा उद्गाता
लोकमान्य टिळक
जन्म : २३ जुलै १८५६ (चिखलगाव, रत्नागिरी)
मृत्यू  : १ ऑगस्ट १९२० (मुंबई)
नाव   : बाळ गंगाधर टिळक

भारतीय स्वतंत्र लढ्यात ज्यांनी आयुष्य वेचल त्यामध्ये लोकमान्य टिळकांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. कारण या थोर महात्म्यांनी तरून वयातच समाज सुधारण्यासाठी व समाज ऐक्यासाठी जिद्दीने पाऊले उचलली. देशभक्तीच्या आलोट प्रेमासाठी स्वदेशाचा नारा देशभर पसरवला. समाज जागृतीसाठी लेखणी आवश्यक असल्याचे चाणाक्षपणे ओळखून “केसरी” व “मराठा” यासारखी वृतपत्रे सुरु केली.
जहालमतावाद्यांचे लोकमान्य टिळक हे नेते बनले. ” स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, व तो मी मिळवणारच ” अशा प्रयन्तवादाचा जनक लोकमान्य टिळक. समाज तर सुधारलाच पाहिजे, पण प्रथम स्वातंत्र्य आवश्यक आहे असे त्यांचे मत होते.
शिक्षणाची माणसाच्या आयुष्यात अतिशय निकडीची गरज आहे. ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. मोडेन पण वाकणार नाही अशी त्यांची स्वराज्यासाठी मनापासून तयारी होती. समाज जागृती व हिंदू मुस्लिम ऐक्ययासाठी अनेक प्रकारचे ध्येयवादी प्रयोग त्यांनी केले. परकीय सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टमय जीवनाची अनेक वेळा ओळख करून दिली. लोकमान्य टिळक स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर लढले. आजही आपण त्यांचे अभिमानाने नाव घेतो.

Bal Gangadhar Tilak (Indian political leader): born as Keshav Gangadhar Tilak, was an Indian nationalist, journalist, teacher, social reformer, lawyer and an independence activist. He was the first popular leader of the Indian Independence Movement.

The post बाळ गंगाधर टिळक appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

लाला राधाकिशन लजपतराय

$
0
0

लाला राधाकिशन लजपतराय

भारतीय स्वातंत्र्याचा उद्गाता
लाला लजपतराय
जन्म : २८ जानेवारी १८६५ जगरण (लुधियाना-पंजाब)
मृत्यू  : १७ नोवेंबर १९२८
नाव   : लाला राधाकिशन लजपतराय

लाला लजपतराय हे पंजाबचे एक श्रेष्ठ देशप्रेमी नेते होते. त्यांचा क्रांतिकारक चळवळीशी संबंध असल्याच्या संशयावरून इंग्रज सरकारने त्यांना अटक करून तुरुंगात ठेवले. पुढे लालाजी व सरदार अजितसिंग यांना ९ मे १९०७ ला सीमापार केले. नंतर त्यांची सुटका केली. लालाजीनी आर्य समाजाची फार मोठी सेवा केली. पंजाबच्या सार्वजनिक चळवळीचे नेतृत्व त्यांच्या कडे होते.१९२८ साली सायमन कमिशनला विरोध दर्शविण्याकरिता देशभर चळवळ सुरु होती. पंजाबमध्ये सायमन कमिशनला विरोध करणारी चळवळ दडपून टाकण्याचा सरकारच प्रयन्त होता. लाहोर येथे ३० ऑक्टोंबर १९२८ रोजी सायमन कमिशनला विरोध दर्शवण्यासाठी लालाजींच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. लालाजी आघाडीवर होते, रेल्वेस्टेशन कडे मोर्चा जात असताना काटेरी तारेच्या कुंपणामुळे सार्वजन तिथे थांबले होते. मिरवणुकीचा जमाव फार मोठा होता तरीही त्यांनी कमालीची शांतता राखली होती. तरीही जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी हल्ला सुरु केला. लालाजींनाही फार मार बसला होता. त्यांच्या छातीवर लाठ्यांचा फार मार बसल्याने छातीलाही फार इजा झाली . लालाजींच्या छातीवर झालेल्या इजेमुळे १७ नोवेंबर १९२८ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. व स्वातंत्र्याच्या चळवळीत लालाजी हुतात्मा होऊन अमर झाले.

About Lala Lajpat Rai and Essay of Lajpat Rai was born in Dhudike (now in Moga district, Punjab) on 28 January 1865. (The word ‘Lala’ is an honorific, applied to prominent Hindu men of the time.)

The post लाला राधाकिशन लजपतराय appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

गोपाळ कृष्ण गोखले

$
0
0

गोपाळ कृष्ण गोखले

विवेकशक्तीचा उपासक  
ना. गोपाळ कृष्ण गोखले
जन्म : ९ मे १८६६  कोथाळूक (रत्नागिरी)
मृत्यू  : १९ डिसेंबर १९१५
नाव   : गोपाळ कृष्ण गोखले

भारतीय स्वातंत्र्य युद्धात ज्यांनी आयुष्यभर कष्ट सोसले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा महात्म्यात शोभून दिसणारे नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे रत्नागिरीतल्या एका खेडेगावात जन्माला आले.त्यांचे बालपण अतिशय खडतर अशा परिस्थितीत गेले.परंतु कुशाग्र बुद्धीच्या जोरावर वयाच्या अठराव्या वर्षीच पदवी मिळवली. देशसेवेने झपाटून गेलेले गोखले पुण्यात जाऊन ” न्यू इंग्लिश स्कूलच्या” मंडळीस मिळाले. त्यांच्यावर आगरकर, टिळक, रानडे यांचा प्रभाव पडला. ते शाळा कॉलेजात इंग्रजी, गणित, राज्यशास्त्र, आर्त्शास्त्र, इतिहास, हे विषय आवडीने शिकवत असत. पुढे न्या.रानडे यांचे शिष्यत्व पत्करून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांचा सुष्म अभ्यास केला.
गोखल्यांनी राजकीय जीवनात सार्वजनिक सभेचे, कॉंग्रेस अधिवेशनाचे सरचिटणीस म्हणून उत्तम प्रकारे काम केले.पुढे ते डेक्कन सभेचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंड ला गेले. तिथे त्यांनी भारतीय स्थितीचे अभ्यासपूर्ण वर्णन केले. त्यांच्या अभ्यासाची जाणीव इंग्रजांना सुद्धा होती. त्यामुळे गोखल्यांनी भारतीयांची जेवढी दाद मिळवली तेव्हडिच दाद इंग्रज सरकार सुद्धा देत होते. समाज सुधारणा करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले. अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, औदोय्गिक प्रश्न, सामाजिक प्रश्न अशा प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिले. त्यांच्या उत्कृष्ट कामाच्या पद्धतीमुळे देशाची पावले प्रगती पथावर पडू लागली. त्यांचा गौरव करण्यास शब्दही अपुरे पडतात.

Gopal Krishna Gokhale, CIE was one of the founding social and political leaders during the Indian Independence Movement against the British. Read More.

The post गोपाळ कृष्ण गोखले appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


राष्ट्रपिता महात्मा गांधी

$
0
0

मोहनदास करमचंद गांधी

अहिंसा सत्याग्रहाचा प्रणेता
महात्मा गांधी (राष्ट्रपिता)
जन्म : २ ऑक्टोंबर १८६९
मृत्यू  : ३० जानेवारी १९४८  
नाव   : मोहनदास करमचंद गांधी

भारतानी जगाला शांतता व समता यांचा उपदेश दिला. या शांततेचा व समतेचा थोर उपासक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी.
भारतीयांनी इंग्रजांच्या अन्यायी, अत्याचारी, जुलमी सत्तेतून रक्ताचा एक थेंबहि न संडवता सत्याग्रहाच्या व उपोषणाच्या मार्गाने मुक्त करून जगाला एक नवीन क्रांतीचा मार्ग दाखून दिला. विदेशात जाऊन वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरीनिमित्त बाहेर पडले. त्याचकाळात इंग्रजांच्या अन्यायी व जुलमी राजवटीची त्यांना प्रचंड चीड आली. परकीय सत्तेला देशातून हाकलून देण्यासाठी सत्य, अहिंसा, असहकार, अस्त्याग्रह, व स्वदेशीचा वापर, उपोषण व हलताल या सूत्रानुसार त्यांनी इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले. “चाले जाव” चळवळ, दांडी यात्रा, आमरण उपोषण अश्या विधायक मार्गांचा वापर करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अश्या या थोर राष्ट्रपित्याने अश्पृश्यात्याना समानतेची वागणूक मिळावी म्हणून मानवतेची शिकवण देशवासियांना दिली. शांततेच्या मार्गाने लढा देणारा थोर महापुरुष आपल्या देशाला लाभला हे आपल्या सर्वांचे परम भाग्य आहे.

 

Mohandas Karamchand Gandhi, whom people lovingly called ‘Bapu’ is popularly known as Mahatma Gandhi. He was born on October 2, 1869 at porbandar. read More about Bapu.

The post राष्ट्रपिता महात्मा गांधी appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

सरदार वल्लभभाई पटेल

$
0
0

सरदार वल्लभभाई पटेल

भारताचे पोलादी पुरुष
सरदार वल्लभभाई पटेल
जन्म :३१ ऑक्टोंबर १८७५ करमसद (गुजरात)
मृत्य  :१५ डिसेंबर १९५०
नाव   :वल्लभभाई झवेरभाई पटेल

भारताचे पोलादी पुरुष म्हणून त्यांची ख्याती अजरामर आहे असे थोर महात्मे “सरदार वल्लभभाई पटेल” यांना भारतीय नागरिक कधीही विसरणार नाही. सरदारांचा कणखरपणा, धीटपणा हा त्यांचा वर्तनातूनच दिसून येत होता. एकदा त्यांच्या काखेत आलेल्या गळूस चटका देणाऱ्यास तप्त लाल सळीने चटका देताना वाईट वाटले होते.अशा प्रसंगी वल्लभभाईनि स्वतः ती सळी घेऊन चटका दिला.
अशाच धिटाइतून ते पुढे शिक्षणात सुधा चमकले. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते. ख्यातनाम वकील म्हणून त्यांनी खूप नाव कमावले.
महात्मा गांधीच्या प्रभावामुळे सरदार वल्लभभाई पटेल देशसेवेत रमू लागले. गुजरातमध्ये आलेल्या पुराच्या प्रसंगी त्यांनी लोकांना धीर दिला. पुढे नागपूरला सरकारच्या अवाजवी कामाविरुद्ध आवाज उठवला. बर्डोलीच्या सत्याग्रहाच्या वेळी शेतकर्यांवर बसवलेला जाचक शेतसारा त्यांनी शेतकऱ्यांच्या सहकार्यातून मागे घेतला. त्यांना लोकांनी “सरदार” हि पदवी बहाल केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते भारताचे गृहमंत्री झाले. संस्थान मंत्री म्हणून उत्कृष्ट प्रकारचे त्यांनी काम केले. संस्थानांच्या विलिनीकरणाकरीता त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग केले. या पोलादी पुरुषाने १५ डिसेंबर १९५० रोजी मुंबई इथे जगाचा निरोप घेतला.

Great son of India Sardar vallabhbhai patel .

The post सरदार वल्लभभाई पटेल appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

$
0
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जन्म : १४ एप्रिल १८९१ (महू)
मृत्यू  : ६ डिसेंबर १९५६ (दिल्ली)
नाव   : भीमराव रामजी आंबेडकर

भारताच्या राज्यघटनेत आस्पृश्यतेला थारा नाही. अस्पृश्यता समूळ नष्ट करण्यासाठी व दलितांच्या उद्धारासाठी अविरत धडपनाऱ्या, झुंझार व्यक्तिमत्व असणाऱ्या त्या महापुरुषाचे नाव होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ते लहान पणापासूनच हुशार होते. पदवीनंतर उच्च शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्याकडे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज करून ते अमेरिकेला गेले. पुढे शाहू महाराज्याच्या सहाय्याने लंडनला जाऊन वकील झाले. त्यानंतर वकिलीच्या सरावाच्या वेळेस त्याचा समाजाशी संपर्क आला, व त्यातूनच त्यांना जातीयतेचा, भेदभावाच्या रुक्ष कडा उठून दिसू लागल्या. हरिजनांच्या उद्धारासाठी व आस्पृश्यातेच्या समूळ उच्चाटनासाठी त्यांनी अविरत कष्ट केले. महाड इथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन अशा प्रकारे असमानतेचा निषेद केला. मानवतेच्या हक्कासाठी, सर्व सामान्यांच्या शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबवले. अशा या महान दलितउद्धाराकानेच भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे पवित्र काम उत्तम प्रकारे पार पडले. त्यांना “भारतरत्न” या किताबाने सम्मानित करण्यात आले.

See Dr Babasaheb Ambedkar Latest News, Photos, Biography, Videos and Wallpapers. Dr Babasaheb Ambedkar profile Dr babasaheb ambedkar.

The post डॉ. बाबासाहेब आंबेडकर appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

नेताजी सुभाषचंद्र बोस

$
0
0

नेताजी सुभाषचंद्र बोस

“तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा”
नेताजी सुभाषचंद्र बोस
जन्म : २३ जानेवारी १८९७ कटक (उडीसा)
मूत्यू  : १८ ऑगस्ट १९४५ (रोजी सायगाव विमानतळावर अखेरचे दिसले)
नाव   : सुभाषचंद्र जानकीनाथ बोस

बंगालचा बावनकशी हिरा म्हणून ज्यांचा उल्लेख करावा असे सुभाषबाबू भारताच्या स्वतंत्र लढ्यात कायमच अग्रणी राहिले. इंग्लंडला जाऊन आय.सी.एस. होऊन सुद्धा ” परकीय सत्तेच्या गुलामगिरीत नोकरी करणार नाही, व परकीय सत्तेचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही”. या तत्वासाठी त्यांनी देशबंधू चित्तरंजनदास यांच्या छत्राखाली स्वतंत्र लढ्यात भाग घेतला. कलकत्ता महानगर पालिकेत निवडून आले, व अधिकारी बनले. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. पुढे राष्ट्रीय सभेच्या निमित्ताने पं. नेहरूच्या सोबत ” भारताचे संपूर्ण स्वतंत्र ” हे ध्येय ठेऊन काम करावे असे ठरविले. त्यातून ते दोन वेळा राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर मतभेदामुळे त्यांनी पुरोगामी दलाची स्तापना केली. सरकारला ऐनवेळी तुरी देऊन निसटण्यात कुणीही त्यांचा हात धरू शकत नवते. ” आझाद हिंद सेना ” त्यांनी जगाच्या कोपर्यापर्यंत गाजविली. ब्रिटिशांचे समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले. पुढे ते प्रत्येक लढ्याला तयार झाले व त्यात ते यशस्वी झाले. सुभाष बाबूंची “जयहिंद” हि सिंहगर्जना आजही देशाच्या कानाकोपर्यात गाजत आहे.

Subhas Chandra Bose also known as Netaji, was an Indian nationalist whose unsuccessful attempt in the waning years of World War II to liberate India militarily from British rule roused patriotic feelings in India.

The post नेताजी सुभाषचंद्र बोस appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

पंडित जवाहरलाल नेहरू

$
0
0

Pandit Jawaharlal Nehru

भारताचे पहिले पंतप्रधान

पंडित जवाहरलाल नेहरू

जन्म : १४ नोवेंबर १८८९ (अलाहाबाद)

मूत्यू  : २७ मे १९६४

नाव   : पंडित जवाहरलाल नेहरू

महात्मा गांधीच्या विचारधारेशी सावली प्रमाणे उभे राहणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा देश्याच्या स्वातंत्र्याच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास सहन केला. स्वराज्यासाठी त्यांनी सायमन कमिशनला विरोध करण्याच्या कार्यक्रमात लखनौला लाठीमार सहन केला. ते त्यांच्या निर्णयाला शेवट पर्यंत चिकटून राहिले. निस्सीम देशभक्तिमुले ते १९२९ च्या कॉंग्रेस चे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. १९४७ ला भारताला स्वतंत्र मिळाले. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान झाले. १७ वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. भारताच्या आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी स्वताला या कार्यात झोकून दिले.

देशाप्रमाणे जगाला शांततेचा संदेश देऊन, ” पंचशील” हि लाख मोलाची देणगी जगाला दिली. “शांतीदूत” हि पदवी बहाल करून त्यांना सम्मानित करण्यात आले. ते लहान मुलांवर जीवापाड प्रेम करीत असत. लहान मुले त्यांना खूप आवडत असत. मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत हि जाणीव त्यांच्या ठायी होती. २७ मे १९६४ रोजी या थोर नेत्याने या जगाचा निरोप घेतला व आकाशातील ताऱ्यामधून एक तेजस्वी तारा निखळला.

Jawaharlal Nehru was born on 14 November 1889 in Allahabad in British India. … a wealthy barrister who belonged to the Kashmiri Pandit community…

The post पंडित जवाहरलाल नेहरू appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

Viewing all 88 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>