Quantcast
Channel: Marathi Essay : Gandhiji, rabindranath, indira gandhi, lokmany tilak, Babasaheb, Bhagat singh, baba ambedkar, sarvapalli radhakrishnan, chacha neharu, – Marathi Unlimited
Viewing all 88 articles
Browse latest View live

देश प्रेमी —स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर !

$
0
0

Veer Savarkar Biography marathi unlimited१८५७ च्या स्वातंत्र्य स्मरा नंतर सशस्त्र क्रांतीचा ईतिहास वीर सावरकरांच्या नावा शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये त्यांनी दिलेली पूर्णाहुती, त्यासाठी ज्यां यातना, हाल-अपेष्टा सहन केल्या त्याचा ईतिहास जर साक्षी नसता तर पुढील क्रांती घडणे अशक्य होते.

*सावरकरांचे मुळ घराणे कोकणचे, परशुराम भूमीतील गुहागर विभागातले. छत्रपती शिवराय,आणि बाजीरावांच्या काळात त्यातील काही घराणी देशावर आली.त्यातीलच सावरकर कुटुंब नाशिक जवळील भगूर येथे स्थिर झाले. येथेच २८ मे १८८३ रोजी दामोध्ररपंत सावरकरांच्या पत्नी सौ.राधाबाई यांनी चौथ्या मुलाला जन्म दिला.त्यांचे तेजस्वी नेत्र,विशाल भाळ, आकर्षक मुद्रा पाहून नाव ठेवले विनायक, म्हणजे विशेष नायक ! पण याच विनायका ला लहानपणात मातृ सुखाला पारखे व्हावे लागले.

*लहानाचे मोठे होत असताना त्यांना लेखन व वक्तृत्व या गुणांचा छंद जडला.एकदा एका वक्तृत्व स्पर्धेची बातमी त्यांना उशिरा समजली. तरीही त्यांनी त्या स्पर्घेत भाग घेतला पण भाषण करणार्यांच्या यादीत त्यांचे नाव शेवटी आले.सर्व स्पर्धकांची भाषणे ऐकताना परीक्षक कंटाळले होत. अश्या वेळी सावरकर भाषणा साठी उभे झाले.त्यांच्या बाणेदार विचारांनी, ओघवत्या भाषेनी परिक्षकांचा कंटाला कुठल्या कुठे गेला.त्या स्पर्धेत सावरकरांना पहिला क्रमांक मिळाला.

*बक्षीस वितरण कार्यक्रमात एक परीक्षक बोलताना म्हणाले, “सावरकर आता जे काही बोलला ते काही त्याचे विचार नसावेत. त्याच्या वयाला झेपणारे हे विचार नाहीत. त्याने दुसर्या कुणाकडून तरी हे भाषण लिहून घेतले असणार, पण ते काहीही असले तरी तो बोलला उत्कृष्ट. म्हणूनच आम्ही त्याला पहिला क्रमाक दिला. “मात्र त्याच वेळी सावरकरांनी परीक्षकांना ठणकाउन सांगितले. “हे भाषण माझे आहे मी कोनाकडुनहि लिहून घेतलेले नाही. मला सवय आहे ती स्व:त चे विचार मांडण्याची मी दुसर्या कोणा कडूनही विचार उसने घेत नाही. “परीक्षक पाठ थोपटत म्हणाले” सावरकर नाव यथार्थ कर बरे का! ज्याचा कर पडत्या राष्ट्राला  सावरतो. तोच खरा ‘सावरकर’ …. नंतर सावरकरांनी आपल्या नावाची यथार्थता आपल्या कर्तुत्वाने सिद्ध केली. आपल्या वयाची पंधरा वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच सावरकरांनी भरपूर वाचन केले. मराठ्यांचा ईतिहास, बखरी वाचल्या.महा भारत वाचल्यावर अर्जुनापेक्षा भीम हाच खरा श्रेष्ठ आदर्श पुरुष असल्याचे मत त्यांनी मांडले

*ते शिक्षणासाठी पुढे इंग्लंडला गेले.तेथे शिक्षण चालू असतानाही देश कार्यात खंड पडू दिला नाही वयाच्या सोळाव्या वर्षी सक्रीय राजकारणात ते भाग घेऊ लागले. इंग्लंड तेथेच त्यांनी ‘अभिनव भारत’ हि  क्रांतीसंघटना चालू केली. गावठी पिस्तुले तयार करून मित्रांकरवी एकवीस पिस्तुले भारतात पाठविली. १८५७च्या सहस्त्र उठावाची माहिती व्हावी म्हणून ” स्वातंत्र्य समर” हा जवळ जवळ ५०० पृष्ठांचा मौलिक ग्रंथ लिहिला त्यात हिंदू राष्ट्राच्या दृष्टीकोनातून क्रांती युद्धाचे समीक्षण संपूर्णपणे केलेले असल्याने याची परिणीती म्हणजे स्वातंत्र्ययुद्ध भडकवण्याचिच होती. त्यामुळे ब्रिटीशांची तपासाची चक्रे गतिमान झाली व त्यातच सावरकरांना अटक झाली. ब्रिटीशांच्या कडक पहार्यातून नेले जात असतानाच मार्सेलिस बंदरात त्यांनी सागरात झेप घेतली. त्यांची हि उडी सामान्य नव्हती.ती या त्रिखंडात गाजली.अश्या अनंतप्रसंगामुळेच त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

*सावरकर हे मुळातच राष्ट्रीय वृत्तीचे, उत्तुंग प्रतिभेचे कवी होते. स्वातंत्र्यसमर, जोसेफमोझिनी, माझी जन्मठेप, सहा पाने सोनेरी, सन्यस्त खड्ग , काळेपाणी, गोमंतक, कमला, सप्तर्षी, जातिभेद, हिंदुराष्ट्र दर्शन, हिन्दुपद्पातशाही, हिंदुत्व, क्रांतीघोष, पृष्ठ भूमी, ई. विविध वाड्मयातील पुस्तके त्यांनी समरसून लिहिली. एका बाजूला स्वातंत्र्यवीर तर दुसर्या बाजूला स्वातंत्र्यशाहीर अश्या सगळ्या रसायनांमुळे त्यांची कविता म्हणजे स्वातंत्र्य देवतेची आरतीच झाली. ते महान कवी म्हणावे लागेल.त्यांच्या या ओजस्वी साहित्याचा सन्मान करायचा म्हणून १९३८ साली मुंबई येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना निवडण्यात आले होते. सशस्त्र राज्यक्रांतीचे भारतीय धुरंधरत्व करण्याचे महत्कार्य प्रथम महाराष्ट्रात व नंतर इंग्लंड मध्ये त्यांच्या कडेच आले होते त्यामुळे पक्षातील सहस्त्रावधी हुतात्मे, विरात्मे. आणि क्रांती कार्यरत त्यांच्या परिचयाचे होत गेले. त्यांनी ”अभिनव भारत” संस्थेतल्या अगदी भगूर नाशिक पासूनच्या तर पुढे पुढे अनेक परकीय देशांतूनही पसरलेल्या शाखानतल्या लहानमोठ्या सहस्त्रावधी सभासदांना व्यक्तिश:च क्रांती दीक्षेची शपथ देत गेले. त्यांनी ब्रिटीश साम्राज्य सत्तेच्या ग्रासातून सुटन्या साठी विशेष: ते दुसर्या जागतिक महायुद्धाच्या सन १९४६ मध्ये झालेल्या अंता पर्यंत निशस्त्र आणि सशस्त्र मार्गांनी ब्रीटीशांशी जो हा निकराचा लढा कित्येक वर्षे सारखा दिला. त्यात शेवटी हिंदू राष्ट्राला राजकीय आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळवून देण्याची सुवर्णसंधी त्याना लाभली.

* ते कट्टर हिंदुत्ववादी होते.पण स्पृश्य-अस्पृश्य हा भेदभाव त्याच्यात नव्हता.विज्ञान दृष्टीहि त्यांना लाभली होती.२४ डिसेम्बर १९१० रोजी त्यांना जन्म ठेपेची शिक्षा झाली. ६ जानेवारी १९२४ रोजी रत्नागिरी कारागृहात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.पुढे दोन वेळा स्थानबद्धतेत वाढ होऊन अखेर १९३७ ला हि स्थान बद्धता संपली.त्यांचे कारागृहातील जीवन काथ्या कुटणे,चुन्याची घाणी ओढणे, असे काही प्रसंग तर मन थरारून सोडतात. मात्र भारताचे स्वातंत्र्य पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले.

*अखेर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी ते काळाच्या पडद्या आड गेले. परंतु त्यांच्या साहित्य, ग्रंथ लेख या रूपाने ईतिहास कायम आहे,  त्यांची स्मृती आजही अजरामर आहे.  ” सागरा प्राण तळमळला ”     जय हिंद-जय भारत.

Source : Marathi Unlimited

veer savarkar swatantra sainany


स्वामी विवेकानंद !

$
0
0

Swami Vivekananda essay in marathi१२  जानेवारी १८६३ कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. जणू काही चेहर्यावरून तेज ओसंडून जात आहे. असेच बघणार्यांना वाटले. या तेजस्वी बालकाच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी.विश्वनाथ दत्त हे कोलकत्त्यातील एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी धंद्यात खूप नाव मिळविले होते. पैसाही चांगला मिळविला होता ते स्वभावाने सदाचारी, पत्नी हि भुवनेश्वरी समाधानी व धार्मिक होती. त्यामुळे त्यांचा संसार सुखासामाधानीच होता. तेजस्वी बालकाचे बारसे मोठ्या थाटामाटातच झाले. व त्याचे नाव ठेवले नरेंद्र ! हा नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद म्हणून जग प्रसिद्ध झाला.

* सातव्या वर्षी त्याना शाळेत घातले. शाळेत ऐकलेल्या शिव्या तो शिकला. घरात सर्वांना तो शीव्या देऊ लागला. आईने त्याला शाळेतून काढून टाकले व स्व:त शिकवू लागली. बंगाली व इंग्रजी भाष्या त्यांनी नरेंद्र ला शकविल्या तसेच रामायण-महाभारतातील गोष्टी सांगितल्या पुढे नरेंद्र शहाणा झाला. व खूप हुशारही झाला.  परत आठव्या वर्षी त्याना शाळेत घालण्यात आले.

* पहिल्याच वर्गात त्यांनी अमरकोश पाठ केला. यावरून त्याची बुद्धी किती असामान्य असेल याची कल्पना येते. एका मुसलमान गवयाकडे गायन शिकले.आखाड्यात जाउन कुस्त्या खेळू लागले. चांगले गोटीबंद शरीर कमाविले. त्यामुळे वर्गातील मुलें त्यांना भीत असत. ते सर्वांचे पुढारी होते. त्यांच्या नुसत्या शब्दाने त्यांची भांडणे मिटत. १८७७ साली ते वडिलान सोबत रायपूरला गेले. त्यावेळी बैलगाडीतून प्रवास करावा लागला. तिथे त्यावेळी शाळा तर नव्हतीच त्यावेळी त्याना तेथे रानावनातून  फिरण्याचा व सृष्टी सौंदर्य पाहण्याचा प्रसंग आला. व त्याचाच त्यांनी अभ्यास केला. १८७९ मध्ये परत कोलकत्त्याला आले.परत शाळा सुरु झाली त्यावेळी  त्यांनी वाचनालयात जावून मोठ्मोठी ग्रंथ वाचलीत. त्यावरून अनेक विषय आत्मसाथ केले. फक्त एक दिवसात त्यांनी भुमितीच्या चारी भागांचा अभ्यास केला. ते खेळातही भाग घेत तसेच घोड्यावर बसण्यातही पटाईत होते. वादविवाद करण्यात ते सर्वांनाच हार्वीत असत. ते गाणे म्हणू लागले कि सारेच स्तब्ध होवून ऎकत. त्यांचा आवाज फारच गोड होता.

*  नरेंद्राने ब्राम्हण समाजात प्रवेश केला. मूर्ती मध्ये देव नाहीत,जाती नाहीश्या केल्याच पाहिजेत, स्त्रियांना शिक्षण  दिलेच पाहिजेत, हे विचार ऐईकून त्यांच्या मनात गोंधळ होत असे. तेव्हा देव खरच आहे कि नाही? असल्यास कोठे भेटेल? असल्यास त्याची भेट कोन घडवून देणार? या सर्व विचारांनी त्यांचे मन अस्वस्त झाले. ब्राम्हण समाजाचे देवेंद्र त्यांचे प्रश्नाचे समाधान कारक उत्तर देऊ शकले नाहीत. तेव्हा कॉलेजचे प्राचार्य हेस्टी यांनी त्यांना रामकृष्ण परमहंस यांच्या कडे पाठविले. संत परमहंस यांनी आपल्या तिक्ष्न्न  दृष्टीने त्यांच्या डोळ्याकडे पाहिले. ते आपल्या भक्तांना म्हणाले. “हा नरेंद्र मानव जातीच्या उद्धारासाठीच जन्मलेला आहे, तो हिंदुधर्म आणि हिंदुस्थानची मान साऱ्यां जगात उंचावेल!”  नरेंद्रला ते खरे वाटेना त्याने रामकृष्णांना विचारले,” तुम्ही देव पाहिला आहे कां ?” त्यावर रामकृष्ण उत्तरले, ”होय मी देव पाहिला आहे, त्याच्याशी बोललो पण आहे तुलाहि देव सहज भेटेल.”  ” केव्हा भेटेल मला देव ?नरेंद्राने विचारले, ” जेव्हा तुझ्या मनाला देव भेटण्याची तळमळ लागेल तेव्हा . “रामकृष्णांनी म्हटल्या नंतर हि त्यांचा त्यावर विश्वास बसेना, तेव्हा रामकृष्णांनी त्यांच्या हृदयाला स्पर्श केला. त्याच बरोबर सर्वत्र तेजाचे लोळ उठले. सर्वत्र प्रकाश पसरला. व नरेंद्रला सर्वत्र प्रकाश व परमेश्वरच दिसू लागला!

*   सन १८८१ साली डफ कॉलेजातून उत्तम गुणांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नरेंद्राने वडिलांच्या मृत्यू नंतर नोकरी करून घराचा भार उचलण्या ऎवजि संन्यास घेतला म्हणून आप्तेष्ट मंडळी  त्यांच्या मागे त्यांची निंदा करू लागले पण नरेंद्रना गुरु कडून योग्य मार्ग मिळाला होता. आणि त्या मार्गानेच जाण्याचा त्यांनी निर्धार केला होता. थोड्याच दिवसांनी रामकृष्ण कर्क रोगाने आजारी पडले. त्यांना उपचारासाठी काशीपूर येथे नेले.त्यांच्या साठी नरेन्द्रही त्यांच्या सोबत गेला.रामकृष्ण त्यांना म्हणाले ” बेटा माझी सर्व योग शक्ती मी तुला दिली आहे. त्याच्या जोरावर तू हिंदूधर्म आणि तत्वज्ञान यांचा जगभर प्रसार कर.,आपल्या राष्ट्राचा उद्धार कर.! “ऎवढे बोलून १५ ऑगष्ट १८८६ रोजी रामकृष्णांनी जगाचा निरोप घेतला. नरेंद्र व रामकृष्ण यांच्या ईतर शिष्यांनी बडानगर येथे त्यांचा मठ स्थापन केला, १८८८ साली नरेंद्र  २५ वर्षाचे झाले. सर्व भारत फिरून बघावा अशी त्यांची ईच्छा झाली. आणि तेव्हाच प्रवासास निघाले.काशी, अयोध्या, गया, आग्रा, वृंदावन असे करीत करीत ते पायीच फिरले,  नरेंद्रला लोक पुढे स्वामी विवेकानंद म्हणू लागले. त्यांनी १८९० साली रामकृष्णांच्या पत्नी शारदादेवी यांचा आशीर्वाद घेतला बाहेर पडले. स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला पचले. तेथील देवालयात त्यांनी ध्यानधारणा सुरु केली. त्यांना रामकृष्णांनी दर्शन दिले. अमेरिकेत भरणार्या सर्वधर्म परिषदेत जाण्याची त्यांना आज्ञां दिली. १८९३ ला त्यांना ३० वर्षे पूर्ण झाली. स्वामींच्या आशीर्वादाने खेतडीच्या महाराजांना पुत्र प्राप्ती झाली.  स्वामी विवेकानंदा ना महाराजांनी अमेरिकेला जाण्यासाठी योग्य पोशाख व भाडे खर्चाला पैसे दिले.

* ३१ मे १८९३ रोजी स्वामी अमेरिकेला निघाले. त्यांनी रामकृष्णांच्या फोटोला वंदन करून कालीमातेचे स्मरण केले.व भगव्या रंगाचा पोशाख चढविला. व भगवा फेटा गुंडाळला भगवत गीता घेवून त्यांनी बोटीवर प्रवास सुरु केला. चीन, जपान, नंतर ते शिकागो बंदरात उतरले. ११ सप्टेंबर रोजी सर्वधर्म परिषदसुरु झाली. हजारो संख्येने प्रतिनिधी हजर होते. देशोदेशीचे ध्वज फडकत होते. ख्रिस्ती धर्माचे लोक जास्त आले असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचेच गुणगान ते करीत होते. शेवटी स्वामींची वेळ आली. प्रथम ते घाबरे. पण धीर करून त्यांनी भाषणाला सुरवात केली. “माझ्या अमेरिकन बंधू -भगिनींनो ! या त्यांच्या पहिल्याच वाक्याला सर्वांनी टाळ्यांचा कडकडात केला, तो तब्बल दोन ते तीन मिनिटे चालला. त्यांनी हिंदूधर्मावरील परिपूर्ण भाषण दिले.

* परिषद संपली, पण स्वामींचे कार्य संपले नव्हते. त्यांनी अमेरिकेतील मोठमोठ्या शहरात व्याख्याने दिली. हिंदूधर्म, तत्वज्ञान यांच्या प्रचारासाठी त्यांनी न्यूयार्क मध्ये अभ्यासवर्ग सुरु केले.अनेक स्त्री-पुरुष त्यांचे शिष्य झाले.हिंदूधर्म, तत्वज्ञान यांचा प्रसार केला. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले. रामकृष्णा नची भविष्या वाणी खरी ठरली! त्यांचे शिष्य नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंद यांनी जगभर वेदांताचा प्रसार केला. भारताचे नाव उज्ज्वल केले. ! १८९७ साली स्वामी विवेकानंद भारतात परत आले. १मे  १८९७ रोजी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. व लोक सेवेला सुरवात केली. अमेरिकेत असतानाच ते आजारी पडले. नंतर त्यांची प्रकृती जास्तच बिघडली होती. थोडे दिवस विश्रांती घेऊन ते परत अमेरिकेला जावून आले. १९०२ साली त्यांची प्रकृती जास्त बिघडली मठाचे काम त्यांनी दुसर्यावर सोपविले. ४ जुलै १९०२ साली त्यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

Source : Marathi Unlimited.

SWAMI VIVEKANANDA

नेताजी सुभाषचंद्र बोस !

$
0
0

जन्म २३ जानेवारी १८९७ : मृत्यू १८ ऑगष्ट १९४५.

Subhas Chandra Bose Biography and essay in marathi* आपला भारत देश १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यात अनेक क्रांतीकारक देश भक्तांचा फार मोठा वाटा आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस हे त्यातलेच एक मोठे नाव  देशावर प्रेम म्हणजे कोणत्या प्रकारचे आणि किती.? मना पासून देशावर प्रेम करणे, देश आपलाच मानणे, देशाचा मान तोच माझा मान, देशाचा अपमान तोच माझा अपमान. नेताजी कॉलेज मध्ये शिकत असताना एका इंग्रजी प्राध्यापकाने शिकवताना भारताची टवाळी केली. नेताजींना ते सहन झाले नाही. ते आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी त्या प्राध्यापकाच्या थोबाडीत मारली. परिणाम म्हणून सुभाष बाबूंना कॉलेज मधून काढून टाकले. मग आशुतोष मुख्रर्जीनी मध्यस्थी केली. आणि परत कॉलेज मध्ये घेतले. असे नेताजींचे देशावर अतिशय मनापासून प्रेम होते.

* कटक येथील नामवंत वकील  बोस व प्रभावतीदेवी या सुशिक्षित व सुसंस्कृत दाम्पत्याच्या पोटी २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे सुभाषचंद्र यांचा जन्म झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी रामकृष्ण परमहंस व विवेकानंद त्यांच्या जीवनात आले.व ते सतराव्या वर्षी सदगुरुं च्या शोधासाठी गिरीकंदरांत –हिमालयात वणवण भटकत राहिले. त्यांचे वडील प्रज्ञावान व स्वतंत्र्य विचारांचे व परखड वृत्तीचे होते. तर आई अगदी “श्यामची आई” होती. वडील रायबहाद्दूर होते. पण इंग्रजांचे उर्मट वर्तन पाहून त्यांनी नोकरी व पदवी दोन्ही सोडून दिल्या सुभाषचंद्र वडिलांच्या सामाधानासाठी आय. सी.एस. होण्यासाठी इंग्लंडला गेले व केंब्रीज विद्यापिठाचे पदवीधर होवून परत आले.

* १९२१ सालच्या जालियन हत्याकान्डाने संतप्त होवून त्यांनी आय. सी. एस. होवूनही त्यांनी इंग्रजांची नोकरी स्वीकारली नाही. मातृभूमी स्वतंत्र करण्याचा विडा उचलला. गांधीजींना भेटले तेव्हा गांधीजींनी असहकाराचे आंदोलन सुरु केले होते. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना डॉ. चित्तरंजनदास यांच्या कडे पाठविले. बंगाली युवकांचा कंठमणी , बॉरिस्टर, फर्डा वक्ता, देशभक्त, विद्वान गुरु, हिमालयात मिळाला नव्हता.तो गांधीजींनी दिला. दोघांची हि कारागृहातच मैत्री जमली. गुरु-शिष्याचे नाते तयार झाले. बंगाली क्रांतीकार्कांणा व युवकांना दोघांचे जबरजस्त आकर्षण. सुभाषचंद्र बोस बंगाल प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष झाले. एका दहशतवाद्याचा सत्कार केल्याच्या आरोपांवरून इंग्रजांनी सुभाषचंद्र यांना मंडालेच्या तुरुंगात पाठविले. त्यांची प्रकृती बिघडल्या वरून १९२७ साली त्यांना मुक्त केले.

* १९३३ ते १९३६ या काळात ते युरोप मध्ये होते. ऑस्ट्रीयात व्हिएन्नाला राहिले. हिटलर, मुसोलिनी, इमोन डी, व्ह्यलेरांना भेटले. युरोपच्या राजकारणाचा अभ्यास केला १९३८ च्या हरिपुरा कॉग्रेसं चे अध्यक्ष निवडले गेले. १९३९ साली हि त्यांनाच अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. गांधीजींना ते मान्य नव्हते. म्हणून त्यांनी राजीनामा दिला. फ़ौरवर्डब्लाकची लढाऊ आघाडी उघडली. सुभाषचंद्र यांचे व्यक्तिमत्व लढाऊ व वादळी होते. त्यांमुळे ब्रिटीश सरकारने त्यांची धास्तीच घेतलेली होती. त्यासाठी त्यांना ते नेहमीच तुरुंगात पाठवीत. १९४१ साली सुभाषचंद्र यांना वेषांतर केले. आणि  “झियाउद्दीन” असे नाव धारण करून ते ब्रिटीश्यांच्या नजर कैदेतून सुटले. त्यांच्या भव्य व बलदंड शरीरावरून ते पठाण वाटत. ते भारत सोडून गेले.ब्रीटीश्यांचे जे जे शत्रू हते त्यांना त्यांना ते भेटले. जर्मनीत हिटलरला, जपान मध्ये टोजोला. त्यांनी भारतातले नौजवान एकत्रित केले. आणि ‘ आझाद हिंद सेना’ स्थापन केली. ब्रिटीश्याबरोबर युद्ध करून भारत स्वाभिमानाने स्वतंत्र करायचा असा सुभाष बाबुञ्चा निश्चय होता.

*   ते तरुणांना म्हणत “तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा”  तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र देईन ‘मजल-दर मजल, करीत आझाद हिंद सेना भारताच्या रोखाने येत होती. तिने रंगून पर्यंत धडक मारली. पण इंग्रजांच्या शक्ती पुढे तिचे चालले नाही. मग सुभाषबाबूंनी सेनेच्या सैनिकांना “इंग्रजांच्या हाती सापडू नका आज जरी आपल्याला शस्त्र ठेवावे लागत असले तरी पुन्हा तयारी करून पुन्हा सामर्थ्याने ते आपल्याला उचलायचे आहे”. असे सांगितले. १८ ऑगष्ट १९४५ साली तैवान विमानतळा वरून प्रयाण करीत असताना भडकत्या ज्वालांच्या प्रकाश्यात त्यांची प्राणज्योत विलीन झाली.

“जय हिंद जय भारत”.’

Source : Marathi Unlimited.

netaji subhash chandra bose, marathi essay

Subhash chandra bose with hitler picture Gallery .

Netaji Subhas Chandra Bose and Adolf Hitler -  Germany 29 May 1942 old-india-photos-subhash-chandra-bose-with-adolf-hitler Subhas Chandra Bose bei Heinrich Himmler subhash chandra bose with hitler2

हुतात्मा भगतसिंग

$
0
0

जन्म २८ सप्टेंबर १९०७–  मृत्यू २३ मार्च १९३१

Shaheed Bhagat Singh
देशासाठी ज्या स्वातंत्र वीरांनी आपले सर्वस्व वाहिले म्हणून त्यांचे गीत गाताना कवी म्हणतात,

सोडिले सर्व घरदार.. सोडीला सुखी संसार
ज्योतीसम जीवन जगले..ते अमर हुतात्मे झाले..

भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सरदार भगतसिंगाचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबातील बंग या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील किशनसिंग यांना क्रांतिकारी वाड्मयाचा प्रसार केल्या बद्दल मंडालेच्या तुरुंगात त्यांना सजा भोगावी लागली होती. भगतसिंग पाच-सहा वर्षाचा असताना त्याच्या काका सोबत शेतावर गेला होता काका शेतात गव्हाची पेरणी करीत असता तेहीत्यांना मदत करू लागले. तेव्हा त्यांच्या काकाने त्यांना विचारले ” भगत, कसली पेरणी करतोय ?” यावे तो म्हणाला, मी बंदुकीच्या बिया परत आहे ”,  का? असा प्रश्न काकांनी विचारला असता भगतसिंग म्हणाले ”कां म्हणजे काय?’ या बंदुकीच्या  बियांची झाडे झाली म्हणजे त्यांच्या वर बंदुका येतील आणि मग त्या बंदुकातून गोळ्या झाडून मी इंग्रजांना मारीन व माझा देश स्वतंत्र करीन”.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बंग येथे झाल्यावर भगतसिंग लाहोरच्या डी. ए. व्ही. व पुढे न्यशनल कॉलेज मध्ये १९२३ साली बी. ए. झाले.  कॉलेज शिक्षण चालू असतानाच त्यांनी आजन्म अविवाहित राहून देश्याच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली. त्याच प्रमाणे बी.ए. होताच त्यांनी क्रांतीकारकाच्या संघटनेत प्रवेश केला. पुढे सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास आदी कट्टर क्रांतीकारकांच्या साहायाने त्यांनी  ‘नव जवान भारत सभा’  हि संघटना सुरु केली. दिनांक ९ फेब्रुवारी १९२५ च्या रात्री लखनौ जवळच्या काकोरी स्टेशनातून सरकारी खजिना घेऊन निघालेली एक रेल्वे आगगाडी वाटेत अडवून तिच्या तील सर्व खजिना त्या क्रांतीकारकांनी पिस्तुले खरीद्न्यासाठी व बॉंब तयार करण्यासाठी लांबविला.

३० आक्तोम्ब्र १९२८ रोजी सायमन कमिशन लाहोर शहरात गेले असता तेथे लालालचपतराय यांच्या नेतृत्वा खाली निदर्शने सुरु झाले. पोलिसांनी केलेल्या बेदम लाठी हल्ल्यात लालाजीन्ना बराच मार बसला.व आजारी पडून त्यातच त्यांचा अंत झाला. याचा सूड घेण्याचे भगतसिंग आदींनी ठरविले व लालाजींच्या मृत्युला कारणीभूत झालेल्या मिस्टर स्कॉटऐवजी गैरसमजुतीने  स्यण्डर्स ला मारले. व मारून पळून जात असता त्याचा पाठलाग करणार्या चननसिंग यालाही पिस्तुलाने टिपले. भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी स्वत:च्या स्वार्थाला लाथ मारून भगतसिंगाने आपले घर सोडले आणि तो स्वातंत्र चळवळीत दाखल झाला. याच बगतसिंगाने ९ एप्रिल १९२९ रोजी बटुकेश्वर या साथीदाराच्या मदतीने कायदे मंडळाच्या सभागृहात ‘ इंकलाब जिंदाबाद ‘ च्या घोषणा देत हात बॉम्ब टाकून इंगरजांना दणाणून सोडले.

पुढे ‘डिस्पूट बिल’ व ‘पब्लिक सेफ्टी बिल ‘ हे दोन अन्यायकारक कायदे ब्रिटीश सरकारने मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय विधानसभेपुढे आणले असता पेक्षागृहात कमी शक्तीशाली बॉंब टाकून व ब्रिटीश सरकारच्या धिक्काराची पत्रके भिरकावून, भगतसिंग व त्यांचा सहकार्यांनी ब्रिटीश सरकारला हादरवून सोडले. पण ते पकडले जावून त्यांच्यावर खटले भरले गेले व न्यायालयाच्या निर्णयानुसार भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तिघांना लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी फासी देण्यात आले.   याच भगतसिंगाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर आपल्या मातेवर, भू  – मातेवर – भगिनीवर कोणी अत्याचार करू लागला तर स्वार्थाला बाजूस सारून कर्तव्यासाठी लढा. त्यामुळे जीवनात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल .

Shaheed Bhagat Singh Biography and original picture collection.

Bhagat Singh original picture collection Bhagat Singh original picture collection1 Bhagat Singh original picture collection2 Bhagat Singh original picture collection3 Bhagat Singh original picture collection4

प्रजासत्ताक दिन ( २६ जानेवारी )

$
0
0

आपले  भारतीय लोक सण साजरे करण्यात फार अग्रभागी आहेतच. पण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय सण हि आपण साजरे करतो. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.

हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधान्नांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो.या कार्यक्रमात भारताती सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.ठिकठीकाणी प्रभातफेर्या भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा,आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविनार्यांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ हि वाटला जातो. मुले हि आनंदित होतात.

शाळांना तोरणे-पताका आपले तिरंगी ध्वज लावली जातात. लहान मोठी मुले तीरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात  घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात.सर्व विध्यार्थी अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण  केले जाते. शाळेतील, एन. सी. सी. व स्काउट चे विध्यार्थी सुंदर संचलन करतात. शाळेतील वाद्य -वृंदा वरही राष्ट्रीय गाणी वाजविली जातात. तसेच मुले मुली आपापल्या आवडीची राष्ट्रगीते गातात. भाषणे करतात, नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो. मुख्याध्यापका कडून गुणी विध्यार्थ्यांचे कौतुक होते व त्यांना सम्मान पत्रे दिली जातात.

या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतीज्ञेचा दिवस ! लोकशाहीच्या उदघोषाचा दिवस ! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञां केलीच पाहिजे, आणि त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्या मुळे  प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्र प्रेम अधिक उसळून, उजळून निघते.

” आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक या भारताचे संरक्षक आहोत.!” 

Republic Day (India)

राष्ट्रमाता जिजाऊ

$
0
0

 जन्म १२ जानेवारी १५९८    —  मृत्यू १७ जून १६७४
rajmata jijawu marathi essay

आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली संभाजी महाराज ह्या मराठ्यांच्या दोन छत्रपतींना घडविणार्या विश्ववंद्य आदर्श राजमाता जिजाउंना त्रिवार वंदन !   जिजाउञ्चा जन्म १२ जानेवारी १५९८ बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजी जाधव यांच्या पत्नी म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई हिच्या पोटी झाला. म्हाळसाबाई हि निंबाळकर घराण्यातील होती.लखुजी जाधवाला दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि  बहाद्दुरजी, हे चार पुत्र आणि जिजाउ हि एक कन्या अशी पाच अपत्ये होती.शिक्षण-तत्कालीन सुखवस्तू मराठा मुलीनप्रमाणे जिजाऊंचे योग्य संगोपन करण्यात आले.तिला दांडपट्टा, अश्वारोहण वैगरे युद्ध कलांचे शिक्षण देण्यात आले.राज्यकारभाराचेही प्रशिक्षण मिळू लागले.

जिजाउं चा विवाह मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांचेशी दौलताबाद येथे डिसेंबर १६०५ साली मोठ्या थाटाने संपन्न झाला. या प्रसंगी मालोजीला निजामशहा कडून पाचहजारी मनसब, शिवनेरी, व चाकण हे किल्ले आणि पुणे व सुपे हे दोन परगणे जहागीर म्हणून मिळाले. जिजाउंना एकूण सहा अपत्ये झाली. त्यापैकि चार मृत्यू पावली. संभाजी व शिवाजी हे दोन होत. शहाजीं नी जिजाऊ ना शिवनेरीवर किल्ल्यात सुरक्षित ठेवले. येथेच १९ फेब्रुवारी १६३० साली जिजाउने शिवाजीस जन्म दिला. जिजाउचे पती शहाजीराजे फार पराक्रमी सेनानी होते.त्यांनी पुण्याच्या आसपासचा अहमदनगर व विजापूरचा प्रदेश काबीज करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले परंतु विजापुरने ते लवकरच उध्वस्त केले . इ.स १६३९ ते १६४७ या काळात शहाजीने पुण्यात झांबरे  पाटलाकडून  जागा विकत घेवून ‘लाल महाल ’ नावाचा राजवाडा बांधला . जीजावू व शिवाजी यांचा मुक्काम लाल महालातच होता. जिजाऊच्या आज्ञात शिवाजी आपल्या सवंगड्यासोबत युद्धकला शिकवू लागला. दऱ्याखोऱ्यात फिरू लागला. तान्हाजी मालुसरे, सूर्याजी काकडे , येसाजी कंक , बाजी जेथे वैगरे शेतकरयांची मुले शिवाजीचे जिवलग मित्र बनले. सर्वावर जीजावूंचा मायेची नजर होती . शिवाजीसह  सार्वजण जिजाऊच्या आज्ञेत वागत होते.

१६ मे १६४० साली जिजाऊने शिवाजीचा  विवाह निंबाळकरांच्या सईबाईंशी लावून दिला. यावेळी शहाजी विजापूरतर्फे बंगलोर येथे आल्यामुळे लग्नास येवू शकले नाहीत.  अशा रीतीने जिजाऊ निंबाळकरांच्या मुलींची (सईबाईची) सासू बनली , तर वणजोगी निंबाळकरांची  मुलगी दीपाबाई (मालोजीची पत्नी) ही जिजाउंची सासू होती. २५ जूलॆ १६४८ साली जिंजा येथे शहजीस कपटाने कैद केले, हे काम वजीर मुस्तफाखान याने केले . १६ मे १६४९ रोजी जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीने हालचाली करून शहजींची सुटका केली. शिवाजीने १० नोव्हेंबर १६५९ साली अफझलखानाचा वध केला. आणि बाजी घोरपडेस ठार केले. मुस्तफखानाचे अगोदरच निधन झाले होते. अशा रीतीने जिजाउने पुत्र शिवाजीस आज्ञा करून पतीच्या अपमानाचा सूड घेतला. इ.स १६५५ साली जिजाऊचा जेष्ट पुत्र संभाजी विजापूरतर्फे लढतांना ठार झाला. १४ मे १६५७ रोजी शिवाजीची राणी सईबाई पुरंदर गडावर प्रसुत झाली. तिला पुत्र झाला . त्याचे नाव संभाजी ठेवले . शिवाजीचा हा पहिला पुत्र आणि जिजाऊचा फिल नातू. सभाजीची आई सईबाई हिचे ५ सप्टेबर १६५९ रोजी निधन झाले. २३ जाने.१६६४ साली तुंगभद्रेची काठी होदीगेरे येथे असतांना शहाजी शिकारीला गेले. त्यांचा घोडा भरवेगात असतांना पाय रनवेलीत अडकला आणि कोलमडला. शहजीचे प्रतापशाली प्रतापशाली जीवन संपले . जिजाऊ विधवा झाली. पण ती सती गेली नाही.  शिवाजीने जीजामातेशी विचार विनिमय केला . त्या धर्यशाली मातेचे आपल्या एकुलत्या एका पुत्रास कपटी आणि खुनी औरंगजेबाच्या भेटीस आग्रा येथे जाण्यास संमती दिली . शिवरायाने जिजाऊच्या हाती राज्यकारभाराची सूत्रे सोपविली आणि ५ मार्च १६६६ साली राजगडवरून आग्राकडे प्रयाण केले . सिंहगड स्वराज्यात नाही याबद्धल जिजाऊस फारच वाईट वाटत होत . तिने शिवाजीस सिंहगड घेण्यास आग्रह केला. तानाजीने स्वप्रानाची आहुती देत सिंहगड ४ फेब्रुवारी १६७० साली काबीज केला. शिवाजीची राणी सोयराबाई राजगडावर प्रस्तुत झाली. २४ फेब. १६७० साली राजारामाचा जन्म झाला. पहिल्या सूर्यप्रतापी पुत्राच्या राज्यभिषेकाचा सोहळा ६ जून १६७४ साली बसले. सर्व उपाय थकले. १७ जून १६७४ बुधवार रात्री जिजामातेने डोळे मिटले. महाराजणवरचे मायेचे छत्र मिटले. स्वामी स्वराज्याच्या आईविना पोरका झाला.

जिजामाता स्वराज्याची स्पुर्ती होती. महाशक्ती होती. मातृशक्ती होती. मराठ्याने दोन छत्रपती घडविणारा आदर्श राजमाता होती. शिवाजीच्या अनुपास्तीत तीच राज्यकारभार बघत होती. न्यायनिवाडे करीत होती. गरजवंताना मदतीचा हात देत होती. तो काळ विचारात घेतला तर जिजाऊ ही प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्या गांजल्याची पालककर्ती राजमाता होती. अशा या राजमातेला कोट्यावधी वेळा नतमस्तक होवून विनम्र अभिवादन !
जय जिजाऊ !!

झाशीची राणी लक्ष्मीबाई !

$
0
0

जन्म १९ नोहेंबर १८३५.   मृत्यू १८ जून १८५८
Jhansi Ki Rani
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोहेंबर १८ ३५ रोजी झाला. पेशव्यांच्या सल्लागार मंडळाचे सदस्य मोरोपंत तांबे यांचि एकुलती एक कन्या मनुबाई होती. मोरोपंतांच्या पत्नीचे नाव भागरथीबाई होते.ती अत्यंत सुंदर, सुसंस्कृत, विदुषी आणि धार्मिक वृत्तीची होती. मनुबाई अश्या आदर्श जोडप्याची मुलगी होती. तिचे कपाळ भव्य होते. डोळे टपोरे, व चेहरा राजबिंडा व तेजस्वी होता.  मनुबाई जेमतेम चार वर्षाची होत नाही तर तिची आई मरण पावली. मुलीच्या पालनपोषनाची सर्व जबाबदारी वडिलांवर आली औपचारिक शिक्षणा बरोबर तिला तलवार फिरविणे, घोड्यावर स्वार होणे तसेच बंदुक चान्विणे याचे हि शिक्षण मिळाले.सन १८४२ मध्ये झाशीचे महाराज गंगाधरराव यांच्या बरोबर तिचा विवाह झाला. १९ व्या शतकाची ती सुरवात होती.भारता मध्यर व्यापार  करायला आलेल्या इंग्र्जानी  ईष्ट इंडीया कंपनिच्या नावावर अत्यंत जोमाने राजकीय सत्ता बळकावयाला आरंभ केला होता. भारताच्या दृष्टीने घडणारी प्रयेक दुर्दैवी गोष्ट त्या काळी ब्रिटीसांच्या साम्राज्य  विस्ताराला साह्यभूतच होत असे. इंग्रजांशी जे काही ठ झाले त्यात प्रत्येक वेळी नुकसानीचे भागीदार भारतीय होते.

१८५१ मध्ये महाराणी लक्ष्मीबाई याना एक मुलगा झाला. पण दुर्दैवाने त्या मुलाचा तीन महिन्याच्या आतच मृत्यू झाला. गंगाधररावांना राज्याच्या भविषाची चिंता पडली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास व्हायला लागला त्यांच्या दुखा:चे आणखी एक कारण होते. त्या वेळचा गव्हर्नर जनरल लार्ड डलहौसी याचे प्रशासन अतिशय क्रूर होते. काही राज्यांनी इंगरजांच्या मदतीचा स्वीकार केला होता.त्या बदल्यात त्यांच्या वर अशी एक अट लादली, कि जो राजा पुत्रा शिवाय मरेल त्याचे राज्य खालसा होऊन इंगरजी साम्राज्यात विलीन होईल. एवढेच नव्हेतर राज्यांनी दत्तक घेतलेल्या मुलाला सुद्धा राज्य करण्याचा अधिकार राहाणार नाही.१८५३ साली महाराज आनि राणी यांनी एका मुलाला दत्तक घ्यायचे ठरविले. धार्मिक विधी नुसार दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव दामोधरराव ठेवण्यात आले. काहीच दिवसांनतर  २१ नोहेंबर १८५३ साली गंगाधररावांचे निधन झाले. अगदीच अनुभव नसलेली राणी लक्ष्मीबाई १८ व्या वर्षीच विधवा झाली.एकीकडे लॉर्ड डलहौसी राज्य बळकावन्याच्या तयारीत तर दुसरी कडे लहान दामोधर! लक्ष्मीबाई अश्या कठीण अवस्थेत पडल्या होत्या. त्यांच्या दुखा:ला व संकटांना तोड नव्हती.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या अनेक नरनारींनी आपले प्राण ओवाळून टाकले त्यात हिरकणी प्रमाणे सदैव चमकत राहणारी स्त्री म्हणजे झाशीची राणी होय. इंग्र्जांनी दत्तकाचा वारसा हक्क नाकारून संस्थान खालसा केला. इंग्रर्जांनी झाशीचा कब्जा मागितला तेव्हा राणीने तपस्विनिचा अवतार टाकून तेजस्विनिचा अवतार धारण केला. ‘मेरी झाशी नही दुंगी’ अशी गर्जना करून तिने १८५७ च्या स्वतंत्र सम्रात उडी घेतली. या स्वातंत्र युद्धाची ती खरी स्फूर्तीदेवताच ठरली. इंगरजांची फळी फोडून तिने काल्पी आणि ग्वाल्हेर दोन्ही ठिकाणी विजय मिळविला. राणी जेव्हा घोड्यावर स्वार होऊन बाहेर पडायची तेव्हा पुरुश्याचा वेश परिधान करीत असे. ती धातूचा टोप घालून त्यावर फेटा बांधायची.तिच्या संरक्षणासाठी तिच्या छातीवर धातूची पट्टी बांधलेली असायची. पायजामा घालून वर एक शेला बांधायची. दोन्हीकडे पिस्तुल व तलवार लटकत असायचा. ह्या शिवाय ती आपल्या बरोबर कृपानहि बाळगीत असे.

परंतु थोड्यात वर्षात म्ह्नजे१८५७ मध्ये स्वातंत्र संग्रामाला सुरवात झाली. आणि राणीने झाशी आपल्या ताब्यात घेतली.हि गोष्ट इंग्रजांना कळताच इंग्रज सेनानी सर ह्यु रोज झाशीवर चालून गेला. राणीने सतत अहोरात्र किल्ला लढविला.,पण फितुरीने दगा दिला. त्यांमुळे पुत्र दामोधर याला पाठीशी बांधून व मोचक्या सैन्यासह शत्रू सैन्याचा वेढा भेदून राणीने नानासाहेब व तात्या टोपे ज्या किल्ल्यात होते त्या काल्पी किल्ल्याच्या दिशेने घोडा लढविला. पण ह्यु रोजच्या सैन्याने तिथेही पेशव्यांच्या बेशिस्त सैन्याचा पराभव केल्याने नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्यासह राणी ग्वाल्हेरला गेली.

ग्वाल्हेरच्या शिंद्यांना पराभूत करून नानासाहेबांनी ते राज्य आपल्या ताब्यात घेतले. परंतु शत्रू येथेही येईल त्याची जाणीव राणी परोपरीने देत असतानाही नानासाहेब राज्याचे राजे होण्यासाठी स्वत :राज्याभिषेक करून घेण्यात दंग झाले व तेवढ्यात  ह्यु रोज व त्याचे सैन्य ग्वाल्हेरवर चालून गेले.अतितटी चा संग्राम पुन्हा सुरु झाला. आणि तेथेच नाना साहेबांचा पराभव झाला. राणीने पराक्रमाची शर्थ केली,पण नाईलाज झाला. तेव्हा निवडक सहकार्यांश व दामोधरा सोबत ती वायू वेगाने निसटून जावू लागली. सरह्यु  चे सैनिक तिचा पाठलाग करीतच होते. त्यांनी तिला गाठले. एका ओढ्याच्या काठी राणीचा घोडा थबकल्याचि संधी साधून एकाने तिच्या वर तलवारीचा धाव केला. त्यामुळे त्या घावाने तिचे १८ जून १८५८ रोजी निधन झाले.

इंदिरा गांधी

$
0
0

जन्म १९ नोहेंबर  १९१७ –  मृत्यू ३१ आक्टोंबर १९८४

कणाकणाने ज्योत जळाली, उजळीत तेजोधन |
ज्यास द्याया शितलतेपन , झिजले हे चंदन ||

indira gandhiभारता सारख्या खंड्प्राय देश्याच्या दीर्घकाळ राहिलेल्या एकमेव नेता म्हणजेच पंतप्रधान म्हणून त्या होत श्रीमती इंदिरा गांधी. स्वातंत्र्य चळवळीत झोकून देणारी आणि देश स्वतंत्र्य झाल्यावर त्याच्या विकासासाठी अविरत झटणारी त्यांच्या सारखी स्त्री पंतप्रधान तर शोधूनही मिळायची नाही.  १९ नोहेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. आई कमला आणि वडील पंडीत जवाहरलाल नेहरू. यांच्या कडून विविध उत्तम गोष्टींचे बाळकडू त्यांना जन्म: मिळाले. “आनंद भवन” यां वास्तूत त्यांच्या जन्माने एक चैतन्य पसरले. स्वातंत्र्य आंदोलनातील नेते मोतीलालजी नेहरू त्यांच्या पत्नी स्वरुपारांनी या आजी-आजोबांना पण अतिशय आनंद झाला.  इंदिरा जींना ’इंदिरा’ हे नाव आजी -आजोबां कडून मिळाले. पण नेहरू त्यांना ”प्रियदर्शनी” म्हणून बोलवायचे. लहानपणा पासून ‘स्वदेशी’ आणि “स्वदेश” यांचे प्रेम त्यांच्या मनात निर्माण झाले होते. एकदा त्यांच्याकडे विलायतेहून आलेल्या पाहुण्यांनी एक सुंदर गुलाबी फ्रॉक  त्यांना आणला होता. पण तो फ़्रॉक खोलीतल्या एकां कोपर्यात ठेवून त्या त्यांच्या कडे एकटक पाहात बसल्या आईंनी तो फ़्रॉक घालण्यास आग्रह केला, ‘ तेव्हा मी विदेशी कपडे परिधान करणार नाही !’ असे ठासून त्यांनी आईला सांगितले. आपली विदेशी खेळणी, कपडे त्यांनी विदेशी कपड्यांच्या होळीत टाकून दिले.

वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे १९३० साली त्यांनी आपल्या सवंगड्यांची वानरसेना स्थापन करून नेत्यांचे संदेश पोचवण्याचे काम केले. ब्रिटिशां विरुद्ध मिरवणुका काढल्या, घोषना दिल्या, या सर्व गोष्टीबरोबर शिक्षणही चालूच ठेवले. प्रारंभी. अलाहाबाद, मग पुणे व नंतर रविंद्रनाथांच्या शांती निकेतन मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. शांतीनिकेतनातल्या मुक्त वातावरणात त्या विशाल बनल्या. कष्ट, स्वावलंबनाच्या जोरावर त्यांनी विविध कलाही आत्मसात केल्या. नृत्याच्या कलेतील त्यांच्या यश्याचे तर खुद रविंद्रनाथ टागोरांनी कौतुक केले होते.  शांतीनिकेतनाच्या कला पथकातून भारतभ्रमण करायला त्या उत्सुक होत्या, पण त्यांना  त्यांच्या आईच्या सुश्रुषेसाठी त्यांना स्वित्झरलंड ला जावे लागले. आणि त्यांची भारत भ्रमणाची संधी हुकली.

स्वातंत्र आंदोलनातील प्रमुख नेते असल्यामुळे त्यांचे वडील नेहरू बर्याच वेळी तुरुंगात असायचे. आईचे आजारपण  तर ब्लाव्तच चालले होते. पण त्याही प्रसंगात त्या ठामपणे उभ्या राहिल्यात, १८ फेब्रुवारी १९३६ रोजी कमलाजींचे निधन झाले.  तेव्हा त्यांच्यावर खूप मोठा आघात झाला.वडिलांनी त्यांना पुन्हा शांतीनिकेतन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पण फिरोज गांधी नेहरू घराण्यातील परिचित असलेल्या हुश्यार अन उमद्या तरुणाच्या सांगण्या वरून त्यांना  ‘ ऑक्सफ्रर्ड ‘ मध्ये दाखल करण्यात आले.

या काळात पंडीतजिनी इंदिराजींना जी पत्र पाठविली त्याद्वारे त्यांना सम्बन्ध भारताच्या ईतिहासाची पुरेपूर जाणीव झाली. याच काळात हिटलर ने इंग्रजवर हल्ले चढवायला प्रारंभ केला. वातावरण चिघळत चालले,म्हणून विमानाने एकट्या इंदिराजी भारतात परत आल्या त्यांच्या साहसाचे सार्यांनी कौतुक केले.  मागोमाग फिरोज गांधीही भारतात आले.आणि येथील राजकारणात सक्रीय झाले. विजयालक्ष्मी कृष्णा या आत्यांचा विरोध असतानाही इंदिराजीनचा २६ फेब्रुवारी १९४२ रोजी फिरोज गांधी यांच्याशी त्यांचा विवाह  झाला. फिरोज गांधी व इंदिराजी यांनी या देशाच्या चळवळीत मोठे योगदान दिले. एका मिरवणुकीत ब्रिटीश सोजिरांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर लाठीमार केला. पण त्यात अग्रभागी इंदिराजी होत्या. त्यांनाही मार लागला. पण त्यांनी तिरंगा सोडला नाही, व तो खालीही पडू दिला नाही. उलट स्त्रियांवर लाठीमार करणार्या त्या अधिकार्याला त्या म्हणाल्या “मी नेहरूजी कि कन्या हुं, मै डरुंगी नही, मै चिल्लाउंगी नही, अपना तिरंगा झेंडा छोडुंगी नही।” अश्या अनेक शोर्याच्या गोष्टी सांगता येतील.

राजीव आणि संजीव या दोन देखण्या मुलांना वाढवत त्यांनी एकीकडे संसाराचा गाडा ओढला. १९५९ साली त्या काँग्रेस च्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या. त्यांनी प्रचंड कामे केली. संघटण मजबूत केले. १९६० ला यांच्या पती फिरोज गांधी यांचे निधन झाले. १९६४ साली पंडीत जवाहरलालजींचे निधन झाले. आघातंवर आघात होत असतानाही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या.लालबहाद्दूर शास्त्रींच्या मंत्रीमंडळात त्यांनी नभोवाणी मंत्री मंडळाचा कारभार नेटकेपणाने सांभाळला आणि शास्त्रीजीच्या मृत्यूनंतर २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ पर्यंत देश्याच्या पहिल्या पंतप्रधान म्हनून त्यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांनी गरिबी ह्टवन्या करीता प्रथम दहाकलमी कार्यक्रम राबविला. सतत भारतावर आक्रमण करणार्या पाकीस्थांनच्या पूर्व बंगाल मधील गांजलेल्या प्रजेला स्वतंत्र करण्या साठी लष्करी मदत करून त्यांनी भारत द्वेष्ट्या पाकीस्थांनचे ‘ बांगला देश ‘व ‘पाकीस्थांन ‘ असे दोन तुकडे केले. त्यांनी असामान्य कामगिरीलक्षात घेऊन राष्ट्रपतींनि  त्यांना १९७१ मध्ये ” भारतरत्न ” किताबाने सन्मानित केले.

सततचे संप व टाळेबंदी या मुळे देश्याची बिघडू लागलेली अर्थ व्यवस्था ताळ्यावर आणण्याच्या हेतूने त्यांनी १९७५ मध्ये ‘ ‘आणीबाणी ‘ पुकारली.पण भारतातील लोकशाही प्रेमी जनता त्यामुळे नाराज झाली. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला हार खावी लागून ‘ जनता पक्ष्या ‘ च्या हाती सत्ता गेली.पण त्या पक्षाचे घटक पक्ष आपापसात भांडू लागल्याने १९८० च्या निवडणुकीत कॉंग्रेसने दैदिप्तमान विजय मिळविला. व इंदिराजी पुन्हा १४ जानेवारी १९८० ते ३१ आक्टोंबर १९८४ पर्यंत पंतप्रधान झाल्या . त्यांनी गरिबांच्या उद्धारासाठी जश्या योजना कार्यान्वित केल्या,त्याच प्रमाणे भारतीय वैज्ञांनिकान कडून अवकाश्यात  उपग्रह सोडून जगात भारताचा दबदबा निर्माण केला.

३०  आक्टोंबर १९८४ रोजी त्यांनी केलेल्या एका भाषणात त्या म्हणाल्या होत्या, ” माझ्या देश्याची सेवा करताना मला मृत्यू आला. तर मला त्याचा अभिमानच वाटेल माझ्या रक्ताचा थेंब अन थेंब मी या देश्याच्या वैभवासाठी आणि विकासासाठी खर्च करीन,आणि हा देश बलवान व चैतन्यदायी बनवेन.” ३१ आक्टोंबर १९८४ रोजी सकाळी काळाने त्यांच्या वर क्रूर हल्ला केला. त्यांच्याच अंगरक्षकाने त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करून त्यांची हत्या केली. एक थोर साहसी स्री, अखेर हुतात्मा झाली.पहिला गांधी प्रार्थनेच्या वेळी तर दुसर्या गांधी देशसेवेसाठी बाहेर पडताना गेल्या. हेच या देश्याचे दुर्दैव होय. एक तेजपुंज व्यक्तिमत्व लोप पावले. सारा भारत सुन्न झाला. जग यां घटणेने अचंबित झाले. त्या गेल्या पण त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व आजही भारतीयांच्या मनावर कोरलेले आहे.त्यांच्या स्मुतीला आम्हां सर्वाचे  शतश: प्रणाम !

india gandhis original picture gallery indira gandhi original pics indira gandhi1 indira-gandhi1

महात्मा ज्योतिबा फुले.

$
0
0

जन्म २० फेब्रुवारी १८२७,   मृत्यू २८ नोहेंबर १८९०

Jyotirao Phule

अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करू या!

 ज्योतीबांनी केलेले कार्य विधायक होते.प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजातील उपेक्षितांना पुढे नेण्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे . समाजाने त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला आहे. ज्योतीबांचे पूर्वज सातार्यापासून जवळ असलेल्या कटगुण गावात राहात होते. त्यावेळी त्यांचे आडनाव गोऱ्हे असे लावले जाई. पुढे गोऱ्हे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. तेथे ज्योतीबांचे वडील गोविंदपंत फुलांचा व्यवसाय करून उपजीविका करीत होते. त्यांनी फ़ुलांच्या व्यवसायात कौशल्य, कीर्ती, आणि फार यश मिळविले त्यामुळे गोऱ्हे हे आडनाव जावून त्यांना  ‘फुले’ हे नाव कायम स्वरूपीच मिळाले. पुढे गोविंदराव भाजीपाल्याचा व्यवसाय करू लागले. त्यात त्यांचा चांगला जम बसला. नंतर गोविंदरावांनी धनकवडीच्या झगडे  घराण्यातील चिमणाबाई सोबत विवाह केला. त्यांना दोन मुले झाली. थोरला राजाराम व धाकटा ज्योतिबा, महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक व द्लीतोद्धारक जोतिबा फुले यांचा जन्म २० फेब्रुवारी १८२७ रोजी पुण्यास झाला.

वयाच्या सातव्या वर्षी ज्योतिबा शाळेत जावू लागले. पण  ‘शूद्राने शाळेत शिक्षण घेणे हे महापाप आहे’ असे कुणा एका र्कमठाने गोविन्रावांचे कान फुंकल्यामुळे त्यांनी मुलाला शाळेतून काढून मळ्यातील कामाला जुंपले. पण तिथेही फावल्या वेळेत तो पुस्तके वाचण्यात रमल्याचे पाहून एका मुसलमान व एका इंग्रज गृह्स्थाने गोविन्द्रावान्ना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे त्यांनी पुन्हा ज्योतीबाला मिशनर्यांच्या इंग्रजी शाळेत टाकले.  इंग्रजी शाळेत जावून ती भाषा चांगली समजू लागल्यावर त्यांनी  ‘ राईट ऑफ मान ‘ ( मानवाचे हक्क ) हे toms pen या इंग्रज लेखकाचे पुस्तक वाचले. आणि त्यांना हिंदू समाजातील व धर्मातील विषमता ईश्वर निर्मित नसून हे मानव निर्मित आहे हे कळून आले त्यातून त्यांच्या परांजपे नावाच्या मित्राच्या लग्नात वराती मागून जाताना त्यांना एका ‘ शुद्र ‘ म्हणून तिथून निघून जायला सांगितले. या अपमानाने त्यांच्या अंगात अंगार फुलला मग त्यांनी विषमते विरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. हिंदू समाजातील मतलबी रुढीचा त्यांना तिरस्कार वाटू लागला. ज्योतीबांनी शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण करतानाच लहूजी वस्तादांकडून शारीरिक व्यायामाचे प्रकार आणि काही शास्त्रांचे ज्ञान संपादन केले होते. त्यातही त्यांनी कीर्ती संपादन केली.

  १८४७ पर्यंत जोतिबा बुद्धीने चांगले प्रौढ झाले होते. त्यांनी समाजाचे बार्काईने निरीक्षण केले.त्यातून त्यांच्या असे लक्षात आले कि आपला हिंदू समाज जाती भेदाने आणि विशिष्ट वर्गाच्या गुलामगिरीत राहून प्रतिगामी बनला आहे. स्त्रिया आणि शुद्र यांची कुचंबना होत आहे.हे सर्व स्त्रिया आणि बहुजन समाज शिक्षणा पासून दूर राहिल्यामुळे घडत आहे. हे सर्व त्यांच्या निदर्शनाला आल. त्यावरून त्यांनी भावी जीवनातील कार्याची दिशा ठरविली. ते सरकारी नौकरीच्या मागे न लागता समाज कार्य करायचे ठेवून कामाला लागले. सामाजिक गुलामगिरी दूर करणे आणि सर्वांनला शिक्षणाची दारे खुली करणे यासाठी प्रयत्नशील राहणे हे त्यांच्या जीवनाचे धैर्य ठरले.

जोतिबा फुले यांनी पुण्यात भिडेवाडयात ‘ मुलींची शाळा ‘ काढुन एकच खळबळ निर्माण केली. त्यांचे हे कार्य तत्कालीन रूढीप्रिय समाजाला रुचले नाही.मुलींची शाळा काढण्यासाठी पूर्व तयारी म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला प्रथम शिक्षण दिले. सावित्रीबाईनींहि आपल्या पतीच्या जीवन कार्याला मनापासून सहाय्य केले. १८४८ मध्ये पहिली १८५१ मध्ये दुसरी आणि १८५२ मध्ये तिसरी मुलींची शाळा काढली. या शाळा व्यवस्थित चालू लागल्या. मेजर कॉन्डी यांनी सरकार तर्फे ७५ रु अनुदान मंजूर केले. फुले यांच्या या महान सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर जोतिबांनी सामाजिक सुधारनांकडे विशेष लक्ष द्यायचे ठरविले.व्यक्ती स्वातंत्र्य, समता, आणि बुद्धीप्रामान्य या साठी ते झगडू लागले. सतीची प्रथा, विधवा पुनर्विवाह, भ्रुणहत्या ,या समाज विघातक गोष्टींना त्यांनी विरोध केला, केवळ शाब्दिक विरोध न करता त्यांनी पुढाकार घेउन ‘ बालहत्या प्रतिबंधगृह ‘ हि संस्था सुरु केली. समाजात स्पृश्य -अस्पृश्य असा भेदाभेद पाळनारांचा रोश पत्करून त्यांनी आपल्या घराजवळचा पाण्याचा हौद सर्वांना म्हणजे अस्पृश्यांनाहि खुला केला.
शेतकऱ्यांचा मोठा वर्ग वर्षानुवर्ष अज्ञान, गुलागिरी याने त्रस्त झालेल्या होता . हा वर्ग असंघटीत होता म्हणून त्यांचे हाल होतात हे ओळखून ज्योतिबायांनी कार्य केले . त्यातूनच ‘सत्यशोधक समाज’ स्थापन झाला . अज्ञान हेच सर्व अनर्थाचे मूळ आहे अशी त्याची समजूत असल्याने त्यांनी शिक्षणाचे मह्त्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सामजिक प्रश्नांवर जे चिंतन केले होते . त्यावर लेखनही केले.  ‘शेतकऱ्याचा आसूड’ ‘ब्राम्हणाचे कसब’, ‘ गुलामगिरी’ ‘तृतीय रत्न(नाटक)’, ‘शिवाजीचा पोवाडा’, तसेच सार्वजनिक सत्यधर्म’, असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांनी  ’अखंड ‘ नाव देऊन काही अभंगांचेही लेखन  केले. मूलगामी आणि तर्कशुद्ध अशा त्यांच्या चिंतनातून पुढील ओळी निर्माण झाल्या. ‘गुलामगिरी’ मधील त्या ओळी अशा आहेत  –  ’विधेविना मती गेली । मतीविना नीती गेली । नितीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविनाशुद्र खचले । इतका अनर्थ एका विधेविना केला ।।। शिक्षण हेच समाज – मानस परिवर्तनाचे प्रभावी मध्यम आहे, हे लक्षात येताच अस्पृश्यासाठी, स्त्रियांसाठी त्यांनी शाळा काढल्या , अनाथाश्रम काढले  ,वृत्तपत्रे काढलीत ,धर्म जन्माने न मिळता माणसाने स्व:त च्या बुद्धीने स्वीकारला पाहिजे. शेतकर्यानच्या व्यथा इंग्रज प्रश्यासनाच्या कानी पोहचविल्या,शेतकरी हा समाजाचा कणा आहे. पोशिंदा, अन्नदाता आहे, असे मत त्यांनी मांडले.आणि जनजागृती केली. त्यांच्या साठाव्या वर्षी जनतेने मुंबईस त्यांचा सत्कार करून त्याना ‘ महात्मा ‘ हि पदवी बहाल केली.  ६३ वर्षे ते चंदना सारखे झिजले. प्रवास केला, व्याख्याने दिली, लेख लिहिले,स्वातंत्र्य , समता, लोकशाही, विज्ञान, इह्वाद, या आधुनिक मुल्यांवर भर देवून सामाजिक क्रांतीची पेरणी केली. डॉ. आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले. सहज सोप्या भाषेत नेमकी स्पष्टता आनने त्यांना जमत असे. विच्यारांना कृतीशिलतेची जोड दिली. ‘ जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे’ मग महंत लीला स्वभावे, अंगी बाणे’. या समर्थ वचनांची सार्थकता सिद्ध करणारा हा माहात्मा सर्व सुखांचे आगर, नीती तत्वांचे माहेर, असा हा महात्मा अविरत कष्टाने २८ नोहेंबर १८९० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांना आपले सर्वांचे कोटी कोटी प्रणाम !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज!

$
0
0

अवतीर्ण ३० एप्रिल १९०९ — ब्रम्हलीन ११ आक्टोंबर १९६८

tukdoji maharaj marathi essayवंद्नीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रश होऊन त्यांना भात म्हणत. बारश्याला दिनांक ११ मे १९०९ रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु  श्री संत गुलाब महाराज व याव्लीचे महाराज यांनी मुलाचे नाव ‘माणिक’ ठेवले आणि आशीर्वाद देवून निधून गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आद्कोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ! ठेवले होते.

इ.सन.१९२५ मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन,कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरी वर उत्तम भजने गायली.दि. २३ फेब्रुवारी १९३५ शनिवार रोजी सालबर्डी येथील अज्ञांत आले. पुढे त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. २८ ऑगष्ट१९४२ शुक्रवार रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. आणि डिसेम्बर मध्ये सुटका झाली. १९४३ मध्ये विश्वशांतीनाम सप्ताह झाला.५ एप्रिल १९४३ सोमवार रोजी श्री गुरुदेव मुद्र्नाल्याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. १९ नोहेंबर १९४३ शुक्रवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली.हरीजनां साठी त्यांनी मन्दिरे खुली केली. ते म्हणत गावा गावासी जागवा ।  भेदभाव समूळ मितवा” उजळा ग्रामोन्नतिचा दिवा । तुकड्या म्हणे ।”

ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत.  प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरु स्मरण व अंधश्रद्धा, वाईटरूढी,व्यसने यांचा त्याग करा. अस्या आशयाचे थोडा वेळ भाषण केले कि, हातातील खन्जरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाडी आवाजातील व सुंदर चालीतील मराठी-हिंदी पदांचे भजन सुरु होई व त्यात कुठल्याही थरातील वा धर्मातील श्रोता तल्लीन होवून जाई.  सर्व पंथांचे व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी बनले. व त्यांना राष्ट्र संत तुकडोजी या नावाने संबोधू लागले. ‘ ग्रांमगीता’ लिहून गावाचे व लोकांचे कल्याण कशात आहे हे समजाविले.भारत कृषी प्रधान देश आहे. म्हणून कृषी उद्योगात सुधारणा सुचविली. सामुदायिक प्राथना करावी.  सर्वांशी प्रेमाने वागाव. गोवध बंदी, व पशु संर्वधन करावे हे शिकविले.

दिनांक २३ एप्रिल १९४७ बुधवारी श्री गुरुदेव आश्रम नागपूरचे उद्धाटन केले. भारताचे राष्ट्रपती श्री राजेंद्र प्रसाद यांचे कडून त्यांना १९४९ मध्ये ‘राष्ट्र संत’ उपाधी प्राप्त झाली.प्म्ध्र्पुरात १९४९ साली त्यांनी संत सम्मेलन घेतले.विश्वधर्म परिषद व विश्वशांती साठी ते सयाम, ब्रम्हदेश, व जपान येथे जावून आले. तेथे सर्व धर्म व सर्वांचा देव एकच आहे, हे खंजेरीद्वारे भजनातून सांगितले. ( हर देश में तू ,हर भेष में तू । तेरे नाम अनेक तू एकही है ‘।। )

भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी गुरुकुंज मोझरीला भेट देण्यासाठी इ.सन १९ मार्च १९५६ रोजी रविवारला गेल्यात. चीन युद्ध १९६२ व पाकीस्थान युद्ध १९६५ झाले तेव्हा सैन्यास धीर देण्या साठी स्व:त सीमेवर जाउन वीरगीते गाईली, व सैन्याचे धैर्य वाढविले. ते फ़ार प्रयत्नवादि  होते.तन,मन,धनाने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. ते खरे राष्ट्र संत होऊन गेले. दिनांक ११ आक्टोंबर १९६८ गुरुवार रोजी हे वंदनीय राष्ट्रसंत ब्रम्हलीन झाले.  त्यांचे चरणी आपले शत: शत: प्रणाम !

अहिल्याबाई होळकर

$
0
0

जन्म – १७२५ — मृत्यू १३ ऑगष्ट १७९५

ahilyabai holkar marathi essayअहिल्या बाई यांचा जन्म बीड जिल्ह्यात चोंढे नावाच्या लहानश्या गावात १७२५ या साली झाला.या गावचे पाटील माणकोजी शिंदे हे त्यांचे वडील. अत्यंत गरीब घराण्यात जन्मलेली अहिल्या नाकी डोली तरतरीत व तेजस्वी चेहर्याची होती.घरातील साध्या राहणी बरोबर धर्मनिष्ठेचा, ईश्वरा वरील श्रद्धेचा वारसा अहिल्याबाईस लाभला होता. १७३३ साली वयाच्या आठव्या वर्षी अहिल्या खंडेराव होळकरांशी विवाहबद्ध झाल्या. मल्हारराव होळकर हे इंदूरच्या घराण्याचे संस्थापक व अहिल्या बाईचे सासरे ते मुळचे धनगर आणि होळ गावचे रहिवासी. होळ हे गाव पुण्या पासून ४० मैलावर आहे मल्हाररावक़नचे आधीचे आडनाव वीरकर होते. पण होळ येथे राहणारे म्हणून होळकर झाले. ते तीन वर्षाचे असतांना त्यांचे वडील वारले घरच्या भांडणाला कंटाळून त्याच्या आईने होल हे गाव सोडले. आणि ती मल्हार सह आपल्या भावा कडे राहू लागली.

बाजीराव पेशव्याने मल्हाररावांचे शौर्य व पराक्रम पाहून त्यांना आपला सरदार बनविले. रघुनाथरावांच्या उत्तरे कडील पहिल्या स्वारीत मल्हाररावांनी महत्वाची कामगिरी केली. तेव्हा बाजीरावने माळवा प्रांताची जहांगिरी मल्हाररावांना दिली. मल्हार राव अश्या अर्थाने राजा झाला. अश्या एका राज्याच्या सरदार मल्हारराव होळकरांच्या घरात अहिल्या बाई ने सून म्हणून प्रवेश केले. वयाच्या आठव्या वर्षी माणकोजी शिंद्यांची अहिल्या, होळकरांची गृहलक्ष्मी झाली. सन १७४५ मध्ये अहिल्याबाई पुत्रवती झाल्या. मुलाचे नाव मालोराव असे ठेवण्यात आले. त्यानंतर तीन वर्षाने त्यांनी एका मुलीस जन्म दिला.  मुक्ताबाई नाव ठेवले.

मल्हारराव व त्यांचे भाऊ खंडेराव जेव्हा मोहिमेवर जात तेव्हा अहिल्याबाई राज्यकारभाराकडे लक्ष देवून प्रजा पालनाची जबाबदारी स्व:त वर घ्यावी लागे. ती जबाबदारी अहिल्याबाई आपल्या बुद्धीमत्तेने व चातुर्याने चांगल्या प्रकारे पार पाडू लागली. त्यामुळे मल्हाररावांचा आपल्या मुलापेक्षाही तिच्या वर जास्त विश्वास बसला. कधी कधी तती सैन्याबरोबर सुद्धा जाई. घोड्यावर बसने. शस्त्रांचा योग्य उपयोग करणे, याच बरोबर लढांईचे डावपेच हि ती शिकली.

रघुनाथरावांच्या (पेशव्यांच्या) उत्तरेकडील जाटावरील पहिल्या स्वारीत मल्हाररावाने खंडेराव व अहिल्या बाईस हि आपल्या बरोबर घेतले होते. मराठ्यांची फौज खंडणी करीत करीत पुढे चालली होती. कुम्भेरिच्या सुरजमल जाताला रघुनाथराव पेशव्याने एक कोटी रुपये खंडणी मागितली ती देण्याचे नाकारून सुरजमल जाटाने लढाई ची तयारी केली. तेव्हा मराठ्यांच्या सैन्न्याने कुम्भेरिच्या किल्ल्यास वेढा घातला. लढाईला तोंड  देऊ लागले.  दोन्ही बाजूंच्या तोफ़ाव बंदुका लाःल्या खंडेराव ‘घुटी’ ची सवय असल्यामुळे. रनांगणावरही तो बेहोष अवस्थे मध्ये असायचा. त्या दिवशी घुटी चढवून मोर्च्याच्या जागी जात असताना जाटाच्या तोफेतून सुटलेली एक गोळी लागून तो रनांगनावर ठार झाला. खंडेरावाच्या निधनाने मल्हाररावांची म्हातारपणची काठी गळून पडली. आणि अहिल्या बाईंचे सौभाग्यचं लोपले.

पती युद्धात मारल्या गेल्या नंतर सती जाणार्या अहिल्येस सासर्यांनी थोपविले.राज्यकारभाराचे धडे दिले. आणि स्वत:च्या निधना अगोदर राज्य त्यांच्या हाती सोपविले. अति दक्षतेने अहिल्या बाईने पुढे २८ वर्षे राज्य कारभार चालविला. दरबारात जातीने बसवून अनेक कामे त्या हाता वेगळी करीत. शत्रू देखील त्यांच्या बद्दल आदर बाळगीत असत. भ्रष्ट झालेल्या मंदिरांची पुर्न्र बांधनी, जीर्णोद्धार, देवतांची प्रतिष्ठापणा, घाट -रस्ते, धर्मशाळा बांधणे, अन्न छत्रे चालविणे या लोकोपयोगी कामा मुले भारतात व महाराष्ट्रात त्यांचे नाव अजरामर झाले आहे. अहिल्याबाई आचरणाने अत्यंत पवित्र स्वभावाने स्वाभिमानी, राजकारणात दक्ष, व धर्म कारणात सर्वस्व दानी होत्या. ऎतिहासाथि त्यांची बरोबरी फार थोड्या स्त्रिया करू शकतात.त्यांनी सोरटी-सोमनाथ, काशी-विश्वनाथ अश्या भ्रष्ट मंदिरांची पुनर निर्मिती व देवताची प्राण प्रतिष्ठा केली. पेशवे तर अहिल्या देवींना मान देतच परंतु टिपू व निजाम  यान सारखे शत्रू  देखील त्यांना मान देत असत.

 अश्या  या व्यवहारदक्ष, प्रजाहित तत्पर, राजकारणी, उदार, धर्मशीलदेवी अहिल्याबाईने श्रावण वद्य चतुर्दशी शके १७१७ दिनांक १३-८-१७९५ रोजी  ‘नामस्मरणाचे’ घोषात देहावसान झाले. पुण्यश्लोक मातोश्री वात्सल्याने जोपासलेली होळकरशाही पोरकी झाली. अहिल्याबाईचे चरित्र अलौकिक आहे. स्त्री असूनही तिच्यात अहंकाराची भावना मुळीच नव्हती. विलक्षणधर्म वेडा बरोबरच तिच्या परधर्म सहिष्णुता होती. पराकाष्टेचा धर्मभोळेपणा असूनही आपल्या प्रजेच्या कल्याणा खेरीज दुसरे विचार मनाला शुवू दिले नाही. तीने अनियंत्रित अधिकाराचा उपयोग फारच दक्षतेने व काळजी पूर्वक केला. या कामी तीची नम्रवृत्ती कायम होती. आपल्या सद्सद बुद्धीचे आदेश तिने कसोसीने पाळले. स्व:त चे आचरण अत्यंत निर्दोष ठेवूनही ती दुसर्याच्या दोषाबद्द्ल व मनाच्या दुर्बलतेबद्दल क्षमा वृत्तीच धारण करी.

महावीर स्वामी!

$
0
0

Bhagwan Mahaveerविश्व कल्याणकारी आत्म्यांनी या भारत भूमी वर जन्म घेऊन आपले अवतार कार्य पूर्ण केले. अश्या पुरषोत्तमात श्री महावीर स्वामींचे स्थान हे फार वरच्या क्रमांकावर लागते. ख्रिस्ती सनापूर्वी ५२७ वर्षी एका वैभवशाली राज घराण्यात महावीरांचा जन्म झाला. राज वैभव आणि भौतिक सुखाचा त्याग करून मानवतेत त्यांनी सारे जीवन व्यतीत केले. बारा वर्षे खडतर तपस्या केली.अत्यंत खडतर शारीरिक यातना सहन केल्यां त्या नंतर त्याना आत्मज्ञान मिळाले. त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. जैन धर्माची शिकवण दिली.जीन म्हणजे इंद्रिय दमन करणारा त्यावरून ‘जैन’ हे नाव रूढ झाले.

महावीरांचे लहाण पनचे नाव वर्धमान होते.वैशाली गणराज्यात बिहार राज्यात कुंडग्रामी १६ एप्रिल ख्रिस्ती सना पूर्वी ५२७ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ हे क्षत्रिय जनगन तंत्राचे प्रमुख होते. त्रिशीला हे त्यांच्या मातेचे नाव लिच्छवी गणराज्य प्रमुखाची ती बहीन वयाच्या पाचव्या वर्षी शिक्षणासाठी त्याला गुरुकुलात पाठविण्यात आले. तो संस्कृत पंडित बनला. वेदशास्त्र निपुण झाला. राजकन्या यशोधराशी त्यांचा विवाह झाला. त्यांना तिच्या पासून एक मुलगीही झाली. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी राजप्रासाद सोडला.अध्यात्मिक ज्ञान संपाद्ना साठी बारा वर्षे कठोर तपस्या कली. एकदा समाधी अवस्थेत त्याना त्यांच्या कडक तपश्चर्येने कैवल्याचे ज्ञान झाले. त्याच वेळी ते पवित्र झाले. एकदा वृक्षाखाली बसले असताना मनाची एकाग्रता व विशुद्धता यामुळें मनोविग्रह साधतो, याच अवस्थेत सत्य, सत्याचरण, आणि प्रज्ञानबोध होतो. या त्यांच्या इंद्रियदमनामुळें लोक त्यांना महावीर म्हणू लागले.

द्रुष्ट रुढींचे प्राबल्य माजले म्हणजे खरी धर्माची शिकवण विसरली जाते. धर्माच्या नावाने स्वार्थी, पुरोहित रुढींचे स्तोम वाढवितात. अज्ञानी , धर्मभोले लोक त्याला बळी पडतात. महावीरांच्या काळी अशीच स्री वर्गाची दयनीय अवस्था केवळ, गैरसमज व रुढींमुळे झालेली होती स्रियांना मान प्रतिष्ठा तर राहु द्याच पण माणुसकीची वागणुक ही दिली जात नव्हती. दासी प्रथा समाजात बोकाळलेली होती. या दासींना पशुप्रमाने जीवन जगावे लागत असे. आणि मग अश्या दासींना कोणी जवळ सुद्धा करीत नसत. त्यांच्या हातचे अन्न कोणी खात नव्हते, त्याना शिवत देखील नव्हते. महावीरांचे करुणामय हृद्य हे सर्व पाहून वेदनांनी भरून येई. त्यांनी लोकांना दासी कडे पाहण्याचा तुच्छ दृष्टीकोण सोडून देण्यास शिकविले. उच्च-निच्च, भेदभाव, शिवाशिवी,ह्या खुळ्या कल्पनांचा त्याग करावयास सांगितले. महावीरांच्या कृतीने अनेकांचे डोळे उघडले.त्यांना नवी दृष्टी लाभली. सद्धर्माचा प्रकाश दिसला;! ” धर्मही उपदेश करण्याची वस्तू नसून आचरणात आणण्याची गोष्ट आहे;! ” असा उपदेश त्यांनी लोकांना दिला.

ज्याने स्व:त ला जिंकले तो जगहि जिंकतो. वासनामुक्त जीवन,अहिंसा धर्म, या व्रताने कोणत्याही प्राण्याला दु;ख देता येत नाही. या सर्व शिकवणी त्यांनी तीस वर्ष दिल्यात, ‘ऋषभदेव’ हा पहिला जैन तीर्थकर जैन धर्माचा संस्थापक मानतात. ‘महावीर’ हा चोविसावा तीर्थकर होता. त्यांनी जैन धर्म संघटीत केला. मगधाचा राजा बिंबीसार त्यांचा चाहता होता. ख्रिस्ती सनापूर्वी ५९९ साली, तो निर्वाणावस्थेत पोचला.

महात्मा गांधी जयंती

$
0
0

जन्म २ ऑक्टोबर १८६९  — मृत्यू ३० जानेवारी १९४८

mahatma gandhi pictureभारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले उमेदीचे संपूर्ण आयुष्य वेचले,अश्या थर नेत्यान मध्ये महात्माजींचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. इंग्रजीराज्याला विरोध करण्यासाठी अनेकांनी अनेक मार्ग स्वीकारले कोणी शस्त्र बळाने तर कोणी शब्द बळाने इंग्रजस्त्ताधीशायांना वीरोध केला.पण महात्मा गांधींनी सत्याग्रहाने इंग्रजांना नमविले. त्यासाठी जनमत तयार करण्यावर त्यांचा भर होता. समाजात जी जागृतीनिर्माण केली त्यात देश्याभिमान आणि त्याग यांना महत्व होते. त्यांनी स्वत:जीवन त्या दृष्टीने घडविले होते.

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर१८६९ मध्ये पोरबंदर येथे झाला त्यांनी ब्यरिष्टर पदवी पर्यंत शिक्षण घेतले. त्यातच त्यांनी ऑफ्रिकेत वर्णभेदाचा अनुभव घेतला.गोऱ्या इंग्रजांनी कृष्णवर्णीयांना एवढ्या वाईट रीतीने वागवायचे कि जणू ते कोणी गुलामच होते. तेच त्यांनी ऑफ्रिकेत अनुभवले. आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्यांनी बसायचे हे गोऱ्यांनी ठरवायचे! गांधींनी याविरुद्ध अहिंसा आणि सत्याग्रह हे मार्ग स्वीकारून विरोध व्यक्त केला. ऑफ्रीकेतून परततांना त्यांनी अन्याय आणि विषमता नष्ट करण्यासाठी झगडण्याचा निश्चय केला होता.

गांधीजी भारतात आल्या नंतर त्यांनी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी संपर्क साधून भारतातील परिस्थिती समजावून घेतली. सर्वत्र प्रवास करून प्रत्यक्षात त्या परिस्थितीचा अनुभव घेतला.माणसाने माणसांना मानुसकिनेच वागवावे हेच सूत्र सर्वांना समजावणे आवश्यक असल्याचा निर्णय त्यांनी घेतला. समाजातल्या उच्च-निच्च, धनवान- द्लीद्री, सुशिक्षित – असुशिक्षित, मालक- मजूर, स्त्री- पुरुष  अश्या भेदा मधली दुरी कमी करने हेच प्राथमिक काम प्रथम करण्याचे ठरविले. त्याच बरोबर इंग्रजांच्या
देशविघातक जुलमी धोरनांना विरोध करतांना अहिंसा,सत्याग्रह या साधनांचा वापर करण्याचा निश्चय केला.

भारताती तत्वज्ञान, जीवनपद्धती यांच्या वरील सखोल चिंतनाने त्यांचे जीवन भारावले गेले. आश्रम-जीवन, स्वावलंबन ,अन्न- वस्त्रे यांच्या गरजा कमी करणे, साधी राहणी, आत्मशुद्धी, मानवतावादी विचारसरणी अश्या अनेक बाबींवर ते विचार करीत राहिले. परावलंबनाने भारताची आर्थिक कुचंबना होत आहे, इंग्रज सरकार भारतीयांना विदेशी मालाचे प्रलोभन दाखवून लुबाडते आहे, या विषयी विचार केल्यावर त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. स्वत:सूतकताई, गरजे पुरती वस्त्रे , स्वालंबन, आश्रम-जीवन, यांचा स्वीकार करून ‘ बोले तैसा चाले ‘ हा आदर्श त्यांनी जनते समोर ठेवला. एक पंचा,एक उपरणे,साध्या चपला अशा त्यांच्या दर्शनामुळे जनतेला आदरणीय आदर्श नेता वाटू लागले राष्ट्राला स्वातंत्र्यासाठी कोणत्या मार्गाने जायला हवे या विषयात लक्ष घालून त्यांनी स्पृश्य -अस्पृश्य, हिंदू- मुसलमान, या सर्वावर भारतीय तत्वांची भावना निर्माण करून ऐक्य साधले पाहिजे असा प्रचार केला. त्यांच्या भाषणांतून लीखांनातून आणि प्रार्थनासभांतून हीच शिकवण ते देत राहिले. जनतेने त्यांना ‘महात्मा’ हि उपाधी दिली. तसेच त्यांना ‘ राष्ट्रपिता’ म्ह्नवूनही गौरविले. गांधीजींच्या कोनत्याहि आंदोलनात त्यामुळेच जनता त्यांच्या सोबत राहिली.

इंग्रजांनी केलेल्या जुलमी कायद्यांना विरोध करण्यात गांधीजी अह्र्भागी असत. १९१९ मद्ये रौलट कायद्या विरूद्धचे आंदोलन, चंपाअरण्यातील शेतकर्यावरील अन्याया विरुद्ध सत्याग्रह, अलाहाबादच्या गिरणी कामगारांसाठी उपोषण, असहकारीतेची चळवळ,हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्यासाठी केलेले  २१ दिवसांचे उपोषन, भारतातल्या मिठावर लादलेल्या कराविरुद्ध, १९३० ची दांडीयात्रा इ. उदाहरणे त्यांच्या कृतीची कल्पना देणारी आहेत. त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. इंग्रजांनी पुढे केलेल्या स्वार्थी योजनांना गांधीजींनी प्रखर विरोध केला.

आपली पूर्ण विचारांनी बनवलेली मते त्यांनी स्व:त आचरणात आणली पण ती ईतरांवर लादली नाहीत. हृद्य परिवर्तनाने जेवढे साधेल तेवढेच टिकाऊ ठरेल अशी त्यांची धारना होती. दारूबंदी, हिंदीचा प्रचार, स्वच्छता मोहीम, शिक्षणाची योजना, हरिजनांच्या उद्धाराचे प्रयत्न, ग्रामजीवनाच्या उन्नतीचे प्रयत्न,अश्या अनेक समाजहित साधणार्या कार्याचा ते सतत पाठपुरावा करीत राहिले. त्यांची प्रार्थनासभा म्हणजे समाजशिक्षणावरील प्रवचने असे. म्हात्मा गांधींचे कट्टर अनुयायी विनोबा भावे यांनी गांधीजींच्या उपदेश्याचे,सत्याग्रही- व्रताचे दिग्दर्शन या प्रमाणे केले आहे. — अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, असंग्रह, शरीरश्रम, स्वदेशी, भयवर्धन, सर्वधर्मी, समानत्व याप्रमाणे होय.

महात्मा गांधीच्या व्यक्तिमत्वाने, आचरणाने, शिकवणुकीने,आनि प्रत्यक्ष कार्याने प्रभावित झालेली जनता स्वातंत्र्यॊत्सुक बनली. हि निश्चिती झाल्यावर गांधीजींनी इंग्रजांना १९४२ मध्ये ‘चले जाव’ असे ठणकावून सांगितले. या घोषणेने संपूर्ण भारतात एक मोठी चळवळ निर्माण झाली. गांधीजीसह अनेक थोर नेते सरकारने तुरुंगात पाठविले. पण जनतेने माघार घेतली नाही उलट हे आंदोलन तीव्र केले. ठिकठीकाणी धरपकड, लाठीमार, गोळीबार करून इंग्रजांनी हि चळवळ दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर इंग्रजांना १९४७ मध्ये भारत सोडून जावेच लागले. आणि भारत स्वतंत्र झाला. सत्याग्रही गांधीजींच्या विच्यारात केवळ माणुसकी, शब्द पाळणे, अहिंसात्मक लढा देणे, यांना महत्व होते. काहींना हे विचार पटत नव्हते. देश्याची फाळणी झाली ती अश्या गुळगुळीत धोरणांनीच; अशी समजूत असलेल्यांनीच गांधींच्या विचारांचा निषेध केला. आणि या वैच्यारिक संघर्षनातूंच महात्माजींची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या करण्यात आली. पण मृत्यू समयी त्यांच्या मुखातून ‘ हे राम ‘ हे उद्गार काढून त्यांनी हे जग सोडले.


mahatma gandhi young picture mahatma gandhi young picture1 mahatma gandhi young picture2 mahatma gandhi young picture3 mahatma gandhi young picture4 mahatma gandhi young picture5 mahatma gandhi young picture6 mahatma gandhi young picture7 mahatma gandhi young picture8

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन !

$
0
0

शिक्षक दिन, ५ सप्टेंबर.

Teacher's Day, Dr. Sarvapalli Radhakrishnan's Birthday५ सप्टेंबर हा दिवस म्हणजे आपल्या स्वतंत्र भारताच्या एका महान शिक्षकाचा जन्म दिवस आहे. शिक्षणक्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ज्यांनी ठसा उमटवला आणि आदर्श शिक्षक म्हणून सरवानकडून सन्मान मिळविला ते महान शिक्षक म्हणजे  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होत. ५ सप्टेंबर १८८८ रोजी त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. त्यांनी उपराष्ट्रपती  आणि राष्ट्रपती असि दोन्ही पदे भूषविली. देशात आणि प्रदेशात त्यांनी अनेक सन्मान मिळविले. पण ते आदर्श शिक्षक म्हणून सर्वांना आदरणीय वाटत होते, त्यामुळे त्यांचा जन्म दिवस ‘शिक्षकदिन ‘म्हणून पाळला जात होता.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे अत्यंत विश्वासू वृत्तीचे होते. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतांना त्यांनी सतत पहिली श्रेणी मिळवून आपल्या बुद्धीची चमक दाखविली. त्यांचा तत्वज्ञान हा विषय अत्यंत आवडीचा होता. हा विषय घेऊन त्यांनी  बी.ए.च्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाले. पुढे एम.ए.झाल्यावर प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरु केले. १९२१ साली म्हैसूरला नवीन विद्यापीठ स्थापन झाले. तेथे राधाकृष्णन तत्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून गेले तेथून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. १९२६ मध्ये इंग्लंडला भरलेल्या  ‘आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषदे ‘ साठी त्यांची भारताचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली हती. पुढे अनेक देशात त्यांनी हिंदूंचे धर्मतत्वज्ञान प्रभावीपणे मांडले. नंतर ते जग प्रसिद्ध तत्वज्ञानी म्हणून मान्यता पावले.

ऑक्सर्फर्ड विद्यापीठाने त्यांना खास आमंत्रण देवून धर्म, नीतिशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयांवरील व्याख्यानांसाठी बोलविले होते. डॉ.राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरू पद भूषविले. नंतर १९३१ ते १९३९ हि वर्षे त्यांनी राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ मध्ये रशियातील राजदूत म्हणून त्यांची भारत सरकारने नियुक्ती केली होती. त्या देशातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. ते १९५२ मध्ये भारतात परतताच त्यांना प्रथम उपराष्ट्रपती पदावर १९५२ ते १९६२ पर्यंत कार्यरत होते. नंतर १३ मे १९६७ या कालावधीत ते भारताचे रास्त्र्प्ति म्हणून कार्यरत होते. १९५२ ते १९६७ हि वर्षे त्यांनी हि दोन पदे सांभाळली. नंतर ते निवृत्त झाले. भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. १९५४ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब बहाल केला.

धर्म आणि तत्वज्ञान या विषयानप्रमाणेच त्यांचा या विषया वरही उत्तम अभ्यास झालेला होता.स्वतंत्र भारताला शिक्षण विषयक आपले धोरण निश्चित करणे आवश्यक होते. यासाठी १९४८ ला भारत सरकारने पहिला शिक्षण-आयोग स्थापन केला. त्या आय्गाच्या अध्यक्षपदी डॉ. राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली. त्यांनी लेखनही भरपूर केले होते. त्यांचे तत्वज्ञान विषयक ग्रंथ जगभर गाज्लेत. भारतीत धर्माचे श्रेष्ठत्व दाखवून देणारेहि त्यांचे ग्रंथ आहेत. प्राध्यापक असल्यापासून त्यांनी शिक्षकाच्या भूमिकेत कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे ते स्व:त च्या उदाहरणाने दाखवून दिले. आदर्श शिक्षकाने व्यासंगी बनावे, चांगल्या पद्धतीने आपले विचार दुसर्याला सांगावे, शैक्षणिक क्षेत्रातील गुण-दोष पाहून त्यावर कशी मात करता येईल त्यावर लक्ष ठेवावे म्हणजेच आदर्श शिक्षक होता येईल हाच त्यांनी आदर्श शिक्षक बनण्यासाठी दिलेला संदेश होता.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आजन्म शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षण विषयांत लक्ष घालून दिलेले विचारधन लक्षात घेऊनच त्यांचा जन्मदिन हा’शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ.राधाकृष्णन यांनी खर्या गुरूची कल्पना अतिशय सर्वोत्कृष्ट शब्दात मांडली आहे. त्यांच्या मते खरा गुरु तोच जो विद्यार्थ्यांना केवळ बोद्धिक नव्हे तर अध्यात्मिक अंध:कारही नाहीसा करील. ज्याचा आचार आदर्शवत व अनुकरणीय आहे तोच आचार्य ! तो विद्यार्थ्याला सद्गुण व चांगुलपणा याची प्रेरणा देत असतो. शिक्षक हा केवळ माहिती देत नाही तर आत्म्याची शक्ती तो शिष्या मध्ये जागृत करतो त्यांनी शिक्षक आणि शिष्य यांच्यात काही नाते निर्माण झालेले नसेल तर शिक्षण हि एक यांत्रिक क्रिया बनते. शिक्षक आपल्या समोर कोणते चारित्र्य पूर्ण आदर्श ठेवतात याचे महत्व मुलांना असते. डॉ.राधा कृष्णन हे हाडांचे शिक्षक होते. आदर्श शिक्षकाची सर्व लक्षणे त्यांच्यात होती. शिक्षण क्षेत्रातील अनास्था दूर करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यापासून आपण प्रेरणा घेऊ यां !डॉ. राधा कृष्णन यांचे १६ एप्रिल १९७५ रोजी निधन झाले.

मित्रानो आपण ‘शिक्षक दिन ‘साजरा करतो. तो आदर्श शिक्षकाचा सन्मान करावा याच उद्देशाने. हा शालेय जीवनातील महत्वाचा दिन आहे. गुरुजनांच्या संबं धातली आदराची आणि कृतज्ञतेचि भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस योजलेला आहे.

तसेच शिक्षकांनीही डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा संदेश लक्षात ठेवूनच व अमलात आणूनच हा सन्मान स्वीकारावा.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करू यां !

लॉर्ड बेडन पॉवेल !

$
0
0

जन्म २२ फेब्रुवारी १८५७ .. मृत्यू ८ जानेवारी १९४१

बेद्न ओप्वेल ही जगभर पसरलेल्या  ‘बालवीर’ संघटनेचे जनक असून त्यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्स स्मित बेड्न पॉवेल . त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला. लंडन मधील चार्टर औस ह्या शाळेत शिष्यवृती मिळवून त्यांनी शिक्षण केले. इ. सन. १८७६ साली लष्करात त्यांना कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी दक्षिण ऑफ्रीका, अफगाणिस्थान, भारत अश्या विविध ठिकाणी कामगिरी बजावली.आपल्या कर्तुत्वावर ते लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोचले. १९०७ साली त्यांनी ; बालवीर’ चळवळ सुरु केली.

थोड्याच दिवसात हि चळवळ अनेक देशांत पसरली.१९१० साली आपली बहिण ओंग्रेस हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी ‘वीरबाला’ हि संघटना स्थापन केली.विवाहा नंतर ह्या संघटनेची जबाबदारी त्यांच्या पत्नीने लेडी-बोड्न- पॉवेल यांनी सांभाळली संघटने च्या स्थापने पासून ६-७ वर्षातच या संघट्नेची पथके बेल्जियम, हॉलण्ड, अमेरिका, भारत, चीन, रशिया राष्ट्रांन मध्ये सुरु झाली. संघनेची पाहणी करण्या करीता. या पती-पत्नी ने सर्व देश्यांना भेटी दिल्या. त्यात भारतालाहि त्यांनी १९२१व १९३७ साली भेट दिली होती.

बाय स्काउट १९१६ साली चेन्नई जवळ अड्यार ला सुरु झाले. १९१७ साली पं. मदनमोहन मालवीय यांनी बॉइज स्काउट चळवळ सुरु केली.१९२१ साली लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सर्व संस्था एकत्र केल्या.व त्याचे नाव बायस्काउट ठेवले.१९३८ हिंदुस्थानात स्काउट असोशियन ची स्थापना केली. त्यात हिंदुस्थान स्काउट. बायस्काउट ,गर्ल गाईड हे भाग होते. ७ नोहेंबर १९५० मध्ये एकत्रित होऊन ‘ भारत स्काउट & गाईड ‘ असोशियन हे नाव दिले.

भारतीय मुलांना मातृभूमीचे उत्तम नागरिक बनविण्यात सहकार्य करणे हा उद्द्येश होय. ईश्वरा विषयी पूज्य भावना, स्वहितापेक्षा देशहित मोठे, शेजारी व ईतराविषयी सेवाभावाचे बीज रुजावे हा उद्द्येश होय. सर्वजगात बंधुभाव, ऐक्य , व शांतता नांदावी, समान ध्येयाच्या संस्थांशी मित्रत्व राहील हे धोरण स्काउट चे आहे. हे पटवून दिले.दिनांक ८ जानेवारी १९ ४१ रोजी त्यांचे निधन झाले.

lord baden powell Original picture collection:

Baden-Powell picture  gallery original picture Baden-Powell picture  gallery original picture1 Baden-Powell picture  gallery Baden-Powell, Chief Scout 1 Baden-Powell, Chief Scout Robert Baden-Powell

स्वातंत्र्य दिन १५ ऑगष्ट!

$
0
0

१५ ऑगष्ट..

independence day 15 august

आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून १५ ऑगष्ट१९४७ ला स्वातंत्र्याच्या पवित्र्यतेचे श्रेय मिळाले. आपल्या पिढीतल्या कोणत्याही दृष्टीने १९४७ हे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय. या एतिहासिक सालाच्या पवित्र घटनाच्या पावन स्मृती आपण कायम ठेवल्याच पाहिजेत. आणि कर्तव्य बुद्धीने आपण दरवर्षी १५ ऑगष्ट्ला “स्वातंत्र्य दिन” म्हणून साजरा करतो.

माणूस असो वा देश असो स्वातंत्र्या सारखे दुसरे सुख नाही. हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले. या प्रयत्नाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यामार्गांचे ध्येय एकच होतेआणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य!  इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतात राज्य केले. तेवढ्या काळात आमचा ईतिहास, आमचा पराक्रम, आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम त्यांनीकेले. भारतात शिक्षणाचा प्रचार करण्याचा देखावा निर्माण करून भारतीय तरुंनाना पोटभरू कारकून बनविणे एवढीच त्या शिक्षणाची मर्यादा होती. तलम कापडाचे आकर्षण निर्माण करून आमच्या शेतकर्यांना लुबाडले. स्व:त मालकीच्या चहाच्या मळ्यांची भरभराट साधण्यासाठी भारतीयांना चहाचे व्यसन लावले. असा अनेक प्रकारे भारतीयांना लुबाडले.

इंग्रजांचा कावेबाजपणा ओळखणार्या काहींनी त्यांच्या विरुद्ध शस्त्र उगारले. १८५७ स्वातंत्र्यसमर तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई,नाना साहेब पेशवे यांनी गाजविले. पुढे सशस्त्र उठाव करून वासुदेव बलवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इ. आपला निषेध शस्त्रांन द्वारे नोंदविला.काहींनी इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली. स्वातंत्र्यवीर सावरकर, धिंग्रा यांनी तसेच प्रयत्न केले. लोकजागृती झाली, पण ती दडपली गेली. रानडे, टिळक,गोखले,आगरकर यांनी लेखणीचे आणि वाणीचे सामर्थ वापरून इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि जुलूम यांची जनतेला जाणीव करून दिली. भारतीय समाजाला आपली स्थिती सुधारण्याची प्रेरणा, जाणीव करून दिली. फुले इ. च्या शिकवणीने जातीयभेदाभेद किती वाईट आहे व त्याने समाज कसा दुर्बल  होतो हे लोक शिकले.

कित्येक क्रांतीकारी फासावर गेले. टिळकांनी, सावरकरांनी आणि अशा अनेक क्रांतीवीरांनी तुरुंगवासातच उमेद घालविली. परंतु इंग्रजांनी यावर अधिकारपदे, मोठमोठ्या पदव्या, हक्क नसलेल्या कमिट्या यांच्या उपायांनी भारतातील जनतेत फुटाफुट निर्माण केली. फोडा आणि झोडा हे त्यांनी त्यांची सत्ता कायम ठेवण्यासाठी वापरलेले तंत्र होते. पुढे महात्मा गांधीच्या कडे देशाचे नेतृत्व आल्यावर पूर्वीच्या प्रयत्नांचा उपयोग होत नाही, असे पाहून त्यांनी सत्याग्रहाच्या व अहिन्स्तेच्या मार्गाने जाण्याचा संदेश त्यांनी जनतेला दिला. त्याबरोबरच स्वदेशी, स्वालंबन, असहकार अश्या मार्गांनी सर्वत्र भारतीयांना इंग्रजां विरुद्ध आंदोलन करायला शिकविले. सरकारी जुलमी कायदे, अन्याय, नोकऱ्या यान विरुद्धसत्याग्रहाची मोहीम सुरु केली. गांधीजींना जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इ.सहकार्य केले. सुभाषचंद्र बोस यांनी मोठ्या धाडसाने इंग्रजांच्या विरोधात  “आझाद हिंद फौज”  उभी केली.

 अश्या प्रकारे अनेकांनी भिन्न भिन्न मार्गाने व अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळविले गेले आहे.आपल्या पिढीचा स्वतंत्र्य भारतात जन्म झाला आहे. आता भारताचे स्वातंत्र्य टिकविण्याचे काम आपल्याला करायचे आहे ते केलेच पाहिजे! त्यासाठी  १५ ऑगष्ट हा दिवस आपण पवित्र सणा सारखा साजरा केला पाहिजे. आजच्या दिवशी आपण काही चांगले निश्चय करून देश हिताचे काम करायची शपथ घेतली पाहिजे. ध्वजवंदन करताना त्यापवित्र ध्वजाच्या साक्षीने हि शपथ घ्यायची असते.

आपले मुख्य अतिथी ध्वज फडकविल्यांनंतर जन- गण- मन हे राष्ट्र गीत म्हणून नंतर सर्वांनी ‘सावधान’ तेच्या पावित्र्यात झेंडा उच्या रहे हमारा’ हे गीत सामुदाईकपणे म्हणायचे असते. देशा साठी प्राण पणाला लावलेल्या क्रांती वीरांची आठवण करून देणारे हे गीत  म्हणजे —–  स्वर साम्राज्ञी लतादीदी च्या स्वरातील हे  गीत एकल्या नंतर खरच त्या क्रांतीवीरांसाठी आपल्या भावनांना पाझर फुटते ..    त्यांना आम्हा सर्वांचे शत शत: प्रणाम ! जय हिंद, जय भारत

    ए मेरे वतन के लोगों , जरा आख में भर लो पाणी ।
                 जो शहीद हुए हैं उनकी , जरा याद करो कुर्बानी ।।                

लोकमान्य तिळक !

$
0
0

लोकमान्य तिळक !

lokmany balgangadhar tilakबाळ गंगाधरपंत टिळक हे कोकणातील दापोली तालुक्यातल्या चिखलगाव येथे वडीलोपार्जीत शेती सांभाळत राहात होते पण शेतीवर चरितार्थ चालविणे अवघड झाले तेव्हां त्यांनी दरमहा पाच रुपये पगारावर शिक्षकाची नोकरी स्वीकारली संस्कृत आणि गणित या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास होता.चिखलगाव येथेच लोकमान्य बाळ  गंगाधर टिळक यांचा २३ जुलै १८५६ मध्ये जन्म झाला. त्यांच्या मातेचे नाव पार्वतीबाई होते. मुळनाव केशव ठेवले होते. तरी सर्वजण बाळ असेच म्हणत.तेच नाव पुढे कायम झाले. कुशाग्र बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती असल्याने बाळला गंगाधरपंतांनी संस्कृत आणि गणित या विषयांत तरबेज केले. बाळने हि हे विषय आवडीने अभ्यासले. यातूनच संस्कृत ग्रंथाचे वाचन करणे,अवघड गणिते सहजपणे सोडविणे याचा बाळला नादच लागला.

प्राथमिक शिक्षणा नंतर बाळ पुण्यात आले. आपल्या हुश्यारीने बाळने येथील शिक्षकांचे प्रेम संपादन केले. शालेय जीवनापासूनच त्यांच्यात सत्यप्रीयता,स्पष्टवक्तेपणा आणि अन्याअयाचा प्रतिकार करण्याची वृत्ती प्रकट होत होती. १८७२ मध्ये दहावी उतीर्ण झाल्यावर डेक्कन कॉलेजां तून त्यांनी १८७६ मध्ये बी.ए. हि पदवी परीक्षा उतीर्ण केली. १८७९ मध्ये ते एल.एल.बी.झाले. डेक्कन कोलेजात असताना त्यांचा विष्णूशास्त्री चिपळुनकर आणि गोपाळराव आगरकर यांच्याशी परिचय झाला. ते तिघेही देशभक्त आणि स्वातंत्र्यप्रेमी होते.त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते. या परकीय सत्तेखाली पारतंत्र्यात जगणार्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य प्रेम निर्माण केले पाहिजे.या वर तिघांचे एकमत झाले. अगदी बालपणापासूनच मुलांच्या मनात स्वातंत्र्यप्रेम निर्माण केले पाहिजे असे ठरवून त्यांनी १८८० मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.

बाळ लोकमान्य टिळकांनी तसेच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आणि गोपाळराव आगरकरांनी सरकारी नोकरी आणि मोठा पगार यानकडे न वळता शिक्षकी पेशा स्वीकारला. या शिक्षकी पेशात टिळकांच्या संस्कृत आणि गणित या विषयांतील आवडीचा चांगला उपयोग झाला. या तिनहि देश भक्तांच्या मनातील देशभक्तीची भावना अत्यंत तीव्र होती. त्यामुळे केवळ शालेय विद्यार्थ्यापुरते शिक्षकाचे काम मर्यादित न ठेवता सर्व समाजात आपले विचार पोचवावे. म्हणून त्यांनी ‘ केसरी ‘व ‘मराठा’ हि वृत्त पत्रे सुरु केली. लोकांच्या मनात या वृत्त पत्रांतील लेखनाने स्वदेशा विषयीची निष्ठा वाढवावी, व परकियांच्या सत्तेतून मुक्तता व्हावी, भारतीयांवर होणार्या अन्यायाला वाचा फुटावी ; असा त्या वृत्तपत्रा मागील हेतू होता.

 ’केसरी’ या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणार्या लेखनात १८८२ मध्ये एकदा कोल्हापूर संस्थानातील अन्यायाला वाचा फोडणारा मजकूर प्रसिद्ध झाला. आणि त्यावरून प्रकरण चिघळले.त्यांच्यावर खटला झाला. टिळक, आगरकरांना १०१ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगाच्या बाहेर पडल्यावर टिळक-आगरकरांच्या पुढाकाराने १८८५ साली पुण्यात ‘फर्ग्युसन’ कॉलेज सुरु झाले. तिथे हे दोघे प्राध्यापकाचे काम करू लागले. त्यावेळीही त्यांचे वृत्तपत्राचे काम चालूच होते.पुढे टिळकांचे कॉलेजमधील सहकार्यांशी मतभेद झाले.आणि टिळकांनी केसरी पत्र स्वत:चालविण्यास घेऊन कोलेज्शी असलेला सम्बंध तोडला. नंतर टिळक स्वतंत्रपणे, सामाजिक व राजकीय विषयांवरची आपली मते प्रभावीपणे मांडू लागले. टिळकांच्या निर्भीड, उग्र, सत्य लेखनाने ‘केसरी’ लोकप्रिय होऊ लागला.

‘केसरी’ मधील लेख वाचून लोकांच्या मनात ब्रिटीश राजवटी बद्दलचां असंतोष वाढू लागला. सरकारला ‘ केसरी’ आणि टिळक यांचा धाक निर्माण  होऊ लागला.

१८९६ — ९७ मध्ये पुण्यात प्लेगने थैमान घातले. त्या पेक्षाही इंग्रज सरकारच्या अधिकारांनी यावेळी केलेल्या अन्यायांनी कळस गाठला. त्याचा अखेर शेवटी एका इंग्रज अधिकार्याच्या खुनात झाला. या सर्व प्रकारांबद्दल टिळकांनी जे लेखन केले त्याचे निमित्त करून सरकारने संधी साधली. आणि टिळकांना तुरुंगवासात पाठविले. या सरकारच्या कृतीचा परिणाम उलटा होवून टिळकांना अधिकच लोकप्रीयता मिळाली. टिळक ‘लोकमान्य’ नेता झाले. “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे” आणि “तो मी मिळविणारच, अशी त्यांची धारणा होती.

लोकमान्य हे ब्रिटीश सरकारबद्दल लकांच्या मनात असंतोष निर्माण करणारे नेते म्हणून एकीकडे कार्य करीत होते; त्याच वेळी त्यांचा आवडत्या विषयांचा अभ्यासही सुरूच होता.त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर,सामाजिक परिस्थितीवर आणि प्रासंगिक घटनांवर ‘केसरी’ तून लेखन करतानाही “आर्यांचे वस्तीस्थान” ओरायन” “शास्त्रीय पंचांग” “गीतारहस्य”  असे ग्रंथ लिहून आपल्या अभ्यासाचा परिचय घडविला. समाजातल्या सर्वांना एकत्रित आणून व्याख्यांनान द्वारे मतप्रचार करण्यासाठी त्यांनी ” गणेशोत्सव ” श्री शिवछत्रपतींच्या जयंतीचा उत्सव असे नवे उपक्रम सुरु केले.

लोकमान्यांची लोकप्रीयता वाढतच हती. राष्ट्रीय नेता म्हणून त्यांचा उल्लेख होत होता, त्यामुळे सरकार बेचैन होत होते.टिळकांना लोकांपासून दूर ठेवण्याची संधी सरकार शोधत असायचे.लोकमान्य अत्यंत कडक शब्दात सरकारी धोरणांवर निर्भीडपणे टीका करीत असत. १२ मे १९०८ च्या ‘ केसरीत’ त्यांनी लिहिलेल्या ‘ देशाचे दूर्दैव ‘ या लेखाबद्दल सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला. सहा वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात भारताबाहेर पाठविण्यात आले. पण तरीही टिळकांनी तेथेही चिंता न करता, शांत मनाने  ‘गीतारहस्य’ सारखा मोठा ग्रंथ लिहिण्याचे धाडस केले. या काळातच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पण टिळकांनी ते दु:ख हि शांतपणे पचविले. भारतीयांच्या मनात इंग्रज सरकार विरुद्ध  नेहमीच असंतोष निर्माण करीत असत त्यामुळे त्यांना  ‘ असंतोषाचे जनक’ असे संबोधण्यात येत असे. या त्यांच्या अनेक कार्यांनी त्यांनी सरकारला कधी लेखणीद्वारे तर कधी व्याख्यानातून हादरवून सोडलेले होते. पण नंतर  लोकमान्य १ ऑगष्ट १९२० मध्ये ते निधन पावले.  त्यांना आपणा सर्वभारतीयांचा कोटी कोटी प्रणाम !

Original Picture Collection of Bal Gangadhar Tilak

Bal_Gangadhar_Tilak original pictures Bal_Gangadhar_Tilak original pictures2 Bal_Gangadhar_Tilak original pictures3 Tilak original pictures 2 Tilak original pictures

मदनलाल धिंग्रा

$
0
0

जन्म १८८७.. फाशी १७ ऑगष्ट १९०९

Hindu History: Madanlal Dhingra - (1887-1909)“माझा असा विश्वास आहे कि, परकीय संगिनिच्या सहाय्याने परदास्यात जखडलेले राष्ट्र हे नित्य युद्धमानच राष्ट्र असते.नि:शस्त्र जमातीला उघड उघड युद्ध करणे हे अश्यक्य होत असल्यामुळे धिंग्राने दबा धरून हल्ला चढविला.,त्याला बंदुक मिळू शकली नाही. म्हणून मदनलालने पिस्तुल बाहेर काढले आणि ते झाडले.!”

असे नि:संदिग्ध वक्तव्य फाशी पूर्वी करणारे मदनलाल धिंग्रा हे थोर क्रांतिकारक होते. भारतमातेविषयी जाज्ज्वल्य निष्ठा बाळगणार्या या वीराचा जन्म पंजाब मध्ये १८८७ साली झाला. त्यांचे वडील अमृतसर मध्ये सिव्हिल सर्जन होते. त्यांचे घराणे अत्यंत सुखवस्तू होते. मदनलाल २१ वर्ष्याचे असतानाच त्यांचा विवाह झाला. त्यांना पुत्ररत्न हि झाले.पण त्यांचे संसारात मन रमेना, क्रांती काळातील अनेक घटना त्याच्या मनास बेचैन करीत होत्या. अखेर१९०६ साली त्यांनी इंग्लंड गाठले त्याठिकाणी ‘युनिव्हर्सिटी कॉलेज’ मद्ये स्थापत शास्त्राचा विद्यार्थी म्हणून तीन वर्षे त्यांनी नाव कमाविले.

इंग्लंड मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासात मदनलाल आले. सावरकरांच्या क्रांती विचारांनी ते चांगलेच प्रभावित झाले. भारतमातेला बंधमुक्त करण्याच्या विषयावर ते अनेकदा सावरकरांशी गप्पा मारीत असत. अश्याच गप्पांच्या वेळी जपानी लोकांच्या शौर्याचे अनेकदा कौतुक होताना आणि हिंदुस्थानी वीरांचा तिरस्काराने उल्लेख होताना पाहून मदनलाल भडकले. ते म्हणाले, “त्यात विशेष काहीच नाही.! माझे हिंदू राष्ट्र हि तितकेच शूर आणि साहसी आहे.लवकरच आमच्या कीर्तीचे पोवाडे पण तुम्ही गाऊ लागाल, ” यावर प्रतिस्पर्ध्याने हा पोकळ डौल आहे असे म्हटले, मदनलालने त्वरित त्याला प्रचीती पाहण्याचे आव्हान केले. त्यांनी एक टोकदार टाचणी घेतली. आपल्या हाताच्या तळव्यावर खुपसून ती दुसर्या बाजूने बाहेर काढून दाखविली. हात रक्त बंबाल झाला……..पण त्यांनी हुं कि चूं  केले नाही !

एकदा इंडिया मध्ये रासायनिक प्रात्यक्षिक चालले होते. भांड्यात रसायन उकळत होते. क्षणाधार्त ते भांडे खाली उतरविणे आवश्यक होते. अन्यथा स्पोटाची शक्यता होती. सावरकर मदनलालकडे पाहात होते.त्यांनी अडचण सांगताच मदनलालने निर्धाराने ते भांडे खाली उतरविले. रसरसीत लाल झालेल्या त्या भांड्याने धिंग्राच्या हाताचे चामडे सोलून निधाले………सावरकर या महान तरुणाकडे, व त्याच्या साहसाकडे पाहातच राहिले. साहस हा धिंग्राचा अंगभूत गुण होता.  २५ जानेवारी १९०९ त्यांना रिव्हाल्व्हरची परवानगी मिळाली. त्यांनी एका माणसा कडून तीन पाउंड पाच शिलिंगला एक स्वयंचलित रिव्हाल्व्ह्र विकत घेतली. नेमबाजीचा सराव केला. हिंदुस्थानातील जनतेवर ब्रीटीशांकडून होणार्या अन्यायाचा प्रतिशोध घ्यायचा म्हणून तर ते जास्तच आसुसले होते. कर्झन वायली या ब्रिटीश अधिकार्या कडे त्यांचे लक्ष होते. कारण भारत आणि इंग्लंड मध्ये असणार्या क्रांतिकारका वरील त्यांची दडपशाही दिवसेंदिवस वाढतच होती. त्यांचा धिंग्रांना काटा काढायचा होता.

अखेर तो दिवस उजाडला १जुलै १९०९ हा तो दिवस होता. न्याशनल इंडियन असोशीएशनच्या मेळाव्यात लंडन मुक्कामी असलेल्या धिंग्रांनी कर्झन वायली वर ग्लीबार केला. वायली यमसदनाला गेला. पण वायलीचा कळवला बाळगणारे मुळचे मुंबईचे असलेले डॉ. कावसलाल काका हे आडवे झाले. धिंगराने एक गोळी त्यांच्या वरही चालविली. आणि भारतमातेच्या या शत्रूचा पण नायनाट केला. त्या वेळी रात्रीचे ११ वाजून १० मिनिटे झाली होती.

या खळबळजनक प्रकारा नंतर धिंग्रांणा अटक झाली. त्यांना वाल्टन स्ट्रीट पोलिस ठाण्यावर नेण्यात आले. २ जुलैला हि बातमी सर्वत्र पसरली. आणि हिंदुस्थान हा तेजस्वी क्रांतीकारींचा देश आहे, हे सिद्ध झाले. पण धिंग्रांना फाशीची शिक्ष्या द्यायचे हि याच वेळी ठरले. कारागृहात त्यांना भेटायला अनेक लोक उत्सुक होते. कधी क्रांती- कारकांना संधी मिळायची, कधी नाही, एकदा ग्यानचद्र वर्मा धिंग्रानां भेटायला गेले होते . तेव्हा ते म्हणाले , “मदनलाल , मी तुझ्यासाठी काय करू ? ”
“आता काही दिवसात फासी होणारच आहे, भारतमातेचा चरणी प्राण अर्पण करतांना कसे नीटनेटके जायला हवे नाही ! पण चांगला पोशाख करण्यासाठी इथे अरे साधा आरसाही नाही. एक छानदार आरसा दे ना पाठवून !”

हे ऐकून ग्यानचद्र वर्मा शहारलेच. मृत्यूचे अक्राळ विक्राळ रूप समोर उभे असतांनाही किती अविचल आहे हा! १७ ऑगस्ट १९०९ रोजी तो दुर्दैवी दिवस उजाडला . लंडनच्या पेटनव्हील तुरुंगात मदनलालला फासी . आली  या बातमीने स्वातंत्र आंदोलनाने पुन्हा पेट घेतला. अनेक ब्रिटीश अधिकारी त्यात मृत्युमुखी पडले. धिंग्राच्या बलिदानाचे फलक सर्वत्र लागले आणि ह्जार्रो तरूण मुले या क्रांतिकुंडात  समिधा बनायला सिद्ध झाली.

आपल्या मृत्यूनंतर हिंदूपद्धतीने आपल्यावर अंत्यसंस्कार व्हावेत अशी धिंग्रांची इच्छा होती . पण क्रूर ब्रिटिशांनी त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर ६७ वर्षांनी त्यांची शवपेटी विमानाने हिंदुस्तानात आणली. २५ डिसेंबर १९७६ला लाखो लोकांच्या उपस्तीतीत हरिद्वार येथे त्यांच्या अस्थिचे विसर्जन करण्यात आले.

कोणतीही राष्ट्रे जिवंत राहतात, ती अशा बलिदान करणार्याच्या अखंड स्मृतीनेच होय. मदनलाल धिंग्राच्या बलीदानाबद्दल मी एवढच म्हणेन -
                                                                        यज्ञी ज्यांनी देऊनी नीज शीर
                                                                        घडिले भारत वैभव मंदिर
                                                                        परी जयांच्या बलीवेदीवर
                                                                        नाही चिरा, नाही पणती
                                                                        तेथे कर माझे जुळती .

Original Pictures of Madan Lal Dhingra :

Madan_Lal_Dhingra original picture Hindu History: Madanlal Dhingra - (1887-1909)

महाराणा प्रताप !

$
0
0

जन्म १५४०. मृत्यू- १९ जानेवारी १५९७.

19th January Death Anniversary of Maharana Pratap

इ. सन. १५४० मध्ये महाराणा प्रतापसिंग यांचा जन्म झाला. मेवाडचा राणा व्दितिय उदयसिंग यास तेहतीस अपत्ये होती. या सर्वात जेष्ठ प्रताप. स्वाभिमान व सदाचार हे त्याचे मुख्य  होते. तो बालपणा पासूनच धीट आणि शूर होता. त्याचे हे गुण पाहूनच मोठेपणी हा महापराक्रमी होणार याची सर्वांनाच कल्पना आली होती. शिक्षणापेक्षा मैदानी खेळ, व शस्त्रास्त्र चालविणे त्याला जास्त आवडे. आपला बंधू शक्तीसिंह याच्या बरोबर वन्य पशूंची शिकार करण्यात त्याचा बराच वेळ जंगलात जाई. महाराणा प्रतापसिंहाने अकबरा सारख्या बलाढ्य बाद्शहाशी, मेवाड आणि राजपुतांना यांच्या स्वातंत्र्यासाठी २५ वर्षे लढा दिला या लढ्यात त्याला पत्नीला घेऊन मुलाबाळांसोबत जंगलात भटकावे लागले. तहान- भूक वीसरावी लागली.मातृभूमीसाठी,मेवाडचे स्वातंत्र्य टिकवीन्यासाठीत्याने केलेल्या संघर्शाला तोड नाही.हे सारे कष्ट सोसत असतानाही त्याने आपल्या कुळाला आणि देशाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू दिला नाही. ‘स्वातंत्र’ या शब्दाचा पर्यायच ‘ प्रतापसिंह ‘ व्हावा, असे त्याचे तेजस्वी जीवन होते. प्रतापसिंहाच्या तेजाने केवळ राज्पुतान्नाच नव्हे तर सारा भारत देश प्रभावित झाला. महाराणा प्रतापसिंहाचे नाव आजही राजस्थानात पूज्य मानले जाते.

भारतीय इतीहासात महाराणा प्रतापसिंहाचे नाव नेहमीच साहस,शौर्य,त्याग,आणि हौतात्म्य यासाठी प्रेरणादायक ठरलेले आहे. मेवाडच्या सिसोदिया घराण्यात राणा हमीर,बाप्पा रावळ ,राणा संग असे अनेक शूरवीर हून गेले. ह्या सर्व वीरांना ‘राणा’ असे संबोधिल्या जाते. पण प्रतापसिंहाला ” महाराणा ” हि उपाधी मिळाली आहे.

त्याकाळी दिल्लीच्या तख्तावर मोगल बादशहा अकबर हा अतिशय शक्तिशाली राजा विराजमान होता. तो अतिशय धूर्त होता. हिंदूच्याच बलाचा वापर करून तो हिंदू राज्यांना गुलाम बनवी.त्यांना तो आपापसात लढायला लाव. काट्याने काटा काढून, शस्त्राला शस्त्र भिडवून स्व:त अलिप्त राहून व फायदा आपल्या पदरात टाकून घेई. हिंडून मधील फुटीरता आणि स्वार्थ लोभ याचा त्याने भरपूर लाभ धेतला त्यांचा स्वाबिमान नष्ट करण्यासाठी त्याने अनेक प्रकारचे उपाय योजले आणि बहुतेक सर्व राजपुतांना वश करून घेतले. काही राजपूत राजांनी मानसन्मानाच्या लालचीने आपल्या उज्ज्वल परंपरां आणि क्षात्रधर्माला तिलांजली देऊन सुना-मुलींनाही अकबराच्या अं:पुरात पोचविले होते.

पण अश्याही परिस्थितीत मेवाड, बुंदेलखंड आणि सिरही वंशातील काही राजे आपला स्वाभिमान, धर्म. आणि स्वतंत्रता टिकवून ठेवण्यासाठी अकबराशी प्राणपणाने लढत होते. पुढे उदयसिंह हा मेवाडचा राजा झाला. त्याचे स्वातंत्र्य  म्हणजे आपल्या सामर्थ्याचा अपमान होय, असे अकबराला वाटे. त्या खूप मोठी सेना पाठवून चितोडवर जोराचे आक्रमण केले.उद्यसिंह हा प्रथम पासूनच विलासी जीवनात रंगला होता. अर्थातच मेवाद्ची आज पर्रयंतचि शौर्य परंपरा राखण्याचे व आपल्या मानसंन्माचे रक्षण करण्याचे साहस त्याच्यात नव्हते. जीव वाचवण्या करीता तो चितोड सोडून पळून गेला आरवली पर्वतावर उदयपुर नावाची त्याने नवी राजधानी वसविली. चितोडच्या युद्धा नंतर ४ वर्रष्यांनी दिनांक ३ मार्च १५७२  उदयसिंहाचे निधन झाले.

प्रताप सिंहाचा राज्याभिषेक झाला. प्रतापसिंह हा राणा प्रतापसिंह म्हणून  आला होतां. “कित्येक वर्ष्यापासून आपल्या पासून दुरावलेली वीरता आणि धर्म-न्याय यांच्या रक्षणार्थ युद्धाची भावना सर्व जनमानसात आपल्याला निर्माण करण्याची आहे. ज्याप्रमाणे  श्री प्रभू रामचंद्राने पापी, अन्यायी, आणि अत्याच्यारि रावणाला युद्धात पराजित करून न्याय व धर्म याची स्थापना केली. तद्वतच आपल्याला आपल्या मातृभूमीवर लागलेल्या पारतंत्र्याचा कलंक नेहमीसाठी धुवून टाकायचा आहे. शक्तीशाली राजपुतांनो,’ पुढे व्हा व स्वातंत्र मिळविण्याची आकांक्षा तयारी करा. “हि ओजस्वी वाणी व प्रतापसिंहाची कठोर प्रतीज्ञां ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्व सरदारांच्या अं:करणात उत्साहाची लहर उठवली. एक मुखाने त्यांनी घोषणा केली कि” हे प्रभो आमच्या शरीराती रक्ताच्या शेवटच्या थेम्बा पर्यंत आम्ही चितोडच्या मुक्तीसाठी राणा प्रतापसिंहाला सहाय्य करू व त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढू! आम्ही मरण पत्करू पण आमच्या ध्येयापासून हटणार नाही. राणाजी आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभे आहोत. याची खात्री ठेवा. केवळ आपल्या इशाऱ्याचाच अवकाश कि आम्ही आत्म समर्पण करायला तयार आहोत.”

हळदीघाटच्या युद्धात अकबराच्या अपेक्षेनुसार निर्णायक निकाल लावला नाही. त्या युद्धात रन प्रतापला माघार घ्यावी लागली. हे जरी खरे असले तरी अकबराचेच सैन्य प्रतापाचा पूर्णपणे पाडाव करण्यात अयशस्वी ठरले. महाराणा प्रतापाने आपल्या सैन्यात क्षात्रतेज आणि बळ निर्माण केले व आपल्या सैन्याची वाढ करून संपूर्ण मेवाड प्रांत आपल्या कब्जात घेतला. हे कळल्यावरही अकबर बादशाला शांतच राहावे लागले. पुन्हा महाराणा प्रतापाशी संघर्ष करण्याचे धाडस त्याने केले नाही. नंतर अकबर बद्शहाणे आपले सारे लक्ष दक्षिणेकडे वळविले. परंतु एवढ्या विजयानंतरही महाराणा प्रतापचे समाधान झाले नाही. त्याची दृष्टी चित्तोडवर होती. चित्तोड मोगलच्या ताब्यात राहणे, हे त्यांना अतिशय खटकत होते. चित्तोड स्वतंत्र केल्या शिवाय त्यांना चैन पडत नव्हती. प्रतापचे साहस, शोर्य , चातुर्य व महापराक्रम बघून झालोर, जोधपुर, इडर, नोडोल व बुदेलचे राजे त्याच्या साह्यार्थ धावून आले व अकबर बादशाच्या विरोधात उभे राहिले. प्रतापचे दूत सर्वदूर या संघर्षाचा वणवा पेटवित होते. अकबराच्या विरुद्ध लोकांना भडकवीत होते. अकबराचे सैन्य बेसावद होते. ह्या सगळ्या प्रकरांनी अकबर बादशहा घाबरून गेला होता.

एकामागून एक पर्वतासमान संकटे येत होती व त्याच्याशी टक्कर देवून मार्ग काढण्यात महाराणाचे शरीर जर्जर झाले होते. १९ जानेवारी १५९७ रोजी त्याचे निधन झाले . भारतीय इतिहासात: प्रातःस्मरणीय महाराणा प्रतापसिंहाचे नाव, राष्ट्र, संकृती , स्वाभिमान आणि स्वतंत्र याचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या नरर्विराच्या परंपरेत असुर्यचंद्र तळपत राहिले .

सरदार वल्लभभाई पटेल!

$
0
0

जन्म ३१ ओक्टोंबर १८७५ , मृत्यु  १५ डिसेंबर १९५०.

sardar patel information in hindiसरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ओक्टोंबर १८७५ रोजी गुजराथ मधील खेडा जिल्ह्यातील करमसाड खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई पटेल आणि आईचे नाव लाडबाई  असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण करमसाड या गावी झाले. न्न्ते पेतलाड येथील एकां शाळेत ते दाखल झाले. दोन वर्षा नंतर ते नडीयादच्या हायस्कूल मध्ये आले. बालपणा पासून करारी व अन्यायाची चीड असलेल्या वल्लभभाईनि शाळेत असताना एका मारकुट्या गुरुजीं विरुद्ध विद्यार्थ्यांना संघटीत करून सतत तीन दिवस संप घडवून आणण्याचे आक्रित केले व त्या गुरुजींना नरमाई ने वागायला लावले.

विद्यार्थी दशेतच त्यांचा जव्हेरबाईं शी विवाह झाला. दहावी झाल्यावर घरच्या गरिबीमुले त्याना पुढील शिक्षण घेन्याकरीता पैसा साठवू लागले.पुरेसे पैसे साठताच आपले वडीलबंधू विठ्ठलभाई यांना ते पैसे देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. १९०९ साली त्यांच्या पत्नी चे निधन झाले.विठ्ठल भाई ब्यरिष्टरी करून आल्यावर वल्लभभाई इंग्लंडला गेले, आणि बॉरिष्टरिची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण करून मायदेशी परत आले. व अहमदाबाद ला वकिली करू लागले.वकिलीत भरपूर पैसा कमावूनते वैभवशाली जीवन काढू लागले. पण महात्माजींच्या सहवासात येउन त्यांनी वकिली सोडून देश्याच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला.व कारावास भोगला.

अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी त्या शहरात अनेक सुधारणा व सोई केल्या गुजरात विद्यापिहाची स्थापना केली. १९२७ साली अतिवृष्टी मुळे गुजरात मध्ये जलप्रलय झाला असता. त्यांनी पुरग्रस्ताणा केलेले सहाय्य तर चीरस्मरणीय ठरते. १९२८ साली बार्डोलीस केलेल्या करबंदी चळवळीचे  नेतृत्व स्वीकारून त्यांनी ब्रिटीश सरकारला नमविले. त्यामुळे लोक त्यांना “सरदार पटेल” असे संबोधु  लागले.

१९३१ साली कराची येथे ब्र्लेल्या अखिल भारती कॉंग्रेस च्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.१९४२च्या ‘भारत छोडो” च्ल्व्लीठी भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास घडला. २ सप्टेंबर १९४६ रोजी स्थापन झालेल्या मध्यवर्ती हंगामी मंत्रीमंडळात ते भारताचे पहिले गृहमंत्री होते. ते घटना समितीचेही सदस्य होते. १५ ऑगष्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले. तेव्हा सरदार पटेल उपपंतप्रधान बनले. त्यांच्या कडे गृह, माहिती आणि प्रसारण तसेच घटक राज्यासंबधीचे प्रश्न हि खाती सोपविण्यात आली. पण देशाची फाळणी झाली पटेलांना या गोष्टीचे फार दु:ख झाले. भारतातील लहान मोठी संस्थाने संघराज्यात सामील करण्याचे फार मोठे कार्य सरदारांनी केले. निजामचे हैद्राबाद संस्थान त्यांनीच भारतात विलीन करून घेतले. सुप्रसिद्ध  सोरटीसोमनाथ मंदिराचा जिर्नोधार केला. ते मंदिर सर्वांना खुले केले. ते देशसेवेमुळे अमर झाले. देश हे एकच कुटुंब आहे अश्या भावनेनेच ते वागत.मात्र आपण “गृह मंत्री” ‘असतानाच गांधीजींची हत्या झाली. ‘ हि गोष्ट त्यांच्या मनाला अतिशय लागली. मग लवकरच हृद्य विकाराचा झटका येउन ते आजारी पडले. व त्यातच त्यांचे १५डिसेम्बर १९५० रोजी निधन झाले.

बारडोलीचे सरदार, गुजराथ चे सिंह, भारताचे लोहपुरुष, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनापती, भारताच्या एकतेचे शिल्पकार आणि पहाडाप्रमाणे सुध्रुड ईच्छा शक्ती धारण करणारे वल्लभभाई पटेल इहलोकांतून गेले. त्यावेळी त्यांचे वय ७५ वर्ष्याचे होते. आपण त्यांचे आदराने स्मरण करू यां ! व त्यांच्या गुणांचे अनुकरण केले पाहिजे. त्याना कोटी कोटी प्रणाम!

Sardar Patel Biography and original picture collection, picture mahatma Gandhi.

Sardar Patel Biography1 Sardar Patel Biography2 Sardar Patel Biography3 Sardar Patel Biography4 Sardar Patel Biography5 Sardar Patel Biography6 Sardar Patel Biography7 Sardar Patel with mahatma gandhi
Viewing all 88 articles
Browse latest View live